शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
2
वक्फ कायद्याविरोधात AIMPLB चा 'ब्लॅकआउट' प्लॅन...; हैदराबादमध्ये मुस्लीम नेते-धर्मगुरू एकवटले, ओवेसी म्हणाले आम्ही...!
3
जेनसोलच्या पुण्यातील प्लाँटमध्ये एनएसईचा अधिकारी पोहोचला; होते फक्त तीन मजूर, परिस्थिती पाहून...
4
१ मेपासून फास्टॅग फाडून टाकणार? सॅटेलाईटवर टोल कापला जाणार; NHAI पहा काय म्हणतेय...
5
Video : दोन्ही फलंदाज नॉन स्ट्राइक एन्डला! Run Out चा डाव साधल्यावर कोहलीनं 'गॉगल' काढला, अन्...
6
राज ठाकरेंशी युती करण्याची चर्चा ठाकरे गट शिवतीर्थावर जाऊन करणार का? संजय राऊत म्हणाले...
7
'हलक्यात घेऊ शकत नाही' चेन्नईविरुद्धच्या सामन्याआधी रोहितचा मुंबईला इशारा, धोनीबाबत म्हणाला...
8
मोदी-नितीश फक्त सत्तेसाठी एकत्र; मल्लिकार्जुन खरगेंचा BJP-JDU युतीवर निशाणा
9
“हिंदीची सक्ती नकोच”; मनसेची थेट RSSकडे धाव, मोहन भागवतांना खुले पत्र, नेमकी काय मागणी केली?
10
रणजीत कासलेंना निवडणुकीत परळीला ड्युटीच नव्हती; प्रशासनाकडून निवडणूक आयोगाला अहवाल
11
दररोज ४५ रुपये गुंतवून लखपती व्हा; LIC च्या 'या' योजनेत तुम्हाला विमा आणि बोनसही मिळतो
12
सेक्सटॉर्शन, तरुणाचे अश्लील फोटो व्हायरल ! महिलेसह दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा
13
अजित पवारांचे हेलिकॉप्टर बिघडले, राष्ट्रवादीचा मेळावा रद्द; कार्यकर्त्यांमध्ये रंगली वेगळीच चर्चा
14
विजेच्या धक्क्याने तडफडत होता मुलगा, लोकांची जवळ जाण्याची होत नव्हती हिंमत, तेवढ्यात एक तरुण धावला आणि...  
15
१० हजारांच्या आत AI, ५जी फोन; सेल्फी कॅमेरा ८ मेगापिक्सलचा पण चकीत केले; कसा आहे A95?
16
“जनतेने नाकारल्यामुळे ठाकरे बंधूंना आता एकत्र येण्याची गरज वाटतेय”; भाजपाचा खोचक टोला
17
इकडून सोने टाका अन् तिकडून पैसे काढा.. सोने खरेदी-विक्रीसाठी बाजारात आलंय ATM
18
शर्मिष्ठा राऊतच्या घरी पाळणा हलला! लग्नानंतर ४ वर्षांनी अभिनेत्री झाली आई, थाटामाटात केलं बारसं
19
भारतीय संशोधकांनी लावलेल्या शोधाचा चीनने घेतला लाभ, अमेरिका, रशियाही अवाक्, भारताने संधी दवडली  
20
दुर्दैवी! टॅम्पोचा अपघात; मदत करण्याऐवजी तेल लुटण्यासाठी उडाली झुंबड, क्लिनरचा जागीच मृत्यू

उल्हासनगर वगळून राज्यातील ३० सिंधी वसाहतींमधील जमिनींचे पट्टे नियमित करण्यासाठी शासनाची अभय योजना

By सदानंद नाईक | Updated: April 9, 2025 19:43 IST

उल्हासनगरला होणार विशेष अध्यादेशाचा फायदा... आयुक्त मनीषा आव्हाळे 

सदानंद नाईक, उल्हासनगर :उल्हासनगर वगळून १४ जिल्हातील विस्थापित झालेल्या ३० सिंधी समाज पट्ट्याला मालकी हक्क देण्यासाठी राज्य शासनाने अभय योजना लागू केली. तर शहराला यापूर्वी लागू केलेल्या विशेष अध्यादेशाचा फायदा देण्याचे काम सुरु असल्याची माहिती आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी दिली.

राज्यातील उल्हासनगर मध्ये सर्वाधिक संख्येने सिंधी समाज राहत असून लोकसंख्या ३ लाखा पेक्षा जास्त आहे. उल्हासनगर विधानसभा क्षेत्रातून आजपर्यंत सिंधी समाजाचा आमदार निवडून आला आहे. तसेच अंबरनाथ व कल्याण पुर्व मतदारसंघात सिंधी समाजाचे निर्णायक मते आहेत. शहरातील अवैध बांधकामचा प्रश्न ऐरणीवर आल्यावर विस्थापिताचे शहर म्हणून खास उल्हासनगरसाठी १८ वर्षांपूर्वी बांधकामे नियमित करण्यासाठी विशेष अध्यादेश काढला. याच अध्यादेशानुसार बांधकामे नियमित करण्याची प्रक्रिया सुरु राहणार असल्याची माहिती आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी दिली आहे. 

दरम्यान महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत राज्यात स्थायिक झालेल्या सिंधी विस्थापितांना जमिनीचे मालकी हक्क देणे, महाराष्ट्र झोपडपट्टी अधिनियमात सुधारणा करणे, नागपूर येथे राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्था स्थापन करणे अशा विविध प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. राज्यातील सिंधी समाजातील विस्थापितांच्या जमिनींचे पट्टे नियमित करण्यासाठी विशेष अभय योजना २०२५ लागू केली जाणार आहे. या निर्णयामुळे नवी मुंबई, मुंबईतील मुलुंड (पश्चिम), सायन, नागपूरमधील जरीपटका, जळगावमधील चाळीसगाव, अमळनेर यांसारख्या राज्यभरातील ३० सिंधी वसाहतींतील जमिनीचे पट्टे नियमित करता येणार आहेत. 

ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर शहर वगळता, २४ जानेवारी १९७३ च्या राजपत्रात जाहीर करण्यात आलेल्या ३० अधिसूचित क्षेत्रांमध्ये ही विशेष अभय योजना लागू होणार आहे. या योजनेची मुदत एक वर्ष असेल. या अंतर्गत सिंधी विस्थापितांच्या निवासी आणि व्यावसायिक जमिनींचे पट्टे नियमित केले जातील. १५०० चौरस फुटांपर्यंतच्या निवासी उपयोगासाठी असलेल्या जमिनीच्या पट्ट्यांसाठी ५ टक्के अधिमूल्य आकारले जाईल (फ्रीहोल्डसाठी). तर व्यावसायिक प्रतिष्ठानांसाठी १० टक्के अधिमूल्य आकारले जाईल. १५०० चौरस फूटांपेक्षा अधिक क्षेत्रफळासाठी दुहेरी दराने अधिमूल्य घेतले जाईल.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर