शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारचं कामगारांना मोठं गिफ्ट! महिन्याला मिळतील ₹26000, कसं ते समजून घ्या
2
एमबीबीएस विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! एक कुटुंब दत्तक घ्यावे लागणार
3
डझनभर वंदे भारत ट्रेन ठरतायत पांढरा हत्ती; निम्म्या जागाही भरताना मुश्कील, महाराष्ट्रातील एक...
4
१५०० घरांची झडती, १०० पोलीस, प्लास्टिक कंटेनर...; ५ वर्षांच्या मुलीसोबत थरकाप उडवणारं कृत्य
5
"...नाहीतर अदानींकडून काॅन्ट्रॅक्ट काढून घेऊ", फडणवीसांचं धारावी प्रकल्पाबद्दल मोठं विधान
6
IND vs BAN, 2nd Test : जबरदस्त कॅच! पुन्हा पुन्हा रिप्लाय अन् जैस्वालचा प्रयत्न ठरला 'यशस्वी' (VIDEO)
7
"मी सिनेमा काढणार", संजय राऊतांनी नावही केले जाहीर; काय बोलले?
8
Vedanta Group : भंगार विकता विकता उभा केला कोट्यवधींचा व्यवसाय; पाहा Vedanta ची सुरूवात कशी झाली?
9
शेख हसिनांच्या विरोधात कोणी कारस्थान रचले? युनूसनी अमेरिकेत भर मंचावर नाव सांगितले
10
Exclusive: प्रिया बापटची Bigg Boss वर प्रतिक्रिया, म्हणाली, "तीनच लोक खरे वाटतात ते म्हणजे..."
11
स्टंटबाजीमुळे कालव्यात पडली कार; पोलिसांची मोठी कारवाई, ५ तरुणांची जेलमध्ये रवानगी
12
"अरबाजचा साखरपुडा झालाय वाटतं", आईचा मोठा गौप्यस्फोट ऐकून हादरली निक्की! अरबाजचे कपडे घेतले अन्...
13
शरद पवार, उद्धव ठाकरे, सोनिया गांधी, कुणी दिली होती पंतप्रधान पदाची ऑफर? नितीन गडकरी म्हणाले...
14
IPL 2025 : शाहरुखच्या KKR नं खेळला मोठा डाव; MS धोनीच्या सहकाऱ्यानं घेतली गौतम गंभीरची जागा
15
'आदिपुरुष'मधील रावणाच्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलला सैफ, म्हणतो- "आपण धर्मापासून लांबच..."
16
आता शेअर विकल्यास केवळ द्यावे लागणार ३.५ रुपये; कोट्यवधी गुंतवणूकदारांना फायदा; काय आहे नवा नियम?
17
Maharashtra Politics : 'अमित शहांना पवार, ठाकरेंना राजकीयदृष्ट्या संपवण्याचे डोहाळे लागलेत'; ठाकरे गटाचा सामनातून हल्लाबोल
18
Tax Rule Changes : गॅस सिलिंडरपासून क्रेडिट कार्डापर्यंत, १ ऑक्टोबरपासून होणार 'हे' ५ बदल; खिशावर होणार परिणाम
19
India vs Bangladesh, 2nd Test : रोहितनं टॉस जिंकला, 'नो चेंज' म्हणत पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय
20
आधी पॅरिस, आता अबू धाबी; ऐश्वर्यासोबत लेकीची परदेशवारी; नेटकरी म्हणतात, 'शाळा नाही...'

लक्ष्मी नदी पात्र व इकोसेन्सेटेटिव्ह झोनमध्ये झालेला वारेमाप भराव, बांधकामाने बुडतोय घोडबंदर मार्ग 

By धीरज परब | Published: July 29, 2023 7:41 PM

बेकायदेशीर भराव व बांधकामांमुळे ही पूरस्थिती निर्माण होत आहे . 

लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड - केवळ मुंबई - ठाणे - पालघर जिल्हाच नव्हे तर देशभराला जोडणारा चेणे व वरसावे भागातील घोडबंदर महामार्ग हा गेल्या काही वर्षां पासून दरपावसाळ्यात पाण्यात बुडून वाहतूक बंद होण्याची नामुश्की सरकार व महापालिकेवर ओढवत आहे .  लक्ष्मी नदी पात्रा सह परिसरातील नैसर्गिक ओढे तसेच इकोसेन्सेटिव्ह क्षेत्रात झालेल्या बेकायदेशीर भराव व बांधकामां मुळे हि पूरस्थिती निर्माण होत आहे . 

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील डोंगरांच्या कुशीत वसलेल्या मीरा भाईंदर महापालिका हद्दीतील काजूपाडा , चेणे , वरसावे  हि गावे निसर्गरम्य अशी आहेत . घनदाट हिरवळ व डोंगर परिसरात वसलेल्या ह्या निसर्गरम्य परिसरावर गेल्या काही वर्षात हॉटेल व्यावसायिक , राजकारणी आदींची वक्रदृष्टी पडली आहे . आदिवासी बहुल भाग असून देखील आदिवासींच्या जमिनींवर बेकायदा बांधकामे उभी राहण्या पासून त्यांच्या जमिनी विविध गैरमार्गाने बळकावल्या जात आहेत . 

वरसावे भागात डोंगरांवरून येणारे पाणी हे खालील कांदळवन तसेच पाणथळ क्षेत्रात साचून रहायचे . येथे सरकारी तलाव भरणी करून बुझवला गेला . सीआरझेड आणि इकोसेन्सेटिव्ह क्षेत्र असून देखील या ठिकाणी वारेमाप भराव करून डोंगर फोडले , भरणी करून बांधकामे व भूखंड तयार केले गेले आहेत . नैसर्गिक ओढे नष्ट केले गेले . त्यामुळे पावसाळ्यात डोंगरावरून येणारे पाण्याचे लोंढे सामावून घेण्याचे क्षेत्रच नष्ट झाल्याने पाणी हे फाउंटन ते जुन्या टोलनाका दरम्यानच्या घोडबंदर मार्गावर मोठ्या प्रमाणात तुंबून राहते . 

काजूपाडा , चेणे भागातील परिस्थिती सुद्धा बिकट झाली असून घोडबंदर मार्गावर वाहतूक बंद करावी लागते . येथे देखील इकोसेन्सेटिव्ह व कांदळवन - सीआरझेड क्षेत्रात तसेच लक्ष्मी नदीच्या पात्र - परिसरात प्रचंड प्रमाणात बेकायदा भराव केले गेले आहेत . भराव करून अनेक हॉटेल व बांधकामे, झोपडपट्टी उभारली गेली आहेत . हे सर्व करताना नैसर्गिक ओढे - नाले बुझवले वा अरुंद केले गेले . लक्ष्मी नदी पात्रात भराव प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल होऊन न्यायालयाने देखील कार्यवाही चे आदेश दिले होते . परंतु याचिकाकर्त्याने त्याचे या भागातील जमीन व घर विकून टाकत याची मागे घेतली . 

पावसाळ्यात दरवर्षी घोडबंदर मार्ग पाणी तुंबल्याने वाहतुकीसाठी बंद होऊन लोकांना तासन तास वाहनांत अडकून पडावे लागत आहे . त्यांचे हाल होत आहेत . विशेष म्हणजे कायदे - नियमांसह न्यायालयांच्या आदेशांचे उल्लंघन होऊन बेकायदा भराव आणि बांधकामे होत असताना प्रशासनाच्या संगनमताने ठोस कारवाई होत नसल्याने घोडबंदर सारखा महत्वाचा महामार्ग पाण्याखाली जाऊन वाहतूक बंद करण्याची नामुष्की ओढवत आहे . 

येथील डोंगर फोडणे व झाडे नष्ट करणे, नैसर्गिक तसेच इकोसेन्सेटिव्ह क्षेत्र , लक्ष्मी नदी पात्र , पाणथळ , कांदळवन - सीआरझेड क्षेत्रात झालेल्या भराव व बांधकामां प्रकरणी गुन्हे दाखल करून भराव - बांधकामे काढून घेण्याची मागणी होत आहे . 

टॅग्स :thaneठाणेMira Bhayanderमीरा-भाईंदर