शहरं
Join us  
Trending Stories
1
Haryana, Jammu & Kashmir Assembly Election Results 2024 Live: हरयाणात भाजप पुढे, पण काँग्रेस म्हणतेय आमचेच सरकार येणार
2
जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सची मुसंडी, भाजपा मागे; पण हरयाणात कल पूर्णच फिरला!
3
मोठा ट्विस्ट! जम्मू-काश्मीरमध्ये निवडणूक ९० जागांसाठी, पण आमदार ९५ असणार; सत्ता कशी स्थापन करणार?
4
Navratri 2024: नवरात्रीत अनवाणी चालण्याने खरंच लाभ होतो का? वाचा धार्मिक आणि शास्त्रीय कारण!
5
"पती पार्किंगमधून बाईक घेण्यासाठी गेला पण परत आलाच नाही..."; पत्नीने सांगितली आपबिती
6
IRE vs RSA : "हाय हाय यह मजबूरी"; ODI मध्ये बॅटिंग कोचवर आली फिल्डिंगसाठी मैदानात उतरण्याची वेळ!
7
Israel Iran War : मोठं युद्ध सुरू होणार? इराणच्या राष्ट्राध्यक्षांना पुतिन भेटणार, इस्त्रायल विरोधात कारवाईची तयारी
8
Ankita Walawalkar अंकिता वालावलकर लवकरच बांधणार लग्नगाठ, तिचा होणारा नवरादेखील आहे सिनेइंडस्ट्रीतला
9
Navratri 2024: लक्ष्मी मातेने वाहन म्हणून घुबडाची निवड का केली असावी? घुबड दिसणे शुभ की अशुभ? वाचा!
10
"पंतप्रधान मोदींनाही जिलेबी पाठवणार"; विजयाआधीच काँग्रेस कार्यालयात मिठाईचे वाटप सुरु
11
"मला सलमानची बायको व्हायचंय", चाहतीच्या प्रश्नाला अरबाज खानचं हटके उत्तर, म्हणाला...
12
शेअर बाजारानंतर चीन नोकरदारांना शॉक देणार; काय आहे चीनचा 'शॉक २.०'? भारतासह जग दहशतीत
13
अजितदादांना धक्क्यामागून धक्के; शरद पवारांकडे झुकताहेत नेते, लोकसभेनंतर आता विधानसभेलाही शह!
14
वाह क्या बात है! पती-पत्नी एकत्र झाले IPS अधिकारी; जाणून घ्या, नेमकं काय घडलं?
15
Singham Again: मराठमोळ्या लेखकाने लिहिली आहे रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन'ची स्टोरी, म्हणाला, "मुंबईत आल्यावर पहिल्यांदा..."
16
"कुणाला प्रयोग करायचा असेल तर..."; झिरवाळांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर; म्हणाले, "जे बोलतात त्यांना..."
17
आजचे राशीभविष्य ८ ऑक्टोबर २०२४; प्रत्येक कार्यात यश मिळण्याची शक्यता
18
कंगना रणौत वादग्रस्त वक्तव्यावरून पुन्हा अडचणीत; कोर्टाने बजावली नोटीस, द्यावं लागणार उत्तर
19
बारामतीनंतर इंदापूरमध्येही मलिदा गँग: शरद पवार; हर्षवर्धन पाटील यांचा शरद पवार गटात प्रवेश
20
जम्मू-काश्मीर, हरयाणाचा आज फैसला, विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी जय्यत तयारी

ठाणे जिल्ह्यातील भूजल विकासाची स्थिती फक्त १९ टक्के

By सुरेश लोखंडे | Published: June 26, 2023 8:12 PM

केंद्रीय भूमीजल बोर्डाकडून जिल्हा प्रशासनाला भूजल व्यवस्थापन आराखडा सुपूर्द.

ठाणे : जिल्ह्यातील पाणी पातळी अतिशय उथळ आहे. तर जिल्ह्याच्या पाणी पातळीत घट आढळून येत आहे. त्यामुळे भूजल विकासाची स्थिती फक्त १९ टक्के आहे. त्यामुळे केंद्रीय भूमीजल बोडार्ने पाणी वाचविण्यासाठी भूजलाची मागणी व्यवस्थापन करण्यासाठी ठिबक सिंचन पद्धती अवलंबिण्याच्या सूचनेसह ठिबकचा वापर केल्यास वार्षिक ४.३७ दशलक्ष घनमीटर (दशलघमी) पाण्याची बचत जिल्ह्यात होईल, अशा सुचना व मार्गदर्शक अहवाला आज निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी यांच्याकडे सुपूर्द केला आहे. त्यात भूजल पातळीविषयी सखोल मार्गदर्शन व सुचना करण्यात आल्या आहे.

जलशक्ती मंत्रालयाच्याअंतर्गत असलेल्या केंद्रीय भूजल मंडळाच्या शास्त्रज्ञांनी ठाणे जिल्ह्यातील भौगोलिक स्थिती, जमिनीखालील खडक, भूजलाची स्थिती, जलधर नकाशा व भूजल पातळी वाढविण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची समावेश असलेला अहवाल तयार केला आहे. हा अहवाल परदेशी यांच्याकडे आज सोपविला आहे. त्यानुसार भूजल व्यवस्थापनाशी संबंधित जलसंपदा, पाटबंधारे, जलसंधारण, कृषि आदी विभागांना हा अहवाल उपलब्ध करून या अहवालात सुचविलेल्या उपाययोजनांवर काम करण्याची सूचना परदेशी यांनी यावेळी केली. यावेळी केंद्रीय भूज बोडार्चे वैज्ञानिक व प्रभारी अधिकारी डॉ.जे. दाविथुराज, वैज्ञानिक संदीप वाघमारे, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे ठाणे येथील वरिष्ठ वैज्ञानिक मृणालिनी लोखंडे आदी उपस्थित होते.

केंद्रीय बोर्डे भूजल पातळीवरील हा अहवाल जिल्हा प्रशासनाला सुपूर्द केला आहे. त्याव्दारे जिल्हह्यातील विविध वैशिष्ट्ये निदर्शनात आणून देत सूचनाही करण्यात आल्या आहे. यामध्य जिल्ह्यातील चार हजार ९१ वर्ग किलोमीटर भौगोलिक क्षेत्रापैकी दोन हजार १०६ वर्ग किलोमीटर क्षेत्र हे पहाडी क्षेत्र आणि बसाल्ट खडकाने व्यापलेले आहे. झिज झालेल्या खडकांची जाडी ही ५ ते १८ मीटर आढळून आली. जिल्ह्यात भूजल विकासाची स्थिती सरासरी ही १९ टक्के असून कमी जल उत्पादकात असलेले जलधर आढळून येत आहेत. जिल्ह्याच्या पाणी पातळीत घट आढळून येत आहे आदी वैशिष्ट्य व सूचनांचा उहापोह या अहवालात करण्यात आला आहे.

या व्यवस्थापन अहवालाव्दारे भूजलाची मागणी व पुरवठ्याचा आराखडा तयार केला आहे. त्यामध्ये पाणी पातळी अतिशय उथळ असल्याने आणि भूजल विकासाची स्थिती फक्त १९ टक्के असल्यामुळे पुरवठा व्यवस्थापन सुचविण्यात आले नाही. मात्र, पाणी वाचविण्यासाठी भूजलाची मागणी व्यवस्थापन करण्यासाठी ठिबक सिंचन पद्धती अवलंबिण्याची सूचना केली आहे. ठिबकचा वापर केल्यास वार्षिक ४.३७ दशलघमी पाण्याची बचत जिल्ह्यात होईल. यामुळे जिल्ह्यातील ११ हजार ३० हेक्टर क्षेत्र शाश्वत भूजल सिंचनाखाली येईल. - हे क्षेत्र ओलिताखाली आणण्यासाठी चार हजार ३०४ विहिरी व ७१९ विंधन विहिरी अहवालात सुचविण्यात आल्या आहेत.            

जेथे पाण्याची पातळी खोलावर गेली आहे अशा क्षेत्रासाठी समतल बांध नाला बंडिंग, गल्ली प्लगिंग यासारख्या कामे सुचविण्यात आली आहेत. लाभक्षेत्रामध्ये भूपृष्ठ जल व भूजलाचे  नियोजन करणे आवश्यक आहे. शहापूर व मुरबाडमध्ये भूजल पातळी वाढविण्यासाठी योग्य व्यवस्थापनाची आवश्यकता असल्याचे अहवालात नमूद आहे.  केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने जलधर नकाशे तयार करण्याचा महत्वकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. याअंतर्गत ठाणे जिल्ह्यातील भूजल पातळी, भूस्तराची स्थिती आदींचा अभ्यास यामध्ये करण्यात आला आहे. सन २०२२-२३च्या या अहवालमध्ये जिल्ह्याच्या सात तालुक्याचा समावेश जलधर नकाशामध्ये करण्यात आला आहे. भूजल व्यवस्थापनासाठी संस्थात्मक आराखडा तयार करून तो जिल्ह्यात राबविण्याची सूचना यामध्ये करण्यात आली आहे. त्यासाठी भूजल व्यवस्थापन आराखडाही सुचविण्यात आला आहे.

या भूजल व्यवस्थापन आराखड्यात उपाय योजना केंद्रीय भूजल बोडार्ने सूचवल्या आहेत. या आराखड्यामध्ये पर्जन्यमान, जलधर प्रणालीचे प्रकार व वैशिष्ट्ये, सिंचन व नकदी पिकासाठी भूजल उपशाचा भूजलावर येणार ताण, मयार्दीत भूजल उपलब्धता, भूजल पातळीतली चढउतार, भूजल गुणवत्ता, जिल्ह्यातील भूगर्भस्थिती, माती व जमिनीचा वापर यांचा अभ्यास करून अहवालामध्ये समावेश करण्यात आला आहे. या अहवालात सुचविलेला आराखडा राबवित असताना भूजलावर आधारित वैज्ञानिक दृष्टिकोन लक्षात घेणे गरजेचे आहे. जेणेकरून जिल्ह्याचा भूजलावर आधारित शाश्वत विकास साधता येईल, असे या अहवालात नमूद केले आहे. 

टॅग्स :thaneठाणेWaterपाणी