शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
2
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
3
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
4
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
5
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
6
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
7
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
8
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
9
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
10
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
11
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
12
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
13
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
14
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
15
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
16
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
17
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
18
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
19
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
20
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?

सरकारी यंत्रणेला फुटला पाझर; जुळ्या मुलांच्या मृत्यूनंतर आढावा, मुख्यमंत्र्यांकडूनही दखल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2022 12:36 PM

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा होत असताना, सरकार आणि आरोग्य यंत्रणेची लक्तरे वेशीवर टांगणारी हृदयद्रावक घटना पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात घडली.

- रवींद्र साळवेमोखाडा : जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात अतिदुर्गम बोटोशी ग्रामपंचायतीमधील मरकटवाडी येथील वंदना बुधर या आदिवासी महिलेच्या जुळ्या बालकांना वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. सरकारी यंत्रणा खडबडून जागी झाली असून आरोग्य आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा आढावा घेतला, तर विविध राजकीय पक्ष आणि संघटनांच्या कार्यकर्त्यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन मदतीचा हात दिला आहे. दरम्यान, ऐन स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमादरम्यान घडलेल्या या घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही गंभीरतेने दखल घेतली आहे. 

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा होत असताना, सरकार आणि आरोग्य यंत्रणेची लक्तरे वेशीवर टांगणारी हृदयद्रावक घटना पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात घडली. मोखाड्यातील अतिदुर्गम बोटोशी ग्रामपंचायतीमधील मरकटवाडी येथील वंदना या आदिवासी महिलेच्या जुळ्या बालकांना वेळेत उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला, तर वंदनाला प्रचंड रक्तस्राव झाल्याने दवाखान्यात नेताना रस्त्याअभावी मुसळधार पावसात डोलीतून तीन किलोमीटर पायपीट करत मुख्य रस्त्यापर्यंत आणावे लागले होते. 

मरकटवाडी येथे जाण्यासाठी अर्थसंकल्पीय कामांमध्ये एक किलोमीटर कामास मंजुरी दिली होती, मात्र राज्यात सत्तांतर झाल्यामुळे कामांना स्थगिती देण्यात आल्यामुळे काम रखडले आहे. याचा फटका स्थानिकांना बसत असून त्यांच्या जीवावर बेतत आहे. 

टॅग्स :Pregnancyप्रेग्नंसीVasai Virarवसई विरारthaneठाणेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारEknath Shindeएकनाथ शिंदे