शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंकडून मद्यप्राशन करून शिविगाळ, मराठा आंदोलकांचा आरोप, पुण्यात तणाव  
2
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
3
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
4
बंडखोरी, मुख्यमंत्रिपदावरील दावेदारीसह या ४ मुद्यांनी हरियाणात वाढवलंय भाजपा, काँग्रेसचं टेन्शन
5
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
6
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
7
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
8
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
9
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
10
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
11
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
12
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
13
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
14
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
15
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
17
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
18
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
19
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
20
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?

नेवाळीतील शेतकऱ्यांना दिलासा देणार

By admin | Published: July 09, 2017 1:50 AM

नेवाळी येथील आंदोलनातील एकाही निरपराध शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही. शेतकऱ्यांच्या जमिनींचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी केंद्र सरकारकडे तोडगा

- लोकमत न्यूज नेटवर्क

डेंबिवली : नेवाळी येथील आंदोलनातील एकाही निरपराध शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही. शेतकऱ्यांच्या जमिनींचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी केंद्र सरकारकडे तोडगा काढण्यासाठी मी प्रयत्न करत आहे, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिले, अशी माहिती खासदार कपिल पाटील यांनी दिली.नेवाळी येथे झालेल्या आंदोलनानंतर आगरी, कोळी व कुणबी समाजात अस्वस्थता आहे. त्यासंदर्भात शहरातील सावित्रीबाई फुले कलामंदिरात समाजबांधवांची बैठक झाली. याप्रसंगी समाजातील लोकप्रतिनिधी, उच्चपदस्थ व्यक्ती, डॉक्टर, उद्योगपती, अभियंते आदी उपस्थित होते. या बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेत समाजाच्या पाठिशी उभे राहणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर खासदार पाटील यांनी शनिवारी फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली. त्या वेळी आमदार गणपत गायकवाड, बाळाराम पाटील, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, शिवसेना उपनेते अनंत तरे व सर्वपक्षीय युवा संघर्ष समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. मेळाव्यात व्यक्त झालेला आक्रोश त्यांनी मांडला.भूमिपूत्र असलेल्या आगरी, कोळी व कुणबी समाजाच्या अस्वस्थतेकडे फडणवीस यांचे लक्ष वेधण्यात आले. वर्षानुुवर्षे कसणाऱ्या जमिनीचा त्याग केल्यानंतरही अद्यापी समाजाला संघर्ष करावा लागतो, त्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. त्यावर लवकरच नेवाळीबाबत निर्णय होऊन शेतकऱ्यांसह समाजाला दिलासा मिळेल, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले. संरक्षणमंत्री अरुण जेटली यांच्याशी संपर्क साधून बैठक घेतली जाईल. त्यात नेवाळीबाबत निश्चितच तोडगा निघेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आंदोलनातील एकाही निरपराध व्यक्तींवर कारवाई होणार नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.पोलीस आयुक्तांचाही दिलासा : नेवाळीतील आंदोलनाबाबत निरपराध व्यक्तींना अटक केली जाणार नाही, असे आश्वासन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी दिले. सर्वपक्षीय युवा संघर्ष समितीने शनिवारी त्यांचीही भेट घेतली. गावांमधील वातावरण सामान्य स्थितीत आणण्याचा पोलिसांकडून प्रयत्न केला जात आहे, असे परमबीर सिंग म्हणाल्याचे खासदार पाटील यांनी प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हंटले आहे.