शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

उल्हासनगरातील मैदाने झाले नशेखोरांचा अड्डा; दारूच्या बाटल्यांचा खच, मैदानाची साफसफाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 16:38 IST

उल्हासनगर देशातील सर्वाधिक घनतेच्या शहरात वृद्ध, मुले, नागरिक आदींसाठी व्हिटीसी, दसरा व गोल मैदान अशी तीन मैदाने आहेत.

- सदानंद नाईक 

उल्हासनगर : शहरातील व्हिटीसी मैदानाची काही क्रिडा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व्हिटीसी मैदानाची साफसफाई केली असता, मैदानात दारूच्या बॉटलचा खच मिळाला. तीच परिस्थिती गोलमैदान व दसरा मैदानाची झाली असून महापालिकेने कारवाई करण्याची मागणी होत आहे. 

उल्हासनगर देशातील सर्वाधिक घनतेच्या शहरात वृद्ध, मुले, नागरिक आदींसाठी व्हिटीसी, दसरा व गोल मैदान अशी तीन मैदाने आहेत. मात्र तिन्ही मैदानाची दुरावस्था झाली. मैदानात मुलांना खेळता यावे म्हणून, कॅम्प नं-४ परिसरातील व्हिटीसी मैदानाच्या साफसफाई साठी भाजपचे मंडळ अध्यक्ष निलेश बोबडे यांनी पुढाकार घेतला. स्थानिक क्रिकेटक्लब, कबड्डी संघ, गोलंदान शॉपर, सामना प्रतिष्ठान आदीं पदाधिकाऱ्यांच्या सहकार्यातून मैदानाची साफसफाई दोन दिवासापूर्वी करण्यात आली. साफसफाई वेळी कचऱ्यासह मैदानाच्या बसण्याची जागा व शौचालय परिसरात दारूच्या बॉटलचा खच आढळल्याने, क्रीडा प्रेमींना धक्का बसला. शेजारील महापालिका क्रीडा संकुल इमारती मध्ये प्रभाग समिती कार्यालय असून त्यामधील बॅडमिंटन कोर्ट या इनडोअर क्रीडा संकुलची दुरावस्था झाल्याचा आरोप बोबडे यांनी केला.

 व्हिटीसी मैदाने प्रमाणे कॅम्प नं-५ येथील दसरा मैदानाची दुरावस्था झाली असून मैदानात सुरक्षा रक्षक तैनात नसल्याने सायंकाळच्या ७ नंतर सर्वसामान्य नागरिक मैदानात जाऊ शकत नाही. मैदानाची ताबा भुरटे चोर, नशेखोर, गर्दुल्ले, भिकाऱ्यांनी घेतल्याचे चित्र असते. महापालिका व पोलीस काहीएक कारवाई करीत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिक करीत आहेत. तसेच शहरातील प्रसिद्ध गोलमैदाना मध्ये नॉनवेज व दारू पार्टी झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. गेल्या महिन्यात मैदानात तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांने, मैदानात फिरण्यात आलेल्या महिलांना प्रवेशद्वार बंद करून कोंडून घेतल्याचा प्रकार उघड झाला होता. तर शेजारील उद्यानात सुरक्षा रक्षक तैनात नसल्याचा गैरफायदा घेऊन महिलांचे खून यापूर्वी झाले. नागरिकांना मोकळा श्वास घेण्यासाठी तिन्ही मैदानाचे नुतनीकरण व दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे. 

उद्यानावर भूमाफियांची नजर, नुतनीकरनाची मागणी

 महापालिकेने नेताजी, नाना-नाणी पार्क, सपना गार्डन, लाल लोई अश्या मोजक्याच उद्यानाचे नुतनीकरण केले. इतर उद्याने नुतनीकरनाच्या प्रतीक्षेत असून कितपत पडलेल्या उद्यानाचा गैरवापर होत आहे. भूमाफियांचा डोळा असलेल्या उद्यानाची नागरिकांसाठी दुरुस्ती व नुतनीकरण करण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरthaneठाणे