शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आमदार फोडला; विधानसभा निवडणुकीपूर्वीच मोठा झटका दिला
2
टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने, मालकाला फोन लावला तरी...
3
अमेरिकेनं दिलेल्या 5000 पाउंड वजनाच्या 'स्पेशल गिफ्ट'नं मरला गेला नसरल्लाह! इराणचा मोठा दावा
4
कोल्हापूर : दोन्ही आघाड्यांच्या संभाव्य उमेदवारांचे चित्र स्पष्ट; सहा मतदारसंघात बंडखोरीची शक्यता
5
IND vs BAB, 2nd Test, Day 3 : तिसऱ्या दिवशी तरी खेळाडू मैदानात उतरणार का?
6
कोल्डप्ले तिकिट विक्री वादावर Book My Show चं स्पष्टीकरण; काळाबाजाराचा आरोप
7
मित्राकडून हातपाय बांधले, व्हिडिओ बनवला अन् कुटुंबाकडे मागितले २५ लाख, त्यानंतर...
8
IPL 2025 Player Retention Rules : MI सह CSK च्या मनासारखं; इथं पाहा नवी नियमावली
9
IIFA 2024: शाहरुख ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता तर 'हा' ठरला सर्वोत्कृष्ट सिनेमा, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
10
ही तुमच्या कर्माची फळे, जगाला दोष देऊ नका; भारतानं पाकिस्तानला सुनावले खडे बोल
11
२६ नोव्हेंबरपर्यंत नवे सरकार स्थापन होईल; विधानसभा निवडणूक वेळेत घेण्याचे आयोगाचे संकेत
12
फिनालेला आठवडा असताना बिग बॉस मराठीमध्ये मोठा बदल! ३ ऑक्टोबरपासून या नवीन वेळेत दिसणार
13
अक्षय शिंदे मेला की मारला..? न्याय मिळाला की नाही..?
14
आजचे राशीभविष्य : उत्पन्न वाढेल; मित्रांसाठी खर्च करावा लागेल, त्यांच्याकडून लाभही होईल
15
क्रीडा संकुल हलविण्यामागे शिंदे सरकारचा अप्रामाणिकपणा; सर्वोच्च न्यायालयाचा ठपका
16
फेका’फेक’ थांबवण्याचा ‘लोकशाही’ मार्ग
17
मोठ्या मुलाला १९९७ मध्येच संपविलेले, आता नसरल्ला मारला गेला; मध्य-पूर्वेत संघर्ष वाढणार
18
हायकोर्टाच्या केवळ ९८ न्यायाधीशांनी जाहीर केली संपत्ती; ६५१ न्यायाधीशांकडून मात्र मौनच
19
भारत हे वरदान अन् इराण हा शाप !; संयुक्त राष्ट्रांत इस्रायली पंतप्रधान नेतान्याहू यांनी दाखवले नकाशे
20
मानवी मूत्राचे शुद्ध पाणी बनविणारी ‘ब्रिफकेस’; ‘इस्राे’च्या मानवी ‘गगनयान’मध्ये उपयाेगी हाेईल तंत्रज्ञान

ठाणे जिल्ह्यातील कुपोषित बालकांकडे सरकारचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2021 4:24 AM

लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : ठाणे जिल्ह्यात ९९ कुपोषित बालके कोरोना काळात दगावली आहे. मध्यम स्वरुपाच्या कुपोषित मुलांची एकूण ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कल्याण : ठाणे जिल्ह्यात ९९ कुपोषित बालके कोरोना काळात दगावली आहे. मध्यम स्वरुपाच्या कुपोषित मुलांची एकूण संख्या १ हजार ४३४ आहे. मात्र, बालके कुपोषित होणार नाहीत, त्यांचे मृत्यू होणार नाहीत. तसेच त्यांचे कुपोषण दूर करण्यासाठी सरकारी पातळीवर काहीही लक्ष दिले जात नाही. कोरोना काळात कुपोषणाकडे दुर्लक्ष होत असल्याची बाब या निमित्ताने उघड झाली आहे.

श्रमजीवी संघटनेचे महाराष्ट्र सरचिटणीस बाळाराम भोईर यांनी सांगितले की, कोरोना काळात ठाणे जिल्ह्यातील ९९ बालके कुपोषणामुळे दगावली ही अत्यंत गंभीर बाब आहे. या प्रश्नावर श्रमजीवी संघटना सातत्याने काम करीत आहेत. ठाणे जिल्ह्यात मध्यम स्वरुपाची १ हजार ४३४ कुपोषित बालके आहेत. पालघर जिल्ह्यात जवळपास दोन हजार कुपोषित बालके आहेत. आदिवासी भागातील माता व बालकांना सकस आहार मिळत नाही. आदिवासी भागात महिला, पुरुष हे दोन्ही शेतमजुरीचे व अन्य कष्टाची कामे करतात. लॉकडाऊनचा सगळ्य़ात जास्त फटका आदिवासी बांधवांना बसला आहे. रोजगार हमीची कामे बंद होती. आता कामे सुरू झाली आहेत. कामे सुरू असली तरी त्याचे पैसे आदिवासी बांधवांना मिळत नाही. सरकारकडून रोजगार हमीच्या बदल्यात तीन ते चार कोटी रुपये थकले आहेत. हाताला काम नसल्याने अनेकांच्या घरात खायला अन्न नाही. माता आणि बालकांना जेवायला मिळत नाही. आदिवासी भागातील माता या घरातील लाल मसाला भातात आणि भाकरीत मिसळून खातात. त्यामुळे स्तनदा मातांना दूध कमी येते. त्यामुळे मुलाला दूध मिळत नाही. कोरोना काळात खावटी कर्ज मिळालेले नव्हते. खावटी कर्जाच्या बदल्यात प्रत्येक आदिवासींना चार हजार मिळणे अपेक्षित होते. त्यापैकी केवळ दोन हजार रुपये प्रत्येकाच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात झाली असली तरी सगळ्य़ा लाभार्थ्यांना अद्याप रक्कम मिळालेली नाही. त्यांच्या खात्यात रक्कमही जमा झालेली नाही.

रेशनवर आदिवासींना धान्य दिले जाते; मात्र तेल, मीठ, मिरची, कांदे, बटाटेही रेशनवर मिळावे. कारण केवळ भात कशाने खाणार असा त्यांना प्रश्न पडतो. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू होण्यापूर्वी जिल्हा उपरुग्णालयात मुलांकरिता कोरोना विभाग सुरु होता. कोरोनामुळेही आरोग्य सेवा बंद आहे. कोरोनाचा फटका कुपोषित बालकांच्या उपचाराला बसला आहे. शहापूर आणि भिवंडी ग्रामीण भागात जिल्हा उपरुग्णालय आहे. अन्य ठिकाणी ग्रामीण रुग्णालये आहे. त्या ठिकाणीही कोरोनामुळे लहान मुलांवरील उपचाराकरिता बाधा आली आहे. श्रमजीवीने कुपोषित बालकांसाठी जव्हार येथे छावणी तयार केली आहे. आता या छावणीत बालके नसली तरी १०० बालकांसह त्यांच्या मातांना दररोज सकस आहार दिला जात होता.

---------------------------------------------

ग्रामीण भागात जगा आणि जगवा मोहीम

ग्रामीण भागात श्रमजीवीच्यावतीने जगा आणि जगवा हे अभियान हाती घेण्यात आले आहे. मदत करणाऱ्या हाताच्या साहायाने गोरगरीब आदिवासींना अन्नधान्याचे वाटप केले जाते. तसेच कोरोना चाचणी केली जात आहे. कोरोनाची लस घेतल्याने मृत्यू होतो, नपुसकत्व येते हा गैरसमज आदिवासी समाजात आहे. ते दूर करण्यासाठी श्रमजीवी काम करीत आहे. सरकारने कुपोषित बालकांच्या समस्येसह आदिवासींच्या अन्य समस्यांकडे लक्ष द्यावे, अशी मागणी श्रमजीवीच्या माध्यमातून भोईर यांनी राज्य सरकारकडे केली आहे.