शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata News Live: रतन टाटांचे पार्थिव वरळीच्या स्मशानभूमीत दाखल, थोड्या वेळात अंत्यसंस्कार
2
"या नेत्यांमुळे काँग्रेस हरयाणात हरली’’, पराभवाचं खापर फोडत संतप्त राहुल गांधींनी मांडलं परखड मत 
3
उद्धव ठाकरेंसोबतच्या बैठकीत काय चर्चा झाली?; रविकांत तुपकरांनी सांगितली रणनीती
4
कमाल! २ वेळा अपयश आलं, निराश झाली पण हरली नाही...; IPS अधिकारी होण्याचं स्वप्न केलं पूर्ण
5
मदरश्यांमधील शिक्षकांच्या मानधनात वाढ, खासगी विद्यापीठांना मंजुरी, राज्य मंत्रिमंडळात निर्णयांचा धडाका
6
Video: चेंडू हवेत जाताच हार्दिक पांड्या तुफान धावत सुटला, एका हाताने टिपला भन्नाट कॅच
7
सणासुदीच्या काळात मोदी सरकारची राज्यांना मोठी भेट, 1.78 लाख कोटी रुपये जारी...
8
"रतन टाटांसारख्या व्यक्तीला खरं तर हयात असतानाच 'भारतरत्न'ने सन्मानित करायला हवं होतं"
9
"या पराभवाला खूप गंभीरपणे..."; हरयाणा विधानसभा निकालावर अशोक गेहलोत यांचं मोठं विधान
10
२० वर्षांपासून असलेल्या नोकराने घात केला; भाजपा मंत्र्याच्या ५० लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारला
11
आळंदीची लेक ते महाराष्ट्राची लोकप्रिय गायिका; जीवनातील अध्यात्माचं महत्त्व, महिला सुरक्षेवरही कार्तिकी स्पष्टच बोलली..
12
PAK vs ENG : मुल्तानमध्ये इंग्लंड 'सुल्तान'! ऐतिहासिक आकडा अन् विश्वविक्रम; भारताचा विक्रम मोडला
13
रिस्क घ्यायची नसेल तर 'या' सरकारी स्कीममध्ये गुंतवा पैसा; रिटायरमेंटपर्यंत व्हाल २,२६,९७,८५७ रुपयांचे मालक
14
इंग्लंड-पाक नव्हे भारत-श्रीलंका लढतीत सेट झालाय कसोटीतील सर्वोच्च धावसंख्येचा वर्ल्ड रेकॉर्ड
15
रतन टाटांसह त्यांच्या भावानेही लग्न केले नाही; सावत्र भाऊ सांभाळतो व्यवसाय, कुटुंबात कोण..?
16
Dussehra 2024: दसर्‍याला आठवणीने करा 'हे' एक काम; वास्तुमध्ये सदैव राहील सुख, संपत्ती, समाधान!
17
PAK vs ENG Live : इंग्लंड ७ बाद ८२३! पाकिस्तानी चाहत्यांना वेदना देणारी 'कसोटी', हॅरी ब्रूकच्या ३१७ धावा
18
एक पंखा, दोन बल्ब आणि टीव्ही..., विजेचं बिल आलं १.९ लाख रुपये, त्रस्त युवकानं उचललं टोकाचं पाऊल  
19
टाटांची जादू : टाटांच्या 'या' शेअरनं १ लाखांचे केले ₹३५ कोटी; गुंतवणूकदार झाले कोट्यधीश
20
सर्वाधिक १० श्रीमंत उमेदवारांमध्ये ७ पुरुष, ३ महिला; सर्व पुरुष हरले, महिला जिंकल्या

कल्याण-डोंबिवलीत कचऱ्याचे ढीग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 4:42 AM

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : कल्याणमधील आधारवाडी डम्पिंग ग्राउंंड बंद केल्याचा दावा केडीएमसी आयुक्त विजय सूर्यवंशी करत असले, तरी, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : कल्याणमधील आधारवाडी डम्पिंग ग्राउंंड बंद केल्याचा दावा केडीएमसी आयुक्त विजय सूर्यवंशी करत असले, तरी, प्रत्यक्षात कल्याण व डोंबिवली शहरांसह २७ गावांत जागोजागी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. मनपा हद्दीतील सध्याच्या अंदाजे १८ लाख लोकसंख्येनुसार दररोज ८६६ टन कचरा तयार होतो. मात्र, मनपाच्या सांगण्यानुसार फक्त दररोज ५५० टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी उपाययोजना असल्याचे दिसून येते, तर मग अन्य ३१६ टन कचऱ्यावर प्रक्रिया कोणी करायची? ही तर नागरिकांच्या डोळ्यात धूळफेक आहे. भाजप याचा निषेध करत असल्याचे पत्र कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी बुधवारी आयुक्तांना दिले.

मनपाच्या १२७ प्रभागांपैकी केवळ काही प्रभागांतच ओला व सुका कचरा जमा केला जात आहे. त्यातच उंबर्डे व बारावे येथील डम्पिंग ग्राउंडवर ओला व सुका कचरा एकत्रच टाकला जातो. साधारणपणे घनकचरा मार्गदर्शक मानकानुसार प्रतिव्यक्ती प्रतिदिवशी ४८१ ग्रॅम कचरा उत्पन्नाचे प्रमाण आहे. सद्यस्थितीत उंबर्डे येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प बंद आहे. आतापर्यंत आधारवाडी येथे टाकला जाणारा कचरा बारावे येथे ओला व सुका कचरा, असा एकत्रितपणे टाकला जात आहे. आयुक्त व संबंधित अधिकारी तेथे दुसरे आधारवाडी तयार करत असल्याची टीका कांबळे यांनी केली. ओल्या कचऱ्याच्या पुरवठ्याअभावी १० बायोगॅस प्रकल्पांपैकी फक्त चारच प्रकल्प कार्यान्वित आहेत. आयुक्तांना संबंधित अधिकारी ही चुकीची माहिती देत आहेत. अधिकाऱ्यांच्या माहितीवर आयुक्तांनी विश्वास न ठेवता प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुस्थिती जाणून घ्यावी, असे कांबळे यांचे म्हणणे आहे.

स्वच्छ भारत अभियानात देशात दुसरा क्रमांक मिळवणारी नवी मुंबई मनपा तसेच ठाणे मनपानेही कचऱ्यावर अधिभार लावलेला नाही. मात्र, केडीएमसीचे आयुक्त घनकचरा व्यवस्थापनासंबंधित कुठलीही ठोस उपाययोजना कार्यान्वित नसताना, हा अधिभार येथील नागरिकांवर का लादत आहेत? त्याला भाजपचा तीव्र विरोध असल्याचेही कांबळे म्हणाले.

राजकारणापेक्षा समाजकारण महत्त्वाचे

कोरोनाकाळात नागरिकांवर कराचे ओझे वाढवून काय साध्य होणार आहे? सगळीकडे अस्वच्छता आहे, याचा विचार होणार आहे? की नाही, असा सवाल करत कांबळे म्हणाले की, अधिभार लावून निधी मिळवता येईल. पण त्याचा विनियोग कसा करायचा, हे महत्त्वाचे असते. त्यामुळे राजकारण न करता समाजकारण करावे, असा टोलाही कांबळे यांनी विरोधकांना लगावला.

-----------