शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांचा विश्वासू शिलेदार साथ सोडणार?; विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्धार
2
प्रेरणादायी! 'मोटरस्पोर्ट्स'साठी टेनिसपटूचं 'धाडस', तरूणाईसाठी उभारलं हक्काचं व्यासपीठ
3
विधानपरिषद सभापतीपदासाठी भाजपाचे ३ नेते शर्यतीत; कोण मारणार बाजी?
4
चक्रीवादळ: बार्बाडोसमध्ये अडकलेली टीम इंडिया भारतात कधी येणार? मोठी अपडेट आली...
5
"मी शिवसैनिक, बोललो ते बोललो..."; आईवरून शिवीगाळ केल्याचं अंबादास दानवेंकडून समर्थन
6
India Vs Zimbabwe T20i Series 2024: टीम इंडिया नव्या परीक्षेसाठी झिम्बाब्वेला रवाना! शुबमन गिल संघाचा कॅप्टन, द्रविडच्या जागी कोण?
7
जनरल मोटर्स, फोर्ड आता फोक्सवॅगन! जगातील सर्वात मोठी कंपनी भारतात अपयशी ठरली 
8
"आज ते नाहीत, याचं मला खूप शल्य राहील...", विधान परिषदेचा अर्ज भरण्यापूर्वी पंकजा मुंडे भावुक!
9
Video - "पत्र्याच्या घरात राहणारी मुलगी आज..."; रुपाली भोसलेने नवं घर घेताच गौरी कुलकर्णी भावुक
10
Priyanka Gandhi : "BJP-RSS चं काम हे फक्त हिंसा, द्वेष आणि भीती पसरवणं..."; प्रियंका गांधी कडाडल्या
11
धक्कादायक! मनोज जरांगे पाटील राहत असलेल्या ठिकाणाची ड्रोनद्वारे टेहळणी
12
बहुप्रतिक्षित 'नवरा माझा नवसाचा २'मध्ये या लोकप्रिय मराठी कलाकाराची एन्ट्री, डबिंगही केलं पूर्ण
13
"लोकांना तुमच्यापेक्षा जास्त विश्वास पंचायतमधल्या सरपंचावर'; निवडणूक आयोगावर खासदाराचे ताशेरे
14
"सत्ताधाऱ्यांना संरक्षण मागावं लागल्याचे देशाने पाहिलं"; राहुल गांधींच्या विधानाचे राऊतांकडून समर्थन
15
राहुल गांधींनी सर्व हिंदूंची माफी मागावी, चित्रा वाघ यांची मागणी
16
थलायवासोबत 40 वर्षांपासून काम केलं नाही, कमल हसन यांनी सांगितलं कारण; म्हणाले...
17
उद्धव ठाकरेंच्या शिलेदारामुळे सगळ्यांचंच गणित बिघडणार; मिलिंद नार्वेकर विधानपरिषदेच्या रिंगणात?
18
'या' दिग्दर्शकाला पाहून शाहरुखला आली 'क..क..क..किरण' बोलण्याची कल्पना; जुही चावलाचा खुलासा
19
"शिवीगाळ झाल्यामुळे मी रात्रभर झोपू शकलो नाही"; दानवेंच्या निलंबनाची प्रसाद लाड यांची मागणी
20
Divine Power IPO: पहिल्याच दिवशी ३००% चा फायदा, ४० रुपयांचा शेअर १६० पार; गुंतवणूकदार मालामाल

अंबरनाथच्या गोविंद पुलाखाली कचऱ्याचे ढीग; स्थानिकांकडून बोर्नव्हिटा आणि बदाम वाटप आंदोलन

By पंकज पाटील | Published: April 02, 2023 3:18 PM

अंबरनाथच्या गोविंद पुलाखाली कचऱ्याचे ढीग साचले असून याकडे पालिकेचे दुर्लक्ष होत आहे.

अंबरनाथ: अंबरनाथच्या गोविंद पुलाखाली कचऱ्याचे ढीग साचले असून याकडे पालिकेचे दुर्लक्ष होत आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी आज स्थानिक नागरिक आणि भालचंद्र भोईर प्रतिष्ठान यांनी चक्क बोर्नव्हिटा आणि बदाम वाटप केले.

अंबरनाथ पूर्वेच्या गोविंद पूल परिसरात पुलाच्या खालच्या बाजूला मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे साम्राज्य आहे. इथून वाहणाऱ्या वालधुनी नदीत नेहमीच केमिकलयुक्त सांडपाणी वाहत असल्यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यातच इथे साचलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधीत भर पडत असून पुलाच्या दोन्ही बाजूला विद्रूप अवस्था पाहायला मिळत आहे. गोविंद पुलाचा हा रस्ता अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिराकडे जाणारा एकमेव रस्ता आहे. त्यामुळे शहराबाहेरून येणारे पर्यटक याच रस्त्याने शिवमंदिराकडे जातात. त्यामुळे अशी घाण पाहून शहराची प्रतिमा बाहेरून येणाऱ्या नागरिकांच्या मनात चुकीची तयार होत असल्याचा आरोप भालचंद्र भोईर प्रतिष्ठानने केला आहे.

याबाबत पालिकेला अनेकदा तक्रारी करूनही पालिकेचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे आज स्थानिक नागरिक आणि भालचंद्र भोईर प्रतिष्ठान यांनी गोविंद पुलावर बसून हाती बोर्नव्हिटा आणि बदाम घेत आंदोलन केले. पालिकेच्या अधिकाऱ्यांची स्मरणशक्ती कमी झाली असून त्यामुळे त्यांना आम्ही बदाम आणि बोर्नव्हिटा देत असल्याचे यावेळी आंदोलन करणारे प्रकाश नलावडे यांनी सांगितले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :ambernathअंबरनाथ