शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata Passed Away: भारताच्या उद्योगविश्वातील रत्न निखळलं! 'पद्मविभूषण' रतन टाटा कालवश, देशाची मोठी हानी
2
Ratan Tata Passed Away : “मोठं स्वप्न पाहणं अन् दुसऱ्यासाठी दायित्वाची भावना...” PM मोदींनी या शब्दांत वाहिली टाटांना श्रद्धांजली
3
Ratan Tata News Live: ज्ञानी-दानी अन् स्वाभिमानी 'भारत रतन'; देश गहिवरला, मान्यवरांची रतन टाटांना श्रद्धांजली
4
भारताच्या 'रत्ना'ची कहाणी, टाटामध्ये असिस्टंट म्हणून सुरू केलेला प्रवास; नंतर कंपनीला बनवला आंतरराष्ट्रीय ब्रँड
5
Ratan Tata Death: गडकरींची टाटांना आदरांजली: देशाने संवेदनशील उद्योजक-समाजसेवक गमावल्याची व्यक्त केली भावना
6
Ratan Tata News : रतन टाटांना मिळालं अपार प्रेम, ३८०० कोटींच्या मालकानं कशी बनवली कोट्यवधी लोकांच्या मनात जागा
7
Ratan Tata: एका कुटुंबाचा उद्योग ते 'देशाचा विश्वास'! रतन टाटांनी असं उभारलं 'जगात भारी' व्यवसाय साम्राज्य
8
नाशिकच्या नेहरु वनोद्यानाने रतन टाटा यांना घातली होती भुरळ; राज ठाकरे यांना म्हणाले होते, हा तर इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट...!
9
Ratan Tata News: ७९ व्या वाढदिवशी टाटा पोहोचले होते संघ मुख्यालयात; नेमकं काय घडलं होतं?
10
महाराष्ट्राच्या फायद्यासाठी हरयाणाची पुनरावृत्ती करा; अजित पवार यांचं राज्यातील जनतेला आवाहन
11
OBC यादीत महाराष्ट्रातील काही जातींचा समावेश होणार; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची केंद्र सरकारला शिफारस
12
IND vs BAN : विक्रमी विजयासह टीम इंडियाच्या नावे झाली आणखी एक मालिका
13
महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये हरियाणाच्या निकालाची पुनरावृत्ती होणार; चंद्राबाबू नायडूंचे भाकित
14
Nitish Reddy अन् Rinku Singh ची दमदार फिफ्टी, टीम इंडियाच्या नावे झाले २ मोठे विक्रम
15
पराभव जिव्हारी, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर काँग्रेस नेते म्हणाले- 'EVM शी छेडछाड...'
16
लेडी सिंघम..!! काजोलच्या हॉट अन् डॅशिंग लूकवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा, पाहा Photos
17
महाराष्ट्र जिंकणं काँग्रेससाठी सोपं नाही, हरयाणाच्या निकालामधून शिकावे लागतील हे धडे
18
‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ 
19
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
20
Shafali Verma चा मोठा पराक्रम; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गाठला मैलाचा पल्ला

गृहविलगीकरणातील रुग्णांचा कचरा उचललाच जात नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 4:42 AM

ठाणे : ज्या रुग्णांना सौम्य किंवा लक्षणेच नसतात, अशा रुग्णांवर घरीच उपचार केले जात आहेत. परंतु, त्यांच्याकडे निघणारा ...

ठाणे : ज्या रुग्णांना सौम्य किंवा लक्षणेच नसतात, अशा रुग्णांवर घरीच उपचार केले जात आहेत. परंतु, त्यांच्याकडे निघणारा जैविक कचरा उचलला जात असल्याचा दावा महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाने केला होता. परंतु, त्यांचा हा दावा बुधवारी झालेल्या महासभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी फोल ठरवला. अशा रुग्णांच्या घरांतील कचरा उचलला जात नसल्याचा आरोप नगरसेवकांनी केला आहे. त्यामुळे कचरा गोळा केला जात नसेल, तर संबंधित संस्थेला बिल का द्यायचे, असा प्रश्न उपस्थित करून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी नगरसेवकांनी केली. त्यामुळे या संस्थेच्या वाढीव खर्चाचा प्रस्ताव तहकूब ठेवण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेत घेण्यात आला.

कोरोना रुग्णांच्या कचऱ्याचे निर्मूलन करण्याचे काम मे. मुंबई वेस्ट मॅनेजमेंट आणि मे. एन्व्हायरो व्हीजील या दोन संस्थांना ६ महिन्यांच्या कालावधीसाठी देण्यात आले आहे. यासाठी १ कोटींच्या खर्चाला मान्यतादेखील देण्यात आली आहे. त्यामुळे या दोन्ही संस्थांना अनुक्रमे ५० लाखांच्या कामांचा कार्यादेश देण्यात आला आहे. ठाणे महापालिकेचे कोविड हॉस्पिटल, कोविड सेंटर आणि आयसोलेशन सेंटर्समध्ये निर्माण होणारा कचरा संकलित करून या कचऱ्याचे निर्मूलन करण्याची जबाबदारी मे. मुंबई वेस्ट मॅनेजमेंट या संस्थेवर देण्यात आली आहे. अँटिजन टेस्ट सेंटर्स आणि होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्यांकडून कचरा संकलित करण्याचे काम एन्व्हायरो व्हीजील या संस्थेला देण्यात आले आहे. बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत दोन्ही संस्थांचा १ कोटी ५० लाखांचा वाढीव बिलाचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आल्यानंतर एन्व्हायरो व्हीजील संस्थेच्या कारभारावरच नगरसेवकांकडून टीका करण्यात आली.

शिवसेनेच्या नगरसेविका रुचिता मोरे, नगरसेवक विकास रेपाळे, माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांनी गृहविलगीकरणात असणाऱ्या रुग्णांकडून कचरा उचललाच जात नसल्याची माहिती सभागृहात उघड केली. ठाणे महापालिकेच्या प्रदूषण अधिकारी मनीषा प्रधान यांनी होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्यांकडून कचरा संकलित करण्यासाठी मेडिकलची टीम तसेच एक गाडी प्रभागात फिरत असल्याची माहिती दिली. या मेडिकल टीमकडून घरी असणाऱ्यांसाठी कचऱ्यासाठी पिशव्यादेखील देण्यात येत असल्याचे सांगितले. मात्र, आतापर्यंत रुग्णांकडून किती कचरा संकलित केला, असा सवाल विकास रेपाळे यांनी केल्यानंतर मनीषा प्रधान यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही. मार्च ते ऑक्टोबर २०२० या कालावधीत एकूण १२ हजार ७८० किलो कचरा संकलित करण्यात आला असल्याचे प्रधान यांनी सांगितले. मात्र, होम आयसोलेशनमधील रुग्णांकडून किती कचरा संकलित केला, याची माहिती प्रधान यांना देता आली नाही. दुसरीकडे नगरसेवकांकडेच कोणीही फिरकले नाही, तर सर्वसामान्य नागरिकांचे काय, असा प्रश्न उपस्थित करून हा प्रस्ताव तहकूब ठेवण्याची मागणी केली. त्यानंतर महापौर नरेश म्हस्के यांनी सदरचा प्रस्ताव तहकूब ठेवत असल्याचे जाहीर केले.

.............

मे. मुंबई वेस्ट मॅनेजमेंट आणि मे. एन्व्हायरो व्हीजील या दोन संस्थांची नोव्हेंबर २०२० ते मार्च २०२१ या कालावधीसाठी वाढीव रक्कम अनुक्रमे ४१ लाख १० हजार तसेच १० लाख ६४ अशी एकूण ५४ लाख ७५ हजार एवढी वाढीव रक्कम आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने पुढील सहा महिन्यांच्या कालावधीपर्यंत कोविडचा कचरा संकलित करण्यासाठी आणि निर्मूलनासाठी पुढील सहा महिन्यांच्या कालावधीसाठी मे. मुंबई वेस्ट मॅनेजमेंट आणि मे. एन्व्हायरो व्हीजील यांनी ७० लाख आणि २५ लाख अशी एकूण ९५ लाखांची रक्कम आवश्यक असून त्याअनुषंगाने १ कोटी ५० लाख वाढीव खर्चाचा प्रस्ताव महापालिकेने सर्वसाधारण सभेत आणला होता.