शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
2
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
3
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
4
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
5
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
6
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
7
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
8
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
9
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
10
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
11
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
12
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
13
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
14
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
15
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
16
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
17
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
18
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
19
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
20
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?

ठाणे जिल्ह्यात संततधार पाऊस; २६ घरे पडली!

By सुरेश लोखंडे | Published: August 18, 2022 11:51 AM

ठाणे जिल्ह्यात संततधार सुरू असलेल्या पावसामुळे भिवंडी, मुरबाड, शहापूर या तालुक्यांतील गावांमधील तब्बल २६ घरे पडली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे: जिल्ह्यात संततधार सुरू असलेल्या पावसामुळे भिवंडी, मुरबाड, शहापूर या तालुक्यांतील गावांमधील तब्बल २६ घरे पडली आहेत. यामध्ये २३ घरे पक्की असून तीन घरे पक्की आहेत. तर दोन गाईगुरांचे गोठे आहेत.

जिल्ह्यात कालपासून जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व महामार्गांवर वाहतूक कोंडीने नागरिक हैराण आहे. तर ठाणे उपनगरीय प्रवास वाहतुकीचे वेळापत्रक कोलमडल्याने चाकरमान्यांचे हाल होत आहेत. शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनाही वाहतूक कोंडीचा फटका बसत आहे. ठाण्याचा घोडबंदर रोड, मुंबई-नाशिक महामार्ग, एक्स्प्रेस वेळ आली महामार्गांवर तासनतास वाहतूक खोळंबली आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी ७३.९ मिमी. पाऊस पडला. सर्वाधिक पाऊस भिवंडी तालुक्यात सरासरी ९२.३ मिमी. पडल्याची नोंद सकाळी घेण्यात आली आहे.

जिल्ह्यातील सर्व नद्यांपैक टिटवाळा येथून वाहत जाणारी काळू नदी लवकरच इशारा व धोक्याची पातळी ओलांडण्याची स्थिती आहे. जिल्ह्यातील पाणी पुरवठा करणारे धरणे आधीच भरलेली असल्यामुळे दरवाजे उघडून त्यातील पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. जिल्ह्यात खाड्यांना सकाळी ५ वाजता भरती आली आहे. तर सायंकाळी ४.४९ वा. ही भरती पुन्हा येणार आहे. या दरम्यान ३.६८ मीटर लाटा उसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मुरबाड तालुक्यातील पवाळे, तळेगाव तर भिवंडीतील वेव्हळ येथील पक्के घरे पडली. तर शहापूर तालुक्यात १९ घरे पडली असून त्यात  सायगाव, खूटळ, लाखेवाडी, खरीवली, चेरपोली, साईनगर येथील घरांचा समावेश आहे.

टॅग्स :thaneठाणेRainपाऊस