शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I say to the whole world..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
5
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
6
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
7
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
8
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
9
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
10
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
11
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
12
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
13
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
14
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
15
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
16
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
17
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
18
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
19
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
20
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार

शेतकऱ्यांच्या तोंडाला सरकारने पुसली पाने, नुकसानभरपाई मिळाली नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 01:12 IST

शहापूर तालुक्यात मागीलवर्षी पाऊसच लवकर गेल्याने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करूनही शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली नाही.

भातसानगर - शहापूर तालुक्यात मागीलवर्षी पाऊसच लवकर गेल्याने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करूनही शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली नाही. शेतक-यांच्या तोंडाला सरकारने पाने पुसल्याची माहिती समोर आली आहे. तर यावर्षीची तुटपुंजी मदत कृषी विभागाकडे जमा झाली आहे.काही महिन्यांपूर्वी शेतकºयांच्या खात्यात नुकसानभरपाईची रक्कम जमा झाली. ही रक्कम मागीलवर्षीची होती असा शेतक-यांचा समज झाला. मात्र चौकशीअंती ही २०१७ च्या आॅक्टोबर ची पावसामुळे झालेल्या नुकसानीची मदत असल्याचे स्पष्ट झाले.मागीलवर्षी आॅगस्टमध्येच पाऊस गेल्याने माळरानातील भातशेती पार होरळून गेली होती. या नुकसानीचे पंचनामे होण्याच्या मागणीसाठी माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण केल्या नंतर कृषी विभाग यांच्यामार्फत नुकसानीचे पंचनामेही केले होते. ५० टक्के नुकसान झाल्याचेही तहसीलदार यांनी जाहीरही केले. मात्र सरकारदरबारी याची कोणत्याच प्रकारची दखल घेतली न गेल्याने तालुक्यातील शेतकºयांना एक दमडीही मंजूर करण्यात आली नसल्याचे स्पष्ट झाले.मागीलवर्षी २१९ गावांमध्ये १५ हजार ७२३ हेक्टर पिकाखाली होते. २७ हजार ४४२ शेतकºयांना याचा फटका बसला होता. ३३ टक्क्यापेक्षा अधिक नुकसान शेतकºयांचे झाले होते.मात्र पंचनामे होऊनही शेतकºयांच्या तोंडाला पाने पुसली. २०१७ च्या आॅक्टोबरमध्ये पावसामुळे झालेल्या नुकसानभरपाईची रक्कम २ कोटी ३८ लाखांचे काही महिन्यांपूर्वी वाटप करण्यात आले. यामध्ये २६ हजार ७१८ शेतकºयांना ती वाटप करण्यात आली. मात्र मागीलवर्षीची नुकसानभरपाई मंजूर झाली नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.यावर्षी ३३ टक्के नुकसानीचा अहवाल देण्यात आला असून पिकाखाली क्षेत्र १७ हजार २९.१२ तर नुकसानग्रस्त क्षेत्र ११ हजार ७७६.६७ हेक्टर इतके असून २४ हजार १९० शेतकºयांना त्याचा फटका बसला आहे. यासाठी हेक्टरी ८ हजार इतकी तुटपुंजी मदत सरकारने जाहीर केल्याने शेतकरी निराश झाला आहे.मागीलवर्षी झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. मात्र कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई शेतकºयांना सरकारकडून देण्यात आली नाही.- जे. एस.जायभाय, प्रभारी तालुका कृषी अधिकारी

टॅग्स :Farmerशेतकरीthaneठाणे