शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

अतिधोकादायक इमारतींवर हातोडा

By admin | Updated: June 4, 2016 01:34 IST

धोकादायक इमारतींचे उल्हासनगर पालिकेने चार टप्प्यांत वर्गीकरण केले असून त्यानुसार अतिधोकादायक ठरलेल्या इमारतींपैकी तीन इमारती तोडण्यास सुरुवातही झाली आहे.

उल्हासनगर : धोकादायक इमारतींचे उल्हासनगर पालिकेने चार टप्प्यांत वर्गीकरण केले असून त्यानुसार अतिधोकादायक ठरलेल्या इमारतींपैकी तीन इमारती तोडण्यास सुरुवातही झाली आहे. नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणातील आणखी १४ इमारती महिनाभरात तोडल्या जाणार असल्याने रहिवाशांचा जीव टांगणीला लागला आहे.पहिल्या टप्प्यात अतिधोकादायक इमारती जमीनदोस्त करण्यात येणार असून साई आसाराम, शिवशक्ती या इमारती पाडण्यास सुरुवात झाल्याची माहिती उपायुक्त नितीन कापडणीस यांनी दिली. उल्हासनगर पालिकेने सर्वेक्षण करून ३४८ धोकादायक, तर ३० इमारती अतिधोकादायक घोषित केल्या. पण, सर्वेक्षणात तफावत आढळल्याने आयुक्त मनोहर हिरे व उपायुक्त नितीन कापडणीस यांनी पुन्हा प्रभागनिहाय सर्वेक्षणाचे आदेश दिले. गेल्या चार वर्षांत अनेक अतिधोकादायक इमारतींवर कारवाई झाली. मात्र, त्या इमारतींची नावे यादीतून वगळली नव्हती. काही धोकादायक इमारतींची पुनर्बांधणी झाल्याचेही फेरसर्वेक्षणात दिसून आले. त्यानंतर, नव्या यादीनुसार १२६ धोकादायक, तर १४ इमारती अतिधोकादायक असल्याची माहिती त्यांनी दिली. या यादीवर नजर टाकली असता, पालिकेने नव्याने १२६ इमारती धोकादायक म्हणून घोषित केल्या आहेत. नव्या सर्वेक्षणात या इमारतींची संख्या वाढण्याची शक्यता आयुक्तांनी व्यक्त केली आहे.त्यासाठीच पालिकेने सतर्कतेचा इशारा देत तज्ज्ञ समिती व प्रभाग समितीनिहाय अभियंत्यांमार्फत सर्वेक्षण सुरू केले आहे. त्यामुळे हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. सुरुवातीला पालिकेने प्रभाग-१ मध्ये ६६, प्रभाग-२ मध्ये १४५, प्रभाग-३ मध्ये ७५, तर प्रभाग-४ मध्ये ६२ इमारती धोकादायक असल्याचे जाहीर केले होते. प्रांत कार्यालयामागील साई आसाराम, पालिका परिसरातील शिवशक्ती या अतिधोकादायक इमारती पाडण्याचे काम सुरू असून २५ सेक्शन भागातील दोन मजली इमारत शुक्रवारी जमीनदोस्त केल्याची माहिती सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली. (प्रतिनिधी)