शहरं
Join us  
Trending Stories
1
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
2
दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
3
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
4
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
5
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
6
परदेशात जाऊन आपल्या देशाचा अपमान करणाऱ्यांना जनतेने धडा शिकवला- अमित शाह
7
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
8
'तेरे करके' पेक्षा No Look Shot ची चर्चा; नताशाच्या पोस्टवर 'हार्दिक' कमेंटचं ट्विस्ट
9
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
10
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
11
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
12
"हा विजय केवळ मोदीजींमुळेच शक्य झाला"; हरयाणाच्या निकालानंतर मुख्यमंत्री सैनी यांचे विधान
13
Haryana, Jammu & Kashmir Assembly Election Results 2024 Live: काँग्रेसचे 'खटाखट-खटाखट' मॉडेल फेल: अनुराग ठाकूर
14
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?
15
'आजच बारामतीचा उमेदवार जाहीर करा'; अजित पवार म्हणाले, "तुमच्या मनातील..."
16
"कुठे आम्ही ६० जागा जिंकण्याच्या बाता मारत होतो आणि…’’, निकालांबाबत कुमारी शैलजा म्हणाल्या
17
जम्मू-काश्मीरच्या 'या' सात जागांवर काँग्रेस आणि एनसीत मैत्रीपूर्ण लढत; जाणून घ्या निकाल...
18
"मल्लिकार्जुन खर्गेजी पत्ता सांगा, 'ती' जिलेबी...", भाजप खासदार तथा केंद्रीय मंत्र्याचा राहुल गांधींना बोचरा टोला
19
नवी मुंबईत महायुतीला झटका, शिंदेसेनेत बंडखोरी होणार, विजय नाहटा तुतारी हातात घेणार
20
काँग्रेसचा हरयाणात पराभव; कुमारी शैलजा म्हणाल्या,'वेळेवर मौन बाळगणे..."

उल्हासनगर महापालिका ठेक्यावर देण्यासाठी शासनाला प्रस्ताव द्या, ठाकरे गटाची मागणी

By सदानंद नाईक | Published: April 28, 2023 7:38 PM

महापालिकेच्या सुरक्षा विभाग, अग्निशमन विभागात ९० टक्के पदे रिक्त असल्याने, दोन्ही विभाग कंत्राटी कर्मचाऱ्याच्या हातात जाण्याची शक्यता निर्माण झाली.

उल्हासनगर : महापालिका हद्दीतील कोट्यवधीच्या विकास कामावर देखरेखीसाठी पुरेशा अधिकारी वर्ग, अभियंता नसल्याने, महापालिका ठेकेदारामार्फत चालविण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव देण्याचे निवेदन शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हासमन्वयक धनंजय बोडारे यांनी आयुक्तांना देऊन महापालिका कारभाराचे वाभाळे काढले. 

उल्हासनगर महापालिकेने प्रभाग समिती क्रं-३ अंतर्गत साफसफाईचे खाजगीकरण यापूर्वीच केले असून त्याचा कित्ता गिरविण्यात येत असल्याचा आरोप शहरातून होत आहे. शहरातील कोट्यावधीच्या विकास कामावर देखरेख ठेवण्यासाठी महापालिकेकडे अभियंता नसल्याने, कंत्राटी अभियंता घेण्याची वेळ आल्याची टीका बोडारे यांनी केली. दोन उपायुक्त, ६ सहायक आयुक्त, अग्निशमन अधिकारी, सुरक्षा अधिकारी, शहर अभियंता, पाणी पुरवठा, बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, विधुत विभाग, करनिर्धारक संकलक, विधी अधिकारी, महापालिका सचिव, वैधकीय अधिकारी, मालमत्ता व्यवस्थापक, नगररचनाकार संचालक यांच्यासह बहुतांश अभियंताचें पदे रिक्त आहेत. अधिकाऱ्यांचे ७० तर कर्मचाऱ्यांचे ४० टक्के पदे रिक्त असणाऱ्या महापालिकेला कारभार कंत्राटी अभियंता व कर्मचारी यांच्या हातात जाण्याची भीती बोडारे यांनी व्यक्त करून होत असलेल्या विकास कामावर प्रश्नचिन्हे उपस्थित केला.

महापालिकेच्या सुरक्षा विभाग, अग्निशमन विभागात ९० टक्के पदे रिक्त असल्याने, दोन्ही विभाग कंत्राटी कर्मचाऱ्याच्या हातात जाण्याची शक्यता निर्माण झाली. दुसरीकडे पाणी पुरवठा, बांधकाम विभाग, विधुत विभागासह इतर विभागात हजारो कोटीचे विकास कामे सुरू आहेत. मात्र त्यावर देखरेख ठेवण्यासाठी महापालिकेकडे अभियंते नसल्याने, विकास कामावर प्रश्नचिन्हे उभे ठाकले आहेत. महापालिका अभियंतेची ९० टक्के पदे रिक्त आहेत. कंत्राटी पद्धतीने नियुक्त केलेल्या अभियंतेचे ठेकेदार, महापालिका अधिकारी व राजकीय नेते ऐकणार का? असा प्रश्न बोडारे यांनी केला. सर्वच विभागात कंत्राटी कामगार घेतले जात असल्याने, महापालिकेची वाटचाल खाजगीकरणाकडे सुरू आहे. प्रभाग समिती क्रं-३ अंतर्गत साफसफाईचे यापूर्वीच खाजगीकरण केले असून महापालिका ठेक्यावर द्या, असे शासनाला निवेदन देण्याची मागणी आयुक्त अजीज शेख यांच्याकडे बोडारे यांनी केली. 

हजारो कोटींची विकास कामे कोणासाठी?महापालिका विकास कामचें उदघाटन व लोकार्पण करण्यासाठी यापूर्वी आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या सहा महिन्यात १२६१ कोटी रुपये शहर विकास कामासाठी दिल्याचे सांगितले. मग त्यावर देखरेख करण्यासाठी महापालिका अधिकारी व अभियंते नको का? असा प्रश्न बोडारे यांनी केला आहे.