शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
2
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
4
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
5
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
6
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
7
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
8
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
9
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
10
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
11
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
12
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
13
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
14
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
15
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
16
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
17
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
18
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
19
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
20
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 

कचराकोंडी कायम!

By admin | Published: March 12, 2016 2:04 AM

कोणत्याही शहराला डम्पिंग ग्राउंडसाठी जागा मिळणार नाही. फक्त सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी जागा दिली जाईल आणि ओल्या कचऱ्यावर प्रत्येक पालिकेला शहरातच ठिकठिकाणी प्रक्रिया करावी लागेल

टीम लोकमत, ठाणेयापुढे कोणत्याही शहराला डम्पिंग ग्राउंडसाठी जागा मिळणार नाही. फक्त सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी जागा दिली जाईल आणि ओल्या कचऱ्यावर प्रत्येक पालिकेला शहरातच ठिकठिकाणी प्रक्रिया करावी लागेल, असे मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत जाहीर केल्याने वरवर पाहता हा प्रश्न निकाली निघाल्याचे दिसत असले तरी कोणत्याही पालिकेकडे पुरेशी पर्यायी जागा नसल्याने, असलेल्या जागेचा वाद कायम असल्याने, कचरा गोळा करतानाच त्याचे वर्गीकरण करण्यात-त्याच्या प्रक्रियेत पालिका उदासीन असल्याने, त्यांच्या ऐपतीचा प्रश्न असल्याने एकाही पालिकेचा कचऱ्याचा प्रश्न लागलीच सुटण्याची चिन्हे नाहीत. या प्रश्नाची कोंडी आणखी काही काळ कायम राहील, अशीच परिस्थिती आहे. ठाण्यात स्थानिकांचा विरोधठाणे : ठाणे पालिकेकडे कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी हक्काचे डम्पिंग आहे, परंतु स्थानिकांचा विरोध असल्याने मागील नऊ वर्षे डायघरचा प्रकल्प रखडला आहे. आता मुख्यमंत्र्यांनीच घोषणा केल्याने पालिकेपुढे आता डायघरशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ठाण्यातील ७०० मेट्रिक टन कचऱ्यात १०० मेट्रिक टन ओल्या कचऱ्याचा समावेश आहे. ओला आणि सुका कचरा वेगळा करण्याची मोहीम पालिकेने हाती घेतली असून याला १०० सोसायट्यांनी पाठिंबा दिला आहे. सध्या हा कचरा वेगळा गोळा केला जात असला तरी डम्पिंगवर तो एकत्र टाकला जातो. ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी शीळ येथील वन विभागाच्या जागेवर प्रकल्प हाती घेण्याचे निश्चित केले आहे. परंतु, हा प्रकल्प अद्यापही पालिकेच्या हाती आलेला नाही. हक्काचे डम्पिंग नसल्याने महापालिकेने डी सेंट्रलाइज पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेतला आहे. प्रभाग समितीमध्येच दोन ते पाच टनांपर्यंतचे प्रकल्प उभारले जाणार आहेत. यात पहिल्या टप्प्यात १०० टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. केडीएमसीचा बायोगॅस प्रकल्पकल्याण : उंबर्डे येथील ३१ एकर जागा आरक्षित असूनही विरोधामुळे कल्याण-डोंबिवली महापालिकेचे डम्पिंग ग्राउंड विकसित होऊ शकलेले नाही. तेथे जैववैद्यकीय कचरा प्रक्रिया प्रकल्पासोबत १० टन क्षमतेचा बायोगॅस प्रकल्प उभारण्याच्या निविदेला महासभेने मंजुरी दिली आहे. असे आणखी तीन प्रकल्प उभारणे प्रस्तावित आहे. ओला व सुका कचरा कशा पद्धतीने गोळा केला जाईल, याचे पालिकेकडे नियोजन नाही. एका प्रभागात सात कचरावेचक संस्थांना काम दिले आहे. त्याचबरोबर ओल्या कचऱ्यावर घरच्या घरी मॅजिक बास्केटच्या मदतीने प्रक्रिया करून खत तयार करण्याचा पालिकेचा मानस आहे. आधारवाडी डम्पिंग ग्राउंड बंद करून त्याऐवजी बारावे व मांडा येथे शास्त्रोक्त भरावभूमी तयार केली जाणार आहे. बारावेची निविदा मंजूर झाली आहे. मात्र, नागरिकांचा विरोध आहे. भिवंडीत उदासीनताभिवंडी : भिवंडीत प्रक्रिया न करता कचरा चाविंद्रा डम्पिंग ग्राउंडवर टाकला जातो. प्रशासन, लोकप्रतिनिधींची उदासीनता आणि नागरिकांत जागृती नसल्याने कचऱ्याचे वर्गीकरण होत नाही. तो वेगवेगळा उचललाही जात नाही. या निर्णयामुळे तरी आरोग्य विभागातील बेशिस्त कारभाराला शिस्त लागेल.