शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपा हा दहशतवाद्यांचा पक्ष"; मल्लिकार्जून खरगेंचा PM मोदींवर पलटवार
2
"मला चारही बाजूंनी घेरलंय, मी तुमच्यात असो वा नसो…’’, सनसनाटी दावा करत जरांगे पाटलांचं भावूक आवाहन
3
भ्रष्ट अधिकाऱ्यांना पीएम मोदी घरचा रस्ता दाखवणार; कारवाईच्या सूचना दिल्या
4
पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका, आमदार सुलभा खोडकेंचं काँग्रेसमधून सहा वर्षांसाठी निलंबन  
5
गुजरातमध्ये भिंत कोसळल्याने ७ मजूरांचा मृत्यू; अनेकजण अडकल्याची भीती, बचावकार्य सुरु
6
Sachin Tendulkar, Sara Tendulkar Birthday: 'बापमाणूस' सचिन तेंडुलकरच्या लाडक्या लेकीला शुभेच्छा, म्हणाला- "सारा, मी खूप नशीबवान,.."
7
'खाकी'तील बापमाणूस! झुडपात सापडली नवजात मुलगी; पोलीस अधिकारी घेणार दत्तक
8
Ranji Trophy Elite 2024-25 : अय्यरच्या पदरी 'भोपळा'; टीम इंडियात कमबॅकचा मार्ग कसा होईल मोकळा?
9
"नवी मुंबई विमानतळाला श्री रतन टाटा यांचं नाव द्यावं", अभिनेते परेश रावल यांची मागणी
10
"आचारसंहिता लागेपर्यंत आरक्षणाबाबत निर्णय घ्या अन्यथा…’’ मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला निर्वाणीचा इशारा
11
'शिवाजी पार्कवर काँग्रेस, राष्ट्र्रवादीचे मिक्स विचार', इकडे हिंदूत्वाचा विचार';गुलाबराव पाटलांचा पलटवार
12
शेअर बाजारात गुंतवणूकीचं टेन्शन येतं, मग 'हे' सुरक्षित पर्याय आहेत की; मॅच्युरिटीवर मिळणार जबरदस्त रिटर्न
13
"...यासाठी आयुष्यातील २२ वर्षे खपवली नाही"; पंकजा मुंडेंनी दसरा मेळाव्यात व्यक्त केली खंत
14
"..आता ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागला नाही का?", १७ जातींच्या समावेशावरून जरांगे पाटलांचा सवाल
15
अनोखी क्रिकेट स्पर्धा रिटर्न! ६ खेळाडू आणि ५ ओव्हर्स; भारताचा संघ जाहीर, केदार जाधवला संधी
16
'आत्महत्या म्हटलं की दक्षिणेतील नेत्यांची आठवण येते'; लक्ष्मण हाकेंनी पंकजा मुंडे-धनंजय मुंडेंना काय केली विनंती?
17
Nikki Tamboli Arbaz Patel Romantic Photoshoot: दो जिस्म, एक जान... 'बिग बॉस मराठी' फेम निक्की-अरबाझचं रोमँटिक फोटोशूट, पाहा Photos
18
हरियाणाच्या कैथलमध्ये भीषण अपघात; कालव्यात पडली कार, एकाच कुटुंबातील ८ जणांचा मृत्यू
19
HAL as Maharatna: 'महारत्न' कंपन्यांच्या यादीत आणखी एका कंपनीची एन्ट्री; HAL बनली १४ वी सरकारी कंपनी; पाहा यादी
20
Nathan Lyon Video: ढुंढो ढुंढो रे... Live मॅचमध्ये चेंडू झुडुपात गेला, ऑस्ट्रेलियाचा नॅथन लायन जंगलात उतरला अन्...

किसान ॲपचे वरातीमागून घोडे ; वादळ-वारे येऊन गेल्यानंतर अलर्ट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 4:40 AM

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणो : तौक्ते चक्रीवादळाच्या नैसर्गिक आपत्तीची माहिती शेतकऱ्यांना काही काळ आधीच दिल्याचा दावा कृषी विभागाकडून केला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणो : तौक्ते चक्रीवादळाच्या नैसर्गिक आपत्तीची माहिती शेतकऱ्यांना काही काळ आधीच दिल्याचा दावा कृषी विभागाकडून केला जात आहे. तरीही जिल्हाभरातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला. तब्बल २३८ हेक्टरवरील कृषी संपत्ती या वादळामुळे उद्ध्वस्त झाली. त्यामुळे शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. किसान ॲपचे वरातीमागून घोडे या म्हणीप्रमाणे वादळाची ऑनलाईन माहिती मोबाईलवर उशिरा मिळाल्याचा दावाही शेतकऱ्यांनी केला आहे.

शेतकऱ्यांना आपत्तीसह त्यांना उपयुक्त अशी माहिती देण्यासाठी जिल्हाभरात कृषीच्या क्षेत्रिय पातळीवरील कर्मचाऱ्यांच्या व्हॉटसॲप ग्रुपवर प्रत्येक तालुक्यांचे ग्रुप तयार केलेले आहेत. त्याद्वारे इत्थंभूत माहिती शेतकऱ्यांना आधीच देऊन अलर्ट केले जाते. शेतकऱ्यांच्या योजनांची माहितीही या ग्रुपवर दिली जाते. वर्षभरात दीड लाखांच्या जवळपास एसएमएस शेतकऱ्यांना वेळच्या वेळी दिले जात असल्याचा दावा जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकार अंकुश माने यांनी केला. या माहितीचा लाभ जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील गट शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

ताैक्ते चक्रीवादळाचा फटका बसून जिल्ह्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. यात घरांच्या नुकसानीसह शेतकऱ्यांच्या भाजीपाल्यासह आंबा, रोपवाटिका आदींचे नुकसान झाले आहेत. झाडे उन्मळून पडली आहेत. यादरम्यान ग्रामीण भागात मोबाईल नेटवर्क अभावी बहुतांशी शेतकऱ्यांना माहिती मिळण्यास विलंब झाल्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. या चक्रीवादळामुळे जिल्ह्यातील तिघांच्या मृत्यूसह आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. ५६६ घरांचे नुकसान झाले असून २३८ हेक्टरवरील आंबा, काजू, भात आणि भाजीपाल्याचे नुकसान होऊन तब्बल १६४ गावांना चक्रीवादळाचा फटका बसला आहे. चक्रीवादळामुळे जिल्ह्यात पावसासह वादळी वारा ताशी ९० ते १०० किमी वेगाने वाहत होता. जिल्ह्यातील २३८ हेक्टरवरील आंबा-काजूसह रोपवाटिकांचे मुरबाड, भिवंडी व शहापूर तालुक्यात नुकसान झाले आहे.

जिल्ह्यातील १६४ गावांमधील २३८.१० हेक्टरवरील आंब्यासह काजू, केळी, उन्हाळी भात आणि भाजीपाल्याचे नुकसान या अवकाळी पावसाने झाले आहे. जिल्ह्यातील ५८२ शेतकऱ्यांना लाखो रुपयांचे नुकसान सोसावे लागले. या शेतकऱ्यांचे शेडनेट फाटले, पॉलिनेट तुटले, घरावरील पत्रेही उडाली. जिल्ह्यातील रोपवाटिकांचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मुरबाडमधील रोपवाटिकांच्या ३ हजार २०० रोपांचे नुकसान झाले. भिवंडी तालुक्यातील चाविंद्रा येथील रोपवाटिकेतील ४ हजार ४५० रोपांची वाट या वादळाने लावली आहे. यामध्ये आंब्यांच्या कलमांसह काजू, बदाम, जांभूळ, सीताफळ, सांग, शेवगा आदी रोपांच्या नुकसानीचा फटका वाटिकांना बसला आहे.

.........