शहरं
Join us  
Trending Stories
1
वक्फच्या जमिनीवर बनलीय संसदेची नवी इमारत; मौलाना बदरुद्दीन अजमल यांचा मोठा दावा
2
पवारांसोबत चर्चा सुरू असतानाच स्नेहलता कोल्हेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
3
भयंकर घटना! टँकर पलटला, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी केली गर्दी, तेवढ्यात झाला मोठा स्फोट, ९४ जणांचा मृत्यू
4
"...तर त्याच्यावर निश्चित कारवाई होईल"; 'व्होट जिहाद' शब्दाबद्दल ECI ची भूमिका काय?
5
'लाडकी बहीण' सारख्या योजनांसाठी 'महायुती'कडे पैसे कुठून आले? देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर
6
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
7
सहारा वाळवंटात आला महापूर, जिकडे तिकडे पाणीच पाणी, कारण काय?
8
योगींसह 'या' नेत्यांच्या सुरक्षेतून NSG चे ब्लॅक कॅट कमांडो हटवणार, सरकारने आखली नवीन योजना
9
भारत जगाचे नेतृत्व करणार; 6G बाबत सरकारची मोठी घोषणा, Jio-Airtel-BSNL-Vi ग्राहकांना...
10
रशिया-युक्रेन युद्धाचा भारताला मोठा फटका! ३ अब्ज डॉलर्सच्या करारवर सही झाली, पण...
11
ओमर अब्दुल्लांच्या सरकारपासून काँग्रेस चार हात लांब; महाराष्ट्र निवडणुकीशी कनेक्शन?
12
"उद्धव ठाकरे आजारी पडल्याचं टायमिंग साधून निवडणुकीची घोषणा, त्यामागे षडयंत्र तर नाही ना?’’ ठाकरे गटाला शंका
13
T20 WC 24 : आम्ही कमी पडलो, तुमचं प्रेम, टीका यासाठी आभार; श्रेयांका पाटीलची प्रामाणिक कबुली
14
गायत्री शिंगणेंची बंडाची तयारी! शरद पवारांनी उमेदवारी दिली नाही, तर...
15
लढायचं की पाडायचं? मनोज जरांगेंनी २० तारखेला बोलावली अंतिम बैठक
16
Maharashtra Assembly Election 2024 : 'एक महिन्यापासून अजितदादांसोबत बोललो नाही'; राजेंद्र शिंगणे मोठा निर्णय घेणार? दिले स्पष्ट संकेत
17
ICC कडून डिव्हिलियर्सला 'हॉल ऑफ फेम'; विराटचे मित्रासाठी लांबलचक पत्र, आठवणी अन्...
18
बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर अरबाज खानची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "कुटुंबात खूप काही..."
19
"...तर समाजवादी पार्टी स्वबळावर निवडणूक लढवणार", अबू आझमींचा महाविकास आघाडीला इशारा
20
गुजरातमध्ये केमिकल फॅक्टरीमध्ये मोठा अपघात! विषारी वायूमुळे पाच कामगारांचा मृत्यू

मुख्यमंत्री गेल्यानंतर पालकमंत्री आले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2018 12:35 AM

लालचौकी परिसरातील आगरी-कोळी महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावून ते तेथून बाहेर पडल्यानंतर ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे व खा.डॉ. श्रीकांत शिंदे हे तेथे दाखल झाल्याने चर्चेला उधाण आले.

- प्रशांत मानेकल्याण : लालचौकी परिसरातील आगरी-कोळी महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावून ते तेथून बाहेर पडल्यानंतर ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे व खा.डॉ. श्रीकांत शिंदे हे तेथे दाखल झाल्याने चर्चेला उधाण आले. भाजपा-शिवसेना या दोन्ही पक्षांतील संबंध सौहार्दपूर्ण होत असताना हा पाठशिवणीचा खेळ का खेळला गेला, असा सवाल उपस्थितांनी केला. या महोत्सवाचे प्रमुख आमंत्रित, आगरी समाजाचे तथा राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक हे शनिवारी डोंबिवलीत पक्षाच्या मेळाव्याला उपस्थित होते; मात्र त्यांनीही महोत्सवाला जाणे टाळले, अशी चर्चा सुरू आहे.मुख्यमंत्री फडणवीस यांनी रविवारी कल्याण शहरातील तीन कार्यक्रमांना हजेरी लावली. मोहने येथील एनआरसी मैदानावर सीएम चषक जलयुक्त शिवार स्पर्धेच्या अंतिम सामन्याचे उद्घाटन त्यांच्या हस्ते पार पडले. याशिवाय, खडकपाडामधील डायग्नोस्टिक सेंटरचा शुभारंभ आणि लालचौकी परिसरातील आगरी-कोळी महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमासही मुख्यमंत्री उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांसमवेत पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांच्यासह राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खा. कपिल पाटील, आ. किसन कथोरे, गणपत गायकवाड, नरेंद्र पवार, रमेश पाटील, उपमहापौर उपेक्षा भोईर आदी राजकीय मंडळींसह जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आणि केडीएमसीचे आयुक्त गोविंद बोडके यांनी हजेरी लावली होती.शुक्रवारी या महोत्सवाचा शुभारंभ झाला. या कार्यक्रमासाठी आगरी-कोळी समाज उत्कर्ष मंडळाच्या वतीने पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना आमंत्रित करण्यात आले होते; परंतु काही कारणास्तव ते येऊ शकले नाही. त्यामुळे महोत्सवाच्या समारोपाला मुख्यमंत्र्यांसमवेत ते नक्कीच येतील, अशी अपेक्षा होती. मात्र, मुख्यमंत्री महोत्सवातून बाहेर पडल्यानंतर पालकमंत्र्यांनी हजेरी लावली. त्यांची ही ‘उपस्थिती’ राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनली. गेल्या काही दिवसांत भाजपा-शिवसेनेचे संबंध सुधारले असतानाही दोघे एकत्र व्यासपीठावर न येण्याचे कारण योगायोग आहे की अन्य काही आहे, अशी चर्चा कार्यक्रमस्थळी सुरू झाली. खा.डॉ. श्रीकांत शिंदे हेही मुख्यमंत्री असताना हजर नव्हते. तेही पालकमंत्री शिंदे यांच्यासमवेतच कार्यक्रमस्थळी हजर झाले होते.मुख्यमंत्र्यांचा जिल्ह्यात कोणताही कार्यक्रम असला, तर त्यावेळी पालकमंत्र्यांची आवर्जून उपस्थिती असते. त्यामुळे या पाठशिवणीच्या खेळाचे अनेकांना आश्चर्य वाटले.यासंदर्भात पालकमंत्री शिंदे यांच्याशी संपर्क साधून विचारणा केली असता, त्यांचा मोबाइल बंद होता. खा. श्रीकांत शिंदे हेही उपलब्ध झाले नाहीत. आगरी-कोळी महोत्सवाचे प्रमुख संयोजक, शिवसेनेचे कल्याण शहरप्रमुख विश्वनाथ भोईर म्हणाले की, एकनाथ शिंदे व श्रीकांत शिंदे ठाण्यातील एका कार्यक्रमात व्यस्त होते. त्यामुळे त्यांना महोत्सवामध्ये पोहोचण्यास काही वेळ उशीर झाला.>नाईक यांनी मारलेल्या दांडीवरून चर्चागेल्या अनेक वर्षांपासून ठाणे जिल्ह्यातील आगरी-कोळी समाजाचे नेतृत्व करणारे राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक शनिवारी डोंबिवली येथे पक्षाच्या मेळाव्यासाठी आले होते; परंतु कल्याणमधील महोत्सवाला ते आले नाही.प्रमुख आमंत्रित असतानाही नाईकांनी महोत्सवाला मारलेली दांडी चर्चेचा विषय ठरली आहे. ते डोंबिवलीतील मेळाव्यासाठी सायंकाळी ४ वाजता आले. हा मेळावा सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरू होता. त्यानंतर, नवी मुंबईला अन्य एक कार्यक्रम असल्याने तातडीने रवाना झाले, अशी माहिती पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली.