शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

पत्रीपुलाचे काम लवकर मार्गी लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 00:26 IST

एकनाथ शिंदे : भिवंडी-कल्याण-शीळ रस्त्याच्या कामाचाही घेतला आढावा

कल्याण : भिवंडी-कल्याण-शीळ रस्त्याचे सहापदरीकरण तसेच कल्याणच्या पत्रीपुलाचे काम लवकरात लवकर मार्गी लावा, असे आदेश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना सोमवारी दिले.

भिवंडी-कल्याण-शीळ सहापदरीकरणाच्या कामासह पत्रीपुलाच्या कामाची पाहणी शिंदे यांनी सोमवारी केली. यावेळी त्यांच्यासोबत कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार सुभाष भोईर, राज्य रस्ते विकास महामंडळ आणि महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.शीळ येथून सहापदरीकरणाच्या कामाची पाहणी पालकमंत्र्यांनी सुरू केली. भिवंडी-शीळ-कल्याण रस्त्यावरील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी हा रस्ता सहापदरी करण्याच्या कामाचा शुभारंभ ३० डिसेंबर २०१८ ला पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. याचवेळी पत्रीपुलाच्या नव्या उभारणीसाठीच्या कामाचाही शुभारंभ करण्यात आला. भिवंडी-कल्याण-शीळ रस्त्याच्या सहापदरीकरणाच्या कामासाठी ३९० कोटी रुपये मंजूर आहेत. त्यापैकी १५० कोटी सार्वजनिक बांधकाम विभाग व २४० कोटी रुपये राज्य रस्ते विकास महामंडळाकडून खर्च केले जाणार आहेत. सध्या हा रस्ता चारपदरी असून, त्याचे सहापदरीकरण करण्याच्या कामास सुरुवात झाली आहे. मात्र, हे काम संथगतीने सुरू आहे. अनेक ठिकाणी दुतर्फा गटारे तयार केलेली नाहीत. या प्रकल्पासाठी भूसंपादन करण्यात आले आहे. मात्र, काही ठिकाणी सहापदरीकरणाच्या कामाला सुरुवात झालेली नाही. ते तातडीने करावे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना १५ मीटरचा रस्ता हवा. त्यानुसार, हा रस्ता सहापदरीकरणामुळे एकूण ३० मीटर रुंदीचा असावा. त्यासाठी आज काही ठिकाणी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत मोजमाप करण्यात आले. रस्त्याच्या पाहणीनंतर शिंदे यांनी पत्रीपुलाच्या कामाचा आढावा घेतला. पुलाची प्रत्यक्ष पाहणी केली. पूल उभारण्यासाठी पुलाचे आधारखांब उभारण्याचे काम सुरू झाले आहे. पुलाच्या वरचा भाग हैदराबाद येथे तयार करण्यात येत आहे. पत्रीपुलाचे काम मार्च २०२० अखेर पूर्ण करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत असले, तरी हे काम डिसेंबर २०१९ अखेर पूर्ण करण्याचे लक्ष्य अधिकारीवर्गाने डोळ्यांसमोर ठेवून हे काम गतीने मार्गी लावावे, असे आदेश पालकमंत्र्यांनी दिले.बदलापूर जंक्शन येथे हवा उड्डाणपूलकल्याण-शीळ रस्त्यावर काटई गावानजीक असलेल्या बदलापूर जंक्शनकडून एक रस्ता अंबरनाथमार्गे बदलापूरला जातो. बदलापूर जंक्शन ते पलावा जंक्शन यादरम्यान वाहतूककोंडी होते. तेथे एक एलिव्हेटेड मार्गिका असावी. त्यामुळे या जंक्शनपासून पलावापर्यंत वाहतूककोंडी होणार नाही, अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली. त्यावर नक्कीच विचार केला जाईल, असे आश्वासन पालकमंत्री शिंदे यांनी दिले आहे.

टॅग्स :kalyanकल्याणthaneठाणे