शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा म्हणजे संविधान; राहुल गांधींचा भाजपावर घणाघात
2
सेबी प्रमुख माधबी बूच यांच्या अडचणी वाढल्या, संसदेच्या वरिष्ठ समितीने बजावले समन्स
3
१० रुपयांचं चॉकलेट, देवाचं दर्शन अन्...; अमेठी हत्याकांडात खळबळजनक खुलासा
4
इस्रायल-इराण संघर्षाचा परिणाम भारतावर होणार, सर्वसामान्यांच्या अडचणी वाढणार!
5
भारतीय क्रिकेटरच्या वडीलांची २६ लाखांची फसवणूक; पैसे परत मागताच जीवे मारण्याची धमकी
6
SBI On MTNL: संकटात आली 'ही' सरकारी कंपनी; आता SBI नं केली मोठी कारवाई, शेअर आपटला
7
"पाहिजे तेवढ्या फिती कापा, दीड महिन्याने..."; PM मोदींच्या दौऱ्यावरुन उद्धव ठाकरेंचा घणाघात
8
हार्दिक पांड्याशी घटस्फोटानंतर नताशाचं जबरदस्त कमबॅक, शूटिंग सेटवरील व्हिडिओ समोर
9
शरद पवारांची साथ सोडून काँग्रेसमध्ये गेलेल्या महिला नेत्याशी व्यासपीठावर छेडछाड
10
Bihar Politics : नितीश कुमार यांना भारतरत्न देण्याची मागणी; JDU कडून पोस्टरबाजी; भाजपचाही पाठिंबा
11
अरे देवा! मालगाडीचे २ डबे घसरले; बादल्या, कॅन घेऊन डिझेल लुटण्यासाठी लोकांची झुंबड
12
मैत्रीचा इतिहास: पाकिस्तान कदापी अण्वस्त्रधारी बनू शकला नसता; भारतावर आरोप झाला, इस्रायलने थेट अंगावर घेतला
13
राहुल गांधी कोल्हापूरात पोहचताच उचगावातील कौलारू घरात गेले, तिथे कोणाला भेटले? 
14
Weightless Tips: अमित शाहांनीसुद्धा 'या' पद्धतीने केले २५ किलो वजन कमी; सांगताहेत बाबा रामदेव!
15
IPO च्या तयारीत असलेल्या NSE ला सेबीकडून दिलासा; SEBIच्या इतिहासातील मोठ्या सेटलमेंटसाठी मंजुरी
16
NIA: महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये एनआयएच्या धाडी; जालना, छत्रपती संभाजीनगरमधून तिघांना घेतलं ताब्यात
17
बायकोसाठी गाव सोडणार नाही तर बदलणार! आदिनाथ कोठारेच्या 'पाणी'चा हृदयस्पर्शी ट्रेलर रिलीज
18
करुन दाखवलं! दहावी, बारावी नापास पण वयाच्या २२ व्या वर्षी मिळवलं यश, झाली IAS
19
Navratri Puja Vidhi 2024: इच्छित मनोकामनापूर्ती करणारे 'काम्य व्रत' ललिता पंचमीला कसे करायचे? वाचा!
20
'आनंद आहेच पण आता...'; मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यावर 'हास्यजत्रा'चे दिग्दर्शक सचिन गोस्वामींची मार्मिक पोस्ट

‘अच्छे दिना’तही कावळे घटले, श्राद्धविधी संकटात

By admin | Published: September 23, 2016 2:44 AM

कावळ्यांसाठी सध्या अच्छे दिन आले आहेत. म्हणजेच पितृपक्ष सुरु आहे तरी रावण्या करूनही व इच्छित खाद्य, पेय ठेवले तरी ते पितरांसाठी ठेवलेल्या ताटाला स्पर्श करीत नसल्याने शेवटी

विक्रमगड : कावळ्यांसाठी सध्या अच्छे दिन आले आहेत. म्हणजेच पितृपक्ष सुरु आहे तरी रावण्या करूनही व इच्छित खाद्य, पेय ठेवले तरी ते पितरांसाठी ठेवलेल्या ताटाला स्पर्श करीत नसल्याने शेवटी कंटाळलेल्या आप्तांना नैवेद्य दाखवून श्राद्वाचे भोजन खावे लागते आहे. याला कारण कावळ्यांची घटलेली संख्या ही आहे. कावळे कमी नैवेद्य जास्ती, त्यामुळे खायचे तरी किती? असा प्रश्न कावळ्यांना पडत असावा.गणेशोत्सवानंतर लगेचच पितृ पंधरवडा सुरु होतो़ या दिवसांत आपल्या पूर्वजांना नैवेद्य (घास ठेवण्याची) रुढी परंपरा खूप जुन्या काळापासुन आजही चालत आलेली असून ती ग्रामीण भागत नव्हे तर शहरी भागातही दिसते़ या दिवसांत पितरांना अर्थात कुटुंबातील मृत पावलेल्या व्यक्तींना त्यांच्या आवडीची फळे, वस्तू आणि जेवण (मद्यसुद्धा) वाढून ते कावळयांच्या रुपाने त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याची परंपरा आहे़ त्यासाठी प्रत्येकजण आपल्या घरातील पूर्वजांना त्यांच्या मृत्यू तिथीनुसार नैवेद्य देतो़ या दिवसांत महत्व असते ते कावळयांना. कावळा या नैवेद्याचा घास घेईतो घरातील कुणीही जेवणास बसत नाहीत़आजही बऱ्याच ठिकाणी ही परंपरा जपली जात आहे़ एरवी मिळेल त्यावर गुजराण करणारा हा पक्षी या पंधरवडयात खाऊन सुस्तावलेला दिसून येतो़ सध्याच कावळयांची संख्याच कमी झाल्याने ़पितरांच्या नैवेद्याला शिवण्यासाठी कावळयांना साद घातली तरी ते फिरकेनासे झाले आहेत़ त्यामुळे ब-यांचदा केवळ साकडे घालून किंवा पितरांना नैवैद्य दाखवून जेवण आटपावे लागते़ याचे घरातल्या बुजुर्गाना दु:ख वाटते़ (वार्ताहर)