शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

ठाणे, भिवंडी परिसरात चोऱ्या करणारी टोळी जेरबंद

By जितेंद्र कालेकर | Updated: June 6, 2024 17:47 IST

ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई: ४३ मोबाईलसह सोन्याचे दागिने हस्तगत

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: ठाण्याच्या डायघर आणि भिवंडी परिसरातील घरांमध्ये चोऱ्या करणाऱ्या अख्तर हुसेन गुलाम मुर्तुजा खान उर्फ दारा (२५, रा. रांजनोली, भिवंडी) याच्यासह पाच जणांच्या टोळीला अटक केल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांनी गुरुवारी दिली. या टोळीकडून ४३ मोबाईलसह सोन्याचे दागिने असा आठ लाख ८३ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींना ७ जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

मोबाईल चोरी आणि घरफोडीच्या वाढत्या घटनांच्या अनुषंगाने हे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश ठाण्याचे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी अलिकडेच झालेल्या गुन्हे आढावा बैठकीत पोलिस अधिकाऱ्यांना दिले होते. याच पार्श्वभूमीवर गुन्हे अन्वेषण विभागाकडून तपासाची सूत्रे हलविण्यात आली होती. डायघर भागात चोरी करणारा राजदूत उर्फ इम्रान शेख उर्फ सागर (२६, रा. भिवंडी) याला ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने ३ मे २०२४ रोजी ताब्यात घेतले होते. डायघर भागात नोव्हेंबर २०२३ मध्ये एका घरातून चोरलेल्या चार मोबाईलची त्याने कबूली दिली. हे ४० हजारांचे मोबाईलही त्याच्याकडून हस्तगत करण्यात आले. याच गुन्हयाच्या समांतर तपासामध्ये आरोपी सागर याच्याकडील चौकशीमध्ये अन्य ठिकाणी चोरी करणारे अख्तर हुसेन गुलाम मुर्तुजा खान उर्फ वारा , मोहमद शमशुद्दीन (१९) मोहमद अन्सारी (२६) आणि मोहमंद खान (२८) या चौघांना वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप पाटील, पोलिस निरीक्षक कृष्णा कोकणी आणि उपनिरीक्षक प्रकाश शिरसाठ यांच्या पथकाने २ जून २०२४ रोजी अटक केली.

त्यांच्याविरुद्ध डायघर पोलिस ठाण्यात चोरीसह हत्यार बाळगल्याचा गुन्हा दाखल आहे. यातील आरोपी मोहमद खान याच्याकडून एक लाख पाच हजारांचे १५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि सहा लाख ९४ हजारांचे ४३ मोबाईल आणि तीन हजार सहाशेची रोकड असा ऐवज हस्तगत केला. तपासात डायघरमधील तीन गुन्हे आणि मुंबईतील मालवणी पोलिस ठाण्याचा एक असे चार गुन्हे उघडडकीस आणले आहेत. त्यांच्याकडून सोन्याचे दागिने, ४३ मोबाईल, स्कूटर आणि ष्घरफोडीसाठी वापरलेली सामुग्री असा आठ लाख ८३ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आराेपींपैकी अख्तर खान याच्याविरुद्ध डायघरमध्ये दाेन तर िभवंडीत सहा असे आठ चाेरीचे गुन्हे दाखल आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी