शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

अतिक्रमण विभागात फेरीवाल्यांचा कचरा; संपूर्ण कार्यालयात दुर्गंधी

By पंकज पाटील | Updated: October 10, 2023 19:39 IST

फेरीवाल्यांचा जप्त केलेला माल थेट कार्यालयाच्या आत ठेवला जात असल्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना ताकीद देण्याची गरज व्यक्त होत आहे.

पंकज पाटील, अंबरनाथ: अंबरनाथ नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागात फेरीवाल्यांकडून जप्त केलेला माल तसाच ठेवण्यात आला आहे. जे कार्यालय कर्मचाऱ्यांच्या कामाचे ठिकाण आहे त्याच ठिकाणी फेरीवाल्यांचा कचरा आणून टाकला जात असल्यामुळे संपूर्ण कार्यालयात दुर्गंधी पसरली आहे. अंबरनाथच्या नव्या प्रशासकीय इमारतीमध्ये तळमजल्यावर अतिक्रमण विभागाचा कार्यालय ठाण्यात आला आहे. या कार्यालयात अधिकाऱ्यांसह कर्मचारी काम करीत असतात.

अतिक्रमण विभागाने फेरीवाल्यांवर कारवाई केल्यानंतर जो माल जप्त केला जातो तो माल ठेवण्यासाठी योग्य जागा उपलब्ध नसल्यामुळे संबंधित अधिकारी थेट कार्यालयातच हा सर्व कचरा आणि जप्त केलेला माल तसाच ठेवत आहेत. भाजी आणि फळांच्या टोपल्या देखील याच ठिकाणी ठेवल्या जात असल्यामुळे संपूर्ण कार्यालयात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे अतिक्रमण विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नाक मुठीत घेऊन काम करण्याची वेळ आली आहे. नवीन प्रशासकीय इमारत कॉर्पोरेट दर्जाची तयार केलेली असली तरी या ठिकाणी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची प्रवृत्ती मात्र अद्यापही बदललेली नाही. फेरीवाल्यांचा जप्त केलेला माल थेट कार्यालयाच्या आत ठेवला जात असल्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना ताकीद देण्याची गरज व्यक्त होत आहे.

टॅग्स :ambernathअंबरनाथ