शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

झोडपट्टीतील नागरीकांना ३०० युनिट पर्यंत मोफत वीज द्या, उध्दव सेनेचे ठाण्यात आंदोलन

By अजित मांडके | Updated: July 2, 2024 15:36 IST

ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करून महाराष्ट्र विद्युत मंडळाचे अधीक्षक अभियंता युवराज मेश्राम यांना निवेदन देण्यात आले.

ठाणे : ठाणे शहरातील जुन्या चाळी आणि झोपडपट्टीत राहणाºया सर्वसामान्य जनतेला दिल्ली सरकारच्या प्रमाणे ३०० युनिट पर्यंत वीज मोफत द्यावी, या मागणीसाठी उध्दव सेनेच्या वतीने मंगळवारी वागळे इस्टेट येथील महावितरणच्या कार्यालयावर आंदोलन करण्यात आले. ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करून महाराष्ट्र विद्युत मंडळाचे अधीक्षक अभियंता युवराज मेश्राम यांना निवेदन देण्यात आले.

सध्याच्या परिस्थितीत वीज दरवाढीमुळे नागरिकांवर आर्थिक ताण येत आहे. जुन्या चाळी आणि झोपडपट्टीत राहणाºया नागरिकांची आर्थिक परिस्थिती बेताची असते. अशा परिस्थितीत वीज दरवाढ जास्त असल्यामुळे आर्थिक भार वाढला असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. वीज दरवाढ जास्त असल्याने लोकांच्या जीवनशैलीवर विपरीत परिणाम होत आहे. वीज हा एक मूलभूत गरज असून, त्याची किंमत वाजवी आणि सर्वसामान्यांच्या आवाक्यात असावी. त्यामुळे ठाणे शहरातील जुन्या चाळी, गावठाण आणि झोपडपट्टी परिसरात राहणाºया सर्वसामान्य जनतेसाठी दिल्ली सरकारच्या धर्तीवर ३०० युनिट पर्यंत वीज मोफत द्यावी. या मागणीचा विचार न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा केदार दिघे यांनी दिला.

याप्रसंगी उपजिल्हा प्रमुख संजय घाडीगावकर, जिल्हा संघातिका समिधा मोहिते, जिल्हा संघटिका आकांक्षा राणे, शहर प्रमुख प्रदीप शिंदे,  यांच्यासह सर्व विभाग प्रमुख, उप विभाग प्रमुख, शाखा प्रमुख, महिला आघाडी तसेच समस्त शिवसैनिक उपस्थित होते.

वीज दरवाढीमुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष आहे. महायुतीच्या चुकीच्या नियोजनामुळे वीज दरवाढ झाली असून सर्वसामान्यांना जास्तीची किंमत मोजावी लागत आहे. वीज दरवाढीमुळे आर्थिक ताण देखील सहन करावा लागतो आहे. त्यामुळे ठाणे शहर परिसरातील जुन्या चाळी आणि झोपडपट्टीतील नागरिकांसाठी ३०० युनिट पर्यंत वीज मोफत देण्याची आमची मागणी असल्याचे दिघे यांनी सांगितले. 

टॅग्स :thaneठाणेShiv Senaशिवसेनाmahavitaranमहावितरण