शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या आमदाराने अजित पवारांच्या राष्ट्रवादीत केला प्रवेश, शिंदेंच्या शिवसेनेचं टेन्शन वाढलं!
2
"...ज्यावरून मी त्याला कायम चिडवायचो"; अतुल परचुरेंच्या निधनाने राज ठाकरे झाले भावूक
3
भारताची कॅनडाविरोधात मोठी कारवाई! 6 उच्चायुक्तांची हकालपट्टी, 5 दिवसांत सोडावा लागणार देश
4
Mumbai Video: बापाने हात जोडले, मुलाला वाचण्यासाठी आई अंगावर पडली; पण ते मरेपर्यंत मारत राहिले
5
Atul Parchure Passed Away: 'वल्ली' अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरे यांचं निधन, काही वर्षांपूर्वीच कर्करोगावर केलेली मात
6
मोठी बातमी: राज्यपाल नियुक्त १२ जागांपैकी सरकारकडून ७ नावांवर शिक्कामोर्तब; कोणाकोणाला मिळाली संधी?
7
नववीपासूनची मैत्री...अतुल परचुरेंच्या निधनानंतर जयवंत वाडकर भावूक; शेअर केला शेवटचा फोटो
8
चतुरस्त्र अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरेंच्या निधनानंतर CM एकनाथ शिंदेंसह राजकीय विश्वातून आदरांजली
9
"....तोपर्यंत हे म्हातारं काही थांबत नाही"; शरद पवारांचा निर्धार काय?
10
Pune Crime: पुण्यात तरुणीवर अत्याचार करणाऱ्या दुसऱ्या आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या; यूपीतून अटक!
11
कृष्णा महाराज शास्त्री भगवानगडाचे उत्तराधिकारी होणार; कधी बसणार गादीवर? जाणून घ्या...
12
उद्धव ठाकरेंवर अँजिऑप्लास्टी नाही, केवळ नियमित तपासणी; आदित्य ठाकरेंची माहिती
13
हरयाणा निकालातून घेतला धडा; महाराष्ट्रातील नेत्यांना काँग्रेस हायकमांडचे ३ आदेश
14
'४८ पैकी ३१ जागा जिंकल्यावर यांना लाडकी बहीण आठवली'; शरद पवारांचा महायुती सरकारला खोचक टोला
15
ठाकरेंना धक्का, टोपेंचं वाढलं टेन्शनl; 'शिवबंधन' तोंडत हिकमत उढाण शिंदेंच्या शिवसेनेत!
16
Acidity ने हैराण झालायत? वारंवार पोटात जळजळतं? 'हे' ५ उपाय करा, नक्की वाटेल 'रिलॅक्स'!
17
वक्फ विधेयकावरुन पुन्हा गोंधळ; विरोधी खासदारांनी जेपीसीच्या बैठकीवर बहिष्कार टाकला
18
शिंदे-फडणवीस-अजित पवारांची उद्या महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद; जागावाटपाच्या फॉर्म्युल्याची घोषणा होणार? 
19
अजित पवारांना धक्का! रामराजेंचे विश्वासू आमदार दीपक चव्हाणांच्या हाती 'तुतारी'
20
आम्ही झेल सोडून चेंडूला विश्रांती देतो; माजी भारतीय खेळाडूचे पाकिस्तानवर शाब्दिक हल्ले, कारण...

उद्योजकांना देशोधडीला लावण्याचा सरकारचा डाव, कोर्टात याचिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 4:09 AM

कारखान्यांच्या जागा बिल्डरांना : ‘कामा’ जाणार न्यायालयात

मुरलीधर भवारकल्याण : ठाणे जिल्ह्यातील बंद असलेल्या कारखान्यांच्या जागा बिल्डरांना देण्याची अधिसूचना सरकारने काढली आहे. एमआयडीसी बिल्डरांसाठी खुली करून उद्योजकांना देशोधडीला लावण्याचा डाव सरकारने आखला आहे. या निर्णयाविरोधात कल्याण-अंबरनाथ मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (कामा) उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे. अधिसूचनेला स्थगिती द्या अथवा ती रद्द करा, अशी मागणी या याचिकेद्वारे केली जाणार आहे.

‘कामा’चे माजी अध्यक्ष श्रीकांत जोशी व विद्यमान उपाध्यक्ष मनोज जालन यांनी सरकारच्या अधिसूचनेला विरोध केला आहे. उद्योजक रस्त्यावर उतरू शकत नाही. त्यामुळे सनदशीर मार्गाने न्यायालयात दाद मागण्यात येणार आहे. एमआयडीसी, तेथील स्थानिक स्वराज्य संस्थांनी कारखाने व नागरी वस्ती यांच्यात अर्धा किलोमीटरचा बफर झोन ठेवला पाहिजे. मात्र, डोंबिवलीत हा झोन न ठेवल्याने नागरी वस्ती औद्योगिक वसाहतींना लागूनच आहेत. काही सोसायट्यांची भिंत कारखान्यांना लागून आहे. त्यामुळे २४ तास उत्पादन घेणारे कारखाने रहिवासी बंद पाडतात. आता सरकारने काढलेल्या अध्यादेशामुळे उद्योजकांच्या विकासासाठी एमआयडीसी सुरू करण्याच्या उद्देशालाच हरताळ फासला गेला आहे, असे जोशी व जालन म्हणाले.

कल्याण, बदलापूर, अंबरनाथ, डोंबिवली एमआयडीसीतील ५७५ काखानदार ‘कामा’चे सभासद आहेत. या एमआयडीसीत ९५० कारखाने सुरू आहेत. डोंबिवलीतही ४२० पेक्षा जास्त कारखाने सुरू आहेत. या पट्ट्यातील ५० उद्योग बंद पडले आहेत. एमआयडीसीतील जागेला प्रतिचौरस मीटरला १३ हजार रुपये दर मिळतो. तर, गृहसंकुले उभारल्यास प्रतिचौरस मीटरला ३० हजारांचा दर मिळतो. त्यामुळे मेटाकुटीला आलेले उद्योजक गृहसंकुलांसाठी पसंती देतील. त्यामुळे उद्योजकतेचा उद्देश बाद ठरला.

मानपाडा रोडवरील स्टार कंपनी बंद पडली. त्या जागेवर आधीच शॉपिंग मॉल उभा राहिला आहे. तर, प्रीमिअरच्या जागेत बडे बिल्डर आले आहेत. शारदा टेक्सटाइल्सच्या जागेवरही मॉल उभा राहिला आहे. अंबरनाथमधील गार्लिक कंपनीच्या ३५ एकर जागेवर इंडस्ट्रियल व निवासी कॉम्प्लेक्स उभारले आहे. केमीक्यूप कंपनी बंद आहे. लुधियाना कंपनीच्या शेजारी असलेल्या बंद कंपनीच्या जागेवर इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स उभारले आहे. कल्याण-बदलापूर रोडवरील अंबरनाथ येथे वडोल गावानजीक बडे इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स उभारले जात आहे. या बंद कंपन्यांच्या जागा सरकारने आधीच बिल्डरांना दिल्या होत्या. आता तर अधिसूचना काढून सरकारने मान्यता दिल्याचा आरोप उद्योजकांनी केला आहे.‘प्रोबेस’च्या अहवालाकडे डोळेझाक : मे २०१६ मध्ये डोंबिवलीतील प्रोबेस कंपनीत झालेल्या भीषण स्फोटात १२ जणांचा मृत्यू झाला. तर. दोन हजार मालमत्ताधारकांचे नुकसान झाले. त्यांना भरपाई देण्याबाबतचा अहवाल राज्य सरकारकडे सादर करण्यात आला आहे. मात्र, सरकारने तो अद्याप उघडलेला नाही. त्यावर साधी चर्चा करण्याचे औदार्य दाखवलेले नाही. या स्फोटानंतर कारखाने व नागरी वस्तीत बफर झोन ठेवला गेला नसल्याची बाब सरकारच्या समितीने नमूद केली आहे. मात्र, त्याकडे डोळेझाक होत आहे.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाkdmcकल्याण डोंबिवली महापालिकाSupreme Courtसर्वोच्च न्यायालय