शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

कचरा तुमचा, मग प्रक्रियाही तुम्हीच करा; पालिका बजावणार दोन हजार गृहसंकुलांना नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2023 09:39 IST

महापालिकेने असा दावा केला असला तरीदेखील त्यातील किती सोसायट्या आता ही प्रक्रिया राबवितात, याबाबत शंका आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे महापालिकेचा घनकचरा विभाग दोन वर्षांनंतर आता पुन्हा प्रतिदिन १०० किलोग्रॅमपेक्षा जास्त कचऱ्याची निर्मिती करणाऱ्या सोसायट्यांना नोटिसा बजावण्याची सुरुवात करणार आहे. त्यानुसार पुढील आठवड्यापासून शहरातील दोन हजार सोसायट्यांसह चार मॉलला या नोटिसा बजावल्या जाणार आहेत. त्यानुसार, त्यांनीच त्यांच्याकडे निर्माण होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करायची असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. पालिकेने तीन वर्षांपूर्वी ४२५ गृहसंकुले आणि आस्थापनांना नोटिसा बजावल्या होत्या.

समस्या संपविण्यासाठी उचलले पाऊलमहापालिकेने असा दावा केला असला तरीदेखील त्यातील किती सोसायट्या आता ही प्रक्रिया राबवितात, याबाबत शंका आहे. तसेच नव्याने गृहसंकुले उभी राहिली आहेत. त्यामुळे आता महापालिकेने पुन्हा या गृहसंकुलांकडे आपली मोहीम वळविली आहे. त्यात आता महापालिकेचे हक्काचे डम्पिंग अर्थात कचऱ्यावर प्रक्रिया करणारे केंद्रही सुरू होत आहे. त्यामुळे कचऱ्याची समस्या संपविण्यासाठी महापालिकेने ही पावले उचलली आहेत.

चार मॉलच्या ठिकाणीही नोटीससध्या हिरानंदानी भागात पाच मेट्रिक टनचा प्रकल्प राबविला जात आहे. तसेच शहरातील इतर काही सोसायट्याही अशा पद्धतीने प्रकल्प राबवीत आहेत. त्यातही पालिकेने केलेल्या एका सर्वेक्षणात १४० अशा सोसायट्या आहेत, त्याठिकाणी १०० किलोपेक्षा अधिकचा कचरा निर्माण होत आहे. त्यामुळे त्यांच्यापासून सुरुवात करण्याचा पालिकेचा मानस आहे. शिवाय शहरात असलेल्या चार मॉलच्या ठिकाणीही नोटीस बजावली जाणार असून, त्यांनादेखील त्यांच्या क्षेत्रात कचऱ्याचा प्रकल्प राबविण्यास सांगितले जाणार आहे.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्न