शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीच्या दोन मुलींना हडपसरमध्ये दारु पाजली, मित्राच्या खोलीत चौघांकडून सामुहिक बलात्कार
2
महायुती अन् महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी 'महाशक्ती'; विधानसभेत तिहेरी सामना?
3
Sanjay Roy : "२ दिवसांनी संजय रॉयचे कपडे..."; CBI ने केला पोलिसांवर निष्काळजीपणाचा गंभीर आरोप
4
Andheri Lokhandwala Fire: अंधेरीत लोखंडवाला येथे भीषण आग, दोन बंगले जळून खाक
5
PM मोदींच्या अपमानाची आठवण, भाजपानं सुनावलं; जे.पी नड्डांचं खरगेंना खरमरीत पत्र
6
7 तास झोप घेत नसाल तर तुम्ही डेंजर झोनमध्ये आहात! अकाली मृत्यू, हार्ट अटॅक, नैराश्य येण्याची भीती
7
भारताने पाकिस्तानला बजावली नोटीस; दहशतवाद, पर्यावरण बदलांमुळे सिंधू जलकराराचा फेरआढावा घ्या
8
टीव्ही-फ्रिज सगळ्यामध्येच होताहेत स्फोट, लेबेनॉनमधील रहिवासी दहशतीच्या छायेखाली
9
कोट्यवधींचं घबाड! रिटायर्ड IAS अधिकाऱ्याच्या लॉकरमध्ये सापडले २० कोटींचे हिरे, सोनं, कॅश
10
रेल्वे स्थानकांवरही सुरू होणार एक्झिक्युटिव्ह लाउंज, फक्त दोन रुपयांत मिळू शकते एंट्री!
11
Ion Exchange Share Price: 'या' कंपनीला Adani Power कडून मिळालं ₹१६१ कोटी रुपयांचं कंत्राट; शेअरनं पकडला रॉकेट स्पीड
12
...तर मला फासावर लटकवा, जयच्या मृत्यूचं राजकारण करू नका; अमोल मिटकरींचं मोठं विधान
13
IND vs BAN : गिलच्या पदरी भोपळा! Hasan Mahmud नं किंग कोहलीसमोरही फिरवली जादूची कांडी
14
एकाचवेळी तीन हजार पेजरस्फाेट, इस्रायलचा हिजबुल्लाह संघटनेवर टेक्नोसॅव्ही हल्ला;मोसाद गुप्तचर यंत्रणेने दाखविला हिसका
15
‘महाविकास’च्या जागावाटप चर्चेला सुरुवात; चर्चा सलग तीन दिवस सुरू राहणार
16
IND vs BAN : हिटमॅन Rohit Sharma चा पुन्हा फ्लॉप शो!  
17
धक्कादायक! उलट्या दिशेने धावली कोलकात्याहून अमृतसरला जाणारी ट्रेन, ड्रायव्हरला समजल्यावर...  
18
'बिग बॉस मराठी'साठी तरूण होस्ट हवा होता! केदार शिंदेंचं वक्तव्य चर्चेत, म्हणाले- "महेशदादाला..."
19
देशात कसं लागू होणार 'एक देश, एक निवडणूक'; कॅबिनेट मंजुरीनंतर आता पुढे काय? जाणून घ्या
20
यंदाच्या निवडणुकीतून राज्यात किती जणींना मिळणार आमदार होण्याची संधी? २०१९ मध्ये २४ महिलांना मिळाली आमदारकी

ग्रा.पं.कडे अग्निशमन यंत्रणाच नाही

By admin | Published: May 07, 2015 12:10 AM

औद्योगिकदृष्ट्या वेगाने विकसित होणाऱ्या भिवंडी तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतींना आपत्तीकाळात नजीकच्या महानगरपालिकेच्या अग्निशमन यंत्रणेवर अवलंबून राहावे लागते.

रोहिदास पाटील, अनगाव औद्योगिकदृष्ट्या वेगाने विकसित होणाऱ्या भिवंडी तालुक्यातील लोकसंख्या आणि आर्थिक दृष्टीने सक्षम असलेल्या मोठ्या ग्रामपंचायतींना आपत्तीकाळात नजीकच्या महानगरपालिकेच्या अग्निशमन यंत्रणेवर अवलंबून राहावे लागते.तालुक्यात ११८ ग्रामपंचायती, २३९ महसूली गावे व १०० पाडे व आदिवासी वाड्या आहेत. त्यापैकी पूर्णा कोपर-कशेळी, काल्हेर मानकोळी, दापोडे, सोनाळे, अंजूर-दिवे, पिंपळास आदी ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात गोदामे आहेत. परिसरात ज्वलनशील रासायनिक कंपन्या असल्यामुळे आग लागण्याचे प्रमाणही जास्त आहे. या घटनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी महानगरपालिकांच्या अग्निशमन यंत्रणेची मदत घ्यावी लागते. मदतीसाठी येणारे हे अग्निशमन बंब वाहतूककोंडीत अडकल्यास त्यांना घटनास्थळी पोहोचण्यास उशीर होतो. तेव्हा मोठी जीवित व वित्तहानी होते. तालुक्यातील कुठल्याच ग्रामपंचायतीकडे अग्निशमन बंब नाही, ही वस्तुस्थिती आहे. मात्र, ज्या पंचायतीच्या कार्यक्षेत्रात गोदामे व कंपन्या आहेत, त्या पंचायतीला याविषयी माहिती देऊन यासंबंधी ही यंत्रणा बसविण्यासाठी प्रयत्न कडून याबाबत शासनाचे मार्गदर्शन घेण्यात येईल.- डॉ. करुणा जुईकर, गटविकास अधिकारी, पंचायत समिती भिवंडीमंत्रालयाला लागलेल्या भीषण आगीनंतर कारखाने, गोदामे येथे अग्निशमन यंत्रणा ठेवण्यात यावी, असे आदेश राज्य सरकारने काढले होते. मात्र, या आदेशाची अंमलबजावणी झालेली नाही. ती होण्याकरिता जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून माहिती घेण्यात येईल.’’- प्रकाश पाटील, गटनेते जि.प. ठाणे, शिवसेना जिल्हाप्रमुख ठाणे ग्रामीण