शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ भाजपला द्या; कोअर कमिटीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 23:33 IST

गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप स्वतंत्रपणे लढल्यावरही भाजपचा अवघ्या दोन हजार मतांनी पराभव झाला होता.

अंबरनाथ : अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ हा पूर्वी भाजपकडे होता. या मतदारसंघातून भाजपचे आमदार विधानसभेवर गेले होते. मात्र, नंतर युतीधर्मात हा मतदारसंघ शिवसेनेकडे गेला. त्यामुळे आता आगामी विधानसभा निवडणुकीत हा मतदारसंघ पुन्हा भाजपकडे यावा, अशी आग्रही मागणी अंबरनाथमधील कार्यकर्ते करत आहेत. यासंदर्भात भाजप कोअर कमिटीच्या सदस्यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत हा मतदारसंघ भाजपकडे देण्याची मागणी केली आहे. तसेच यासंदर्भात मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांकडे मागणी करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप स्वतंत्रपणे लढल्यावरही भाजपचा अवघ्या दोन हजार मतांनी पराभव झाला होता. त्यामुळे या मतदारसंघामध्ये भाजपचे मतदार वाढले असून चार वर्षांत भाजपची ताकदही वाढली आहे. या वाढलेल्या ताकदीचा विचार करून वरिष्ठांकडे हा मतदारसंघ मागण्यात येत असल्याचे कमिटी सदस्या पूर्णिमा कबरे यांनी स्पष्ट केले आहे.

अंबरनाथ मतदारसंघ १९७८ पासून भाजपचा (जनसंघ) बालेकिल्ला होता. त्याकाळी प्रा. राम कापसे, जगन्नाथ पाटील आदींनी अंबरनाथ मतदारसंघाचे नेतृत्व केले होते. यानंतर, शिवसेना-भाजपतील अंतर्गत तडजोडीमुळे अंबरनाथ मतदारसंघ शिवसेनेला देण्यात आला. तेव्हापासून अंबरनाथ मतदारसंघात शिवसेनेचे आमदार आणि खासदार प्रतिनिधित्व करत आहेत. मागील निवडणुकीत शिवसेना व भाजप यांच्यात युती न झाल्याने भाजपचे उमेदवार राजेश वानखेडे यांचा निसटता पराभव झाला. आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्याविषयी कोणत्याही प्रकारची नाराजी नसल्याचे तारमळे यांनी सांगितले.

टॅग्स :BJPभाजपा