शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या कन्या संजना जाधव यांच्या गाडीला अपघात, थोडक्यात बचावल्या
2
“ही निवडणूक आरक्षणाच्या मुद्द्यावरच लढली जाईल, ठाकरे गट-भाजपा पडद्यामागे...”: प्रकाश आंबेडकर
3
"मोदींनी जितका पैसा अदानींना दिला, मी तितका गरिबांना देईन", राहुल गांधी काय बोलले?
4
विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय; गायीला दिला 'राज्यमाते'चा दर्जा
5
मुस्लिमांची संख्या वाढलीय, आता तुमची सत्ता संपणार; सपा आमदाराच्या विधानानं नवा वाद
6
तुम्ही दिवसभरात किती पाणी प्यायला हवं? संशोधन काय सांगतं?
7
भारतात WANTED असलेला झाकीर नाईक पाकिस्तानात पोहोचला; 'या' मोठ्या शहरात घेणार सभा
8
मुकेश अंबानींच्या Reliance मध्ये मोठी घसरण; शेअर बाजार हादरला, जाणून घ्या कारण
9
अरे देवा! सलूनमध्ये 'फ्री हेड मसाज' पडला महागात; ३० वर्षीय तरुणाला आला स्ट्रोक अन्...
10
टेस्टमध्ये टीम इंडियाचा बेस्ट शो! धावांची 'बरसात' अन् फिफ्टी, सेंच्युरीसह जलद 'द्विशतकी' रेकॉर्ड 
11
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कार्यालात तुफान राडा, ठाकरे गटाच्या शिवसैनिकांकडून बॉडीगार्ड्ना चोप 
12
Jio New Recharge Plan! दररोज १० रुपयांत मिळणार २ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंगही; कोणता आहे प्लॅन?
13
जपानचे नवे पंतप्रधान चीनला शिकवणार धडा; नवा प्लॅन पाहून ड्रॅगनला बसणार धडकी!
14
“मविआ १८० जागा जिंकेल, फडणवीसांनी महायुतीचा विरोधी पक्षनेता ठरवावा”: बाळासाहेब थोरात
15
"देवाला तरी राजकारणापासून दूर ठेवा", सुप्रीम कोर्टाने मुख्यमंत्री चंद्राबाबूंना झापले 
16
वर्षभरात अर्धी होतेय Smartphones ची किंमत; 'दिल मांगे मोअर'च्या नादात तुमचं मोठं नुकसान तर होत नाहीये ना?
17
अमेरिकेत जाणाऱ्यांसाठी खुशखबर! अमेरिकन दूतावास २.५ लाख अतिरिक्त व्हिसासाठी भेट देणार
18
फिल्मी क्वीनचा लक्झरी 'अंदाज'...! कंगना रणौतनं बंगला विकून काय केलं खरेदी? मोजले तब्बल 3 कोटी
19
विधानसभेसाठी तयारी झाली सुरू! शरद पवारांच्या भेटीसाठी नेत्यांची गर्दी, ठाकरेंच्या नेत्याने घेतली भेट
20
भाजपाला दिली २१ जागांची यादी, ३ महामंडळेही हवी; तिसऱ्या आघाडीवर रामदास आठवले म्हणाले...

स्मार्ट मीटरला ठेकेदार मिळेना

By admin | Published: July 09, 2017 1:56 AM

आधी हायटेक, नंतर स्मार्ट आणि त्यानंतर पुन्हा सेमी आॅटोमेटीक मीटर अशारितीने मागील ११ वर्षे पालिका नळजोडण्यांवर मीटर बसविण्यासाठी विविध पद्धतीने निविदा

- अजित मांडके । लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : आधी हायटेक, नंतर स्मार्ट आणि त्यानंतर पुन्हा सेमी आॅटोमेटीक मीटर अशारितीने मागील ११ वर्षे पालिका नळजोडण्यांवर मीटर बसविण्यासाठी विविध पद्धतीने निविदा काढत आहे. परंतु, अद्यापही पालिकेला यामध्ये यश आलेले नाही. स्मार्ट मीटरची योजना फसल्याने पालिकेने सेमी आॅटोमेटीक मीटरची योजना पुढे आणली. सुरुवातीला पीपीपी तत्त्वावर ती योजना राबविण्यात येणार होती. परंतु, त्याला प्रतिसाद न मिळाल्याने तिचा तब्बल ७० टक्के खर्च उचलण्याची तयारी पालिकेने केली होती. परंतु,तरीदेखील त्यात यश न आल्याने स्मार्ट सिटीचे स्वप्न बघणाऱ्या महापालिकेच्या या स्मार्ट मीटर बसविण्याच्या प्रक्रियेलाच खीळ बसली आहे.पाणीगळती आणि पाणीचोरी रोखण्यासाठी तसेच पाण्याच्या बिलांची योग्य प्रकारे वसुली व्हावी या उद्देशाने महापालिकेने मीटर बसविण्याचा प्रस्ताव गेल्या काही वर्षांपूर्वी पुढे आणला होता. त्यानुसार प्रथम हायटेक स्वरुपाचे परदेशी तंत्रज्ञानाचे मीटर बसविण्याचे निश्चित केले होते. यासाठी ३५ कोटींचा निधी खर्च केला होता. परंतु, तत्कालीन आयुक्त आर. ए. राजीव या योजनेविषयी साशंक होते. दरम्यान, त्यांची बदली होऊन त्यांच्या जागी आलेले आयुक्त असीम गुप्ता यांनी या योजनेचा गाशा गुंडाळला. मुंबईत एमआरए पद्धतीची मीटर बसविण्यासाठी अधिक पैसे खर्च लागले होते. परंतु तरीही ते फारसे यशस्वी ठरले नव्हते. त्यामुळे मुंबई महापालिकेचा हा अनुभव पाहता आयुक्तांनी ही योजनाच बंद केली. दरम्यान, ए. आर. एमचे सेमी आॅटोमेटीक मीटर बसविण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार या कामाच्या निविदा मागील वर्षी मागविल्या होत्या. हे रोड मॉडेल पीपीपी तत्वावर राबविण्याचा निर्णयदेखील झाला होता. त्यानुसार या निविदा अंतिम झाल्यानंतर साधारणपणे मार्चपर्यंत म्हणजेच नव्या वर्षात १५ हजार ५०० नळजोडण्यांवर हे मीटर बसविले जाणार होते. यासाठी १२.५० कोटींची तरतूद आहे. वाणिज्य वापराच्या मीटरवर यापूर्वीच मीटर बसवले असून, आता एक इंचाची जलवाहिनी असलेल्या जोडण्यांवर हे मीटर बसविले जाणार आहेत. यामध्ये पालिकेचे कर्मचारी प्रत्येक घरी जाऊन, मीटरचे रिडिंग घेणार होते. परंतु, त्यातही यश आलेले नाही. या साठी तीन वेळा मुदतवाढ देऊनही ठेकेदार न आल्याने पालिकेने यात बदल करुन ७० टक्के पालिका आणि ३० टक्के खर्च हा ठेकेदाराने करावयाचा अशा पद्धतीने यात बदल केले. त्यानुसार या निविदेलादेखील तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली. परंतु, त्यातही महापालिकेला यश आलेले नाही.सध्या पालिकेच्या दप्तरी ५ हजार वाणिज्य वापराचे ग्राहक असून घरगुती, इमारतीधारक असे एकूण १ लाख ३० हजार ग्राहक आहेत. आता टप्प्याटप्प्याने, या सर्वच जोडण्यांवर मीटर बसविले जाणार आहेत. मात्र, आता स्मार्ट शहरातील जोडण्यांवर मीटर बसणार की नाही? याबाबत महापालिकेचा पाणी विभागाचे संभ्रमावस्थेत असल्याचे दिसून आले आहे.