शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

"खारफुटीवर भराव टाकून एका दिवसात जमीन गायब", गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांचे ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2022 3:30 PM

Jitendra Awhad News: महापालिका हद्दीत अनाधिकृत बांधकामांचा मुद्दा गाजत असतांना आता राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या ट्विटमुळे आणखी खबळळ उडाली आहे.

ठाणे - महापालिका हद्दीत अनाधिकृत बांधकामांचा मुद्दा गाजत असतांना आता राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या ट्विटमुळे आणखी खबळळ उडाली आहे. कळव्यातील खारभुमी वरील अनाधिकृत बांधकामांवर त्वरीत कारवाई करा, आधी ११० एकर आता कागदोपत्री ७२ एकर नंतर उरेल ७ एकर असे त्यांचे ट्विट आहे. तसेच एका दिवसात येथील खारफुटी भराव टाकून कशी गायब करण्यात आली याचे फोटे देखील त्यांनी टाकल्याने या अनाधिकृत बांधकामांना आर्शिवाद कोणाचा असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

राज्यात जेव्हा कॉंग्रेस, राष्ट्रवादीची सत्ता होती, त्यावेळेस कळवा, खारेगाव भागातील या ७२ एकर जागेवर सर्व शासकीय कार्यालये एकाच छताखाली आणण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याला आव्हाड यांनी पुढाकार घेतला होता. तसेच याच ठिकाणी इनडोअर स्टेडीअम, जिल्हा परिषदेचे मुख्यालय देखील  उभारण्याचा निर्णय झाला होता. त्यानंतर या ठिकाणी जिल्हा परिषदेकडून बोर्डही लावण्यात आला. परंतु त्यानंतर २०१४ मध्ये राज्यात भाजप सत्तेत आल्यानंतर या ठिकाणी बीकेसीच्या धर्तीवर कॅम्पस उभारण्याचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला होता. परंतु त्याला देखील मुर्त स्वरुप आलेले नाही. तर येथील काही जागेवर निवडणुक विभागाचे कार्यालय देखील सुरु करण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून त्याची चाचपणी देखील झालेली आहे. परंतु जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मिळालेल्या माहिती नुसार तसे असले तरी देखील त्याचे काम अद्याप तेथे सुरु करण्यात आलेले नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

त्यामुळे आता येथे रातोरात भराव टाकून खारफुटी कोणी उध्वस्त केली असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे. आव्हाड यांनी टि¦ट करुन कारवाईची मागणी केली आहे. नाही तर भविष्यात येथे केवळ ७ एकर जागा शिल्लक राहिल असा इशाराही त्यांनी दिला. याठिकाणी मागील दोन वर्षापासून मैदानाच्या चौफेर बाजूने अनाधिकृत बांधकामे उभी राहिली आहेत. परंतु त्यावर कारवाई कोण करणार असा सवाल उपस्थित करीत महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने यातून काढता पाय घेतल्याचे दिसत आहे. परंतु त्यामुळे हळू हळू हे मैदानच आता गिळंकृत केले जात आहे. त्यामुळे किमान आजूबाजूच्या अनाधिकृत बांधकामांवर तरी कारवाई व्हावी अशी इच्छा आव्हाड यांनी व्यक्त केली आहे.

भराव कोणाचा आहे, हे माहित नाही. हे सरकार कडून केले जात असल्याचे सांगितले गेले आहे. याचा अर्थ त्या ठिकाणी खुप मोठी जागा ही सरकारी आहे, जी लपवली जात आहे. त्याठिकाणी मागील दोन वर्षात पक्या चाळी बांधण्यात आलेल्या आहेत. किमान त्या चाळी तरी पाडा, अनेक वेळा महसुल अधिका:यांना सांगून देखील त्यावर काहीच कारवाई होत नाही. (जितेंद्र आव्हाड - गृहनिर्माणमंत्री )

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडthaneठाणे