शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

मुसळधार पावसाने विस्कटले संसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 00:52 IST

शनिवारी आणि रविवारी पुन्हा बरसलेल्या जोरदार पावसाने जनजीवन पार विस्कळीत

ठाणे : दि. २६ आणि २७ जुलै रोजीच्या मुसळधार पावसातून पूरग्रस्त सावरले नसतानाच, शनिवारी आणि रविवारी पुन्हा बरसलेल्या जोरदार पावसाने जनजीवन पार विस्कळीत केले. पुराचे पाणी शेकडो घरांमध्ये शिरल्याने लोकांचे मोठे नुकसान झाले. सोमवारी पावसाने विश्रांती घेतल्याने पूरग्रस्तांना काहीसा दिलासा मिळाला. मात्र, अवघ्या काही दिवसांच्या अंतराने पुराचा दोनवेळा फटका बसल्याने जनसामान्यांचे हाल झाले आहेत.सोमवारी पावसाने पाठ फिरवल्यामुळे जिल्ह्यातील जनजीवन पूर्वपदावर येण्यास मदत झाली. मात्र, रेल्वे वाहतूक अद्यापही पूर्वपदावर आलेली नाही. रेल्वेरुळांवरील खडी मोठ्या प्रमाणात वाहून गेली असून, दुरुस्तीची बरीच कामेही निघाली आहेत. त्यामुळे बदलापूर-कर्जत मार्गावरील रेल्वे वाहतूक अनिश्चित काळासाठी बंद राहणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी ए.के. सिंग यांनी दिली.पावसाचा फटका रस्ते वाहतुकीलाही बसला. मुंबई-नाशिक महामार्गावरील वर्दळीच्या कसारा घाटातील एक किमी रस्ता चार ते पाच फूट खचला असून, मातीभराव वाहून गेल्याने रस्ता दबला आहे. सुमारे २०० फूट उंच डोंगरच घाटरस्त्यावर कोसळल्याने, येथील मुंबई-नाशिक लेन बंद ठेवली आहे. दुसरीकडे, खर्डी-वैतरणा रस्ता आंबिवली-खैरपाडा फाट्याजवळ खचल्याने सोमवारी आंबिवली, टेंभा, वैतरणा आणि वाड्याकडे जाणारी वाहतूकही बंद होती. त्यामुळे या भागातील अनेक गावांचा व आदिवासीपाड्यांचा संपर्क तुटला. याशिवाय, कल्याण-अहमदनगर महामार्गावरील माळशेज घाटात सोमवारी संरक्षक भिंत कोसळून भूस्खलन झाले. याच महामार्गावरील कल्याणजवळील रायते पुलास लागून असलेला रस्ताही उल्हास नदीच्या पुरात वाहून गेल्याने या महामार्गावरील वाहतूक दिवसभर बंद होती. आठ दिवसांपूर्वीच्या पुरातून सावरण्याच्या प्रयत्नात असलेल्या बदलापुरातील कुटुंबांना शनिवारी आणि रविवारी पुन्हा पुराचा सामना करावा लागला. 

टॅग्स :Rainपाऊस