शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे तर व्होट कटिंग मशिन..."; 'परिवर्तन महाशक्ती' तिसऱ्या आघाडीवर संजय राऊत बरसले
2
भाजपाची ऑफर नाकारली, काँग्रेसमध्ये घरवापसी; खतगावकरांचा पुढचा प्लॅन ठरला?
3
Kolkata Doctor Case : "मृत्यूच्या काही तास आधी लेकीशी बोललो होतो..."; डॉक्टरच्या वडिलांनी CBI ला केली 'ही' विनंती
4
वडीगोद्री ते जालना मार्गावर बस - टेम्पोचा भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, १७ जखमी
5
Exclusive: 'युध्रा' मधून साऊथ ब्युटीचं हिंदीत पदार्पण, म्हणाली, "सिनेमात केवळ बाहुली बनून..."
6
अयोध्येत पुन्हा होणार प्राणप्रतिष्ठापना, २२ जानेवारीचा मुहुर्त, तयारीला सुरुवात, नेमकं काय होणार?
7
'बिग बॉसचे पहिले 4 सिझन गाजले नाहीत', केदार शिंदेंच्या वक्तव्यावर मेघा धाडेची लक्षवेधी कमेंट
8
तिरुपती लाडू प्रकरण : पवन कल्याण म्हणाले, "आता सनातन धर्म रक्षण बोर्ड स्थापन करण्याची वेळ आलीय"
9
'या' कंपनीच्या गोल्ड लोन व्यवहारावरील बंदी हटवली; रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय; शेअरमध्ये तुफान तेजी
10
शिवसेना-भाजपा वाद संपेना; आमदार योगेश कदमांविरोधात भाजपा पदाधिकारी संतापले
11
४०० पारचा प्रयत्न फसला; ३७ धावांत ४ विकेट्स! ३७६ धावसंख्येवर आटोपला टीम इंडियाचा पहिला डाव
12
जुना अनुभव फार डेंजर, बॅकअप प्लॅन तयार ठेवलाय; अपक्ष आमदाराचा महायुतीला सूचक इशारा
13
Piccadily Agro Share : ही तर कमालच! १ लाखांचे झाले १ कोटी रुपये, मद्य तयार करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
14
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
15
Post Office Saving Scheme : Post Office ची सुपरहिट स्कीम! ५ वर्षांपर्यंत दर महिन्याला मिळतील ₹९,२५०; पाहा स्कीमचे फायदे
16
iPhone 16 ची भारतात विक्री सुरू होताच खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड; मुंबई, दिल्लीत लागल्या रांगा  
17
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
18
मारु का सोडू? संभ्रमात पडल्यामुळं फसला जड्डू! शतकासह 'द्विशतकी' डावही हुकला
19
Aadhaar Card : Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
20
उर्वशी रौतेला क्रिकेटर ऋषभ पंतला करतेय डेट? अभिनेत्री म्हणाली...

जिल्ह्यात मुलींची बाजी

By admin | Published: May 27, 2015 10:53 PM

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाने फेब्रुवारी २०१५ मध्ये घेतलेल्या बारावी परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर झाला आहे.

अलिबाग : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाने फेब्रुवारी २०१५ मध्ये घेतलेल्या बारावी परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर झाला आहे. यात रायगड जिल्ह्याचा निकाल ९०.३६ टक्के लागला असून सर्वच तालुक्यांत मुलींनी बाजी मारली आहे. पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी निकाल ४७.०५ टक्के लागला आहे. जिल्ह्यातील अलिबाग, पनवेल, मुरुड, माणगांव, श्रीवर्धन, म्हसळा आणि महाड या सात तालुक्यांचा निकाल ९० टक्केपेक्षा अधिक तर उरण, कर्जत, सुधागड, पेण, रोहा, तळा व पोलादपूर तालुक्याचा निकाल ८० टक्केपेक्षा अधिक लागला आहे. केवळ खालापूर तालुका काहीसा पिछाडीवर गेला असून या तालुक्याचा निकाल ७६.९२ टक्के लागला आहे. रायगड जिल्ह्यातील बारावीसाठी १४ हजार ९५३ मुले तर १३ हजार ५३८ मुली असे एकूण २८ हजार ४९१ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी १२ हजार ९४५ मुले तर १२ हजार ७९९ मुली असे एकूण २५ हजार ७४४ परीक्षार्थी उत्तीर्ण झाले आहेत. म्हणजेच ८६.५७ टक्के मुले तर ९४.५४ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या असून संपूर्ण जिल्ह्याचा निकाल ९०.३६ टक्के आहे. जिल्ह्यात २ हजार ४३८ विद्यार्थी पुनर्परीक्षार्थी होते. त्यापैकी १ हजार १४७ उत्तीर्ण झाले असून हे प्रमाण ४७.०५ टक्के आहे.विज्ञान शाखा निकालात प्रथम क्रमांकावर असून या शाखेचा निकाल ९४.३१ टक्के लागला आहे. जिल्ह्यातील एकूण २८ हजार ४९१ परीक्षार्थींमध्ये विज्ञान शाखेचे ९ हजार ५८४ परीक्षार्थी होते. त्यापैकी ४३४ विशेष गुणवत्ता श्रेणीत, २ हजार ३५९ प्रथम, ५ हजार ७०१ द्वितीय तर ५४५ उत्तीर्ण श्रेणीत असे एकूण ९ हजार ३९ परीक्षार्थी उत्तीर्ण झाले आहेत. वाणिज्य शाखेचा निकाल ९२.५० टक्के लागला असून एकूण ९ हजार ६९९ परीक्षार्थींपैकी ६८६ विशेष गुणवत्ता श्रेणीत, ३ हजार २२१ प्रथम, ४ हजार ५८८ व्दितीय तर ४७७ उत्तीर्ण श्रेणीत असे एकूण ८ हजार ९७२ परीक्षार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उच्च व्यवसाय अभ्यास (व्होकेशनल) शाखा निकालात तृतीय क्रमांकावर असून ८८.९५ टक्के निकाल लागला आहे. या शाखेचे ८६९ परीक्षार्थी होते, पैकी २२ विशेष गुणवत्ता श्रेणीत, २४८ प्रथम, ४८७ व्दितीय, १६ उत्तीर्ण श्रेणीत असे एकूण ७७३ परीक्षार्थी उत्तीर्ण झाले आहेत.कला शाखेचा निकाल ८३.४६ टक्के लागला आहे. या शाखेत एकूण ८ हजार ३३९ परीक्षार्थी होते, पैकी ११९ विशेष गुणवत्ता श्रेणीत, १ हजार ६८४ प्रथम, ४ हजार ३८७ द्वितीय, ४७७ उत्तीर्ण श्रेणीत असे एकूण ६ हजार ९६० परीक्षार्थी उत्तीर्ण झाले आहेत. (विशेष प्रतिनिधी)नागोठणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाचा निकाल बुधवारी जाहीर झाला. येथील कोएसोच्या कै. सरेमल प्रतापमल जैन उच्च माध्यमिक शाळेचा निकाल ८१.४९ टक्के लागला. कला, वाणिज्य आणि विज्ञान या शाखेचे परीक्षेस बसलेले ३६२ पैकी २९५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. नागोठणे एज्युकेशन सोसायटीच्या उर्दू उच्च माध्यमिक शाळेचा निकाल ७३ टक्के इतका लागला असून ४३ पैकी ३० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कला शाखेतून शिमना अक्र म अन्सारी (प्रथम), झैबा अनिस अधिकारी (द्वितीय)आणि रफत हमीद चोरडेकर (तृतीय) तर वाणिज्य शाखेतून मोईन महमद चोगले (प्रथम), असद सलीम शिंदी (द्वितीय), माज मिर्झा पठाण (तृतीय) असे क्र मांक मिळविले. येथील भारतीय एज्युकेशन सोसायटीच्या एस. डी.परमार इंग्लिश स्कूलचा निकाल ६४ टक्के लागला असून २८ पैकी १८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेत आकांक्षा चौधरी (प्रथम), कौशल पटेल (द्वितीय) आले आहेत. कोकण एज्युकेशन सोसायटीचा निकाल ९३.२४ टक्केकोकणातील सर्वात मोठी शिक्षण संस्था असणाऱ्या कोकण एज्युकेशन सोयायटीचा निकाल ९३.२४ टक्के लागला असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष संजय दत्ता पाटील यांनी दिली. संस्थेच्या १२ कनिष्ठ महाविद्यालयातून एकूण ७ हजार ८६३ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी ९३.२४ टक्के उत्तीर्ण झाले आहेत. संस्थेच्या अलिबाग येथील केईएस इंग्रजी मिडीयम कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला आहे.