शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
2
अत्याचारी राक्षस पुन्हा नको, यासाठी माझी लढाई; उमेश पाटील करणार NCP ला रामराम?
3
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
4
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
5
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
6
अदानींच्या झोळीत आली आणखी एक कंपनी; २०० कोटींना झाली डील, जाणून घ्या
7
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...
8
गौतम अदानींना ज्यांनी तारलं, त्यांनाच अमेरिकेत बसला लाखो डॉलर्सचा दंड; कारण काय?
9
IND vs BAN : जा रे जारे पावसा! दुसऱ्या दिवसाचा बहुतांश खेळ पाहण्यात नव्हे पाण्यात जाणार?
10
त्रिग्रही बुधादित्य राजयोग: ७ राशींना अनुकूल, सरकारी कामात लाभ; उत्पन्नात वाढ, मनासारखा काळ!
11
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
12
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
13
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
14
'ती माझी मुलगी आहे...', IIFA सोहळ्यावेळी आराध्याबद्दल विचारताच ऐश्वर्याचं पत्रकाराला थेट उत्तर
15
आज शेअर बाजार खुला राहणार, NSE वर होणार विशेष ट्रेडिंग सेशन; कारण काय?
16
Bigg Boss Marathi Season 5: राखी सावंतची घरात एन्ट्री! 'ड्रामा क्वीन'ला पाहून निक्कीची झाली अशी अवस्था; प्रोमो व्हायरल
17
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
18
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
19
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
20
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा

संजीव जयस्वाल यांनी केला घाबरवण्याचा प्रयत्न, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2022 8:37 AM

Jitendra Awhad : जयस्वाल यांनी तर ‘उपर मोदी का शासन है, निचे देवेंद्र फडणवीस है, कभी भी मर जाएगा तू’ असे बोलून मला घाबरवण्याचा प्रयत्न केला होता, असा गौप्यस्फोट गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी रात्री मुंब्र्यात केला.

 मुंब्रा : मतदारसंघाचा विकास करताना अनेक अडचणी आल्या. युती सरकारच्या काळातील ठामपाचे तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याशी सुरुवातीला विकास कामांवरून संघर्ष झाला. जयस्वाल यांनी तर ‘उपर मोदी का शासन है, निचे देवेंद्र फडणवीस है, कभी भी मर जाएगा तू’ असे बोलून मला घाबरवण्याचा प्रयत्न केला होता, असा गौप्यस्फोट गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी रात्री मुंब्र्यात केला.

आव्हाड म्हणाले की, जयस्वाल यांनी घाबरवले तरी न घाबरता मी विकासकामांना प्राधान्य दिले. दिलजमाई झाल्यानंतर जयस्वाल यांनी मोठ्या प्रमाणावर निधी दिल्यामुळे मुंब्र्यातील अनेक विकासकामे मार्गी लागल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. विरोधी पक्षनेते अशरफ (शानू) पठाण यांच्या प्रभागातील विविध विकासकामांच्या लोकार्पण कार्यक्रमानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये मृत्यूच्या दारापर्यंत जाऊन परत आलो ते फक्त नागरिकांच्या आशीर्वादांमुळे, असेही ते म्हणाले. फेरीवाल्यांमुळे शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडी कायमची संपुष्टात यावी यासाठी एमएम व्हॅली रस्त्यावर हॉकर्स प्लाझाची निर्मिती करण्यात येणार असून, त्यानंतर मुख्य रस्त्यावर फेरीवाल्यांना बसू देणार नसल्याची माहिती त्यांनी दिली. कार्यक्रमाला पठाण, तसेच परिवहन समितीचे सदस्य शमीम खान, पक्षाचे राष्ट्रीय सचिव सय्यद अली अशरफ आदी उपस्थित होते.

 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडthaneठाणे