शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात
2
“...तर शरद पवारांच्या इशाऱ्यावर मनोज जरांगे मराठा आंदोलन करत होते स्पष्ट”: प्रकाश आंबेडकर
3
पावसाचा कहर! उत्तर प्रदेशमध्ये ८ जणांचा मृत्यू; अनेक घरांची पडझड, ३०० गावांतील वीज खंडित
4
है तय्यार हम! T20 वर्ल्ड कपसाठी सरावाचा श्रीगणेशा; एका ट्रॉफीसाठी १० संघ मैदानात, PHOTOS
5
IDFC first Bank मध्ये IDFC Ltd चे होणार विलीनीकरण; गुंतवणूकदारांचा कसा होणार फायदा?
6
देशातील टॉप १० श्रीमंत देवस्थानांच्या यादीत राम मंदिर; किती कोटींचे दान मिळाले? आकडा पाहाच
7
आनंद दिघे यांना मारले होते, त्यांचा घातपात झाला होता; संजय शिरसाठ यांचा गंभीर आरोप
8
Sunil Tatkare on BJP Mahayuti: "भाजपा मित्रपक्षांना सन्मानाने वागवतो याचं उदाहरण म्हणजे..."; सुनील तटकरेंनी थेट पुरावाच दिला
9
मुशीर खानचा भीषण अपघात! मुंबईच्या संघाला मोठा झटका; BCCI ने दिली महत्त्वाची माहिती
10
सलमानसोबत हिट सिनेमा, मात्र करिअरमध्ये अभिनेत्री ठरली अपयशी, १२ वर्षांपासून आहे कलाविश्वातून गायब
11
हिजबुल्लाह चीफ हसन नसरल्लाह 'खतम'! मुलीचाही मृत्यू; इस्रायली लष्कराचा मोठा दावा
12
Investment Tips : गुंतवणूकदारांसाठी आली सुरक्षित गुंतवणुकीची संधी, सरकार उभारणार २० हजार कोटी, तुम्हालाही संधी मिळणार
13
IND vs BAN, 2nd Test Day 2 : एकही चेंडू नाही फेकला अन्.. ९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
14
काँग्रेसच्या कटकटी थांबेना! जाहीरनाम्याच्या कार्यक्रमाकडे शैलजा-सुरजेवालांची पाठ
15
Som Pradosh 2024: पितृपक्षात सोम प्रदोष व्रताची संधी म्हणजे दुप्पट लाभ; अवश्य करा 'ही' एक कृती!
16
मुंबईत हायअलर्ट! धार्मिक स्थळे दहशतवाद्यांच्या निशाण्यावर; पोलीस सतर्क, चोख बंदोबस्त
17
फवाद खानच्या पाकिस्तानी सिनेमाला भारतात बंदीच! 'द लीजेंड ऑफ मौला जट' प्रदर्शित होणार नाही, कारण...
18
'या' सरकारी कंपनीला १०० कोटी रुपयांची ऑर्डर; Adani समूहासाठी करणार काम
19
महिलांना दरमहा ₹2 हजार, 25 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार अन्...; हरियाणा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा
20
Exclusive: दीड वर्षाच्या मुलासोबत कसं केलं शूट? प्रिया बापटने सांगितली 'रात जवां है'च्या सेटवरची धमाल-मस्ती

आणखी किती बळी हवेत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 12:42 AM

पश्चिमेकडील कर्णिक रोडवर गेल्या महिन्यात एका शाळकरी मुलाला अपघातात नाहक आपला जीव गमवावा लागला होता.

कल्याण : पश्चिमेकडील कर्णिक रोडवर गेल्या महिन्यात एका शाळकरी मुलाला अपघातात नाहक आपला जीव गमवावा लागला होता. मात्र, यातून केडीएमसी प्रशासनाने कोणताही धडा घेतलेला दिसत नाही. याची प्रचीती आधारवाडी जेल रोडची दयनीय अवस्था पाहताना येते. या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम तर अपूर्ण राहिलेच, पण त्याचबरोबर यावरील जीवघेण्या खड्ड्यांमुळे येथून जाणाऱ्या वाहनचालकांना जीव मुठीत धरूनच मार्गस्थ व्हावे लागते आहे. याशिवाय, येथील धुळीमुळे या परिसरात राहणाºया नागरिकांना श्वसनाचे विकार जडले आहेत. एकंदरीत परिस्थिती बघता प्रशासन आणखीन बळी जाण्याची वाट बघते आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.आधारवाडी चौकाची गणना महत्त्वाच्या चौकांत केली जाते. मुंबई-मुरबाड-नगर मार्ग आणि नाशिक मार्ग जोडणारे रस्ते या चौकातून जात असल्याने येथे नेहमीच वर्दळ असते. यात दुचाकी, चारचाकी वाहनांसह अवजड वाहनांचाही समावेश आहे. यामुळे अनेकदा या चौकात सकाळ-संध्याकाळ वाहतूककोंडीचे चित्रही कायम दिसून येते. चौकातून जाणाºया आधारवाडी जेल रोडची अवस्था अत्यंत बिकट आहे. संथगतीने सुरू असलेले या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम पूर्णपणे खोळंबले आहे. पावसाळ्यात या रस्त्याची पुरती चाळण झाली होती. गणेशोत्सवात काही प्रमाणात डांबरीकरण करून रस्ता सुस्थितीत आणण्याचा प्रयत्न झाला, पण त्यानंतरही रस्त्यांची खड्डेमय अवस्था ‘जैसे थे’ राहिली आहे. गेले अनेक महिने ही परिस्थिती अशीच असूनही महापालिकेचे याकडे दुर्लक्ष झाले आहे.जीवघेण्या खड्ड्यांमधून वाट काढणे बिकट बनले असताना धुळीचा प्रचंड त्रास पादचारी आणि रहिवाशांना सहन करावा लागतो आहे. या भागातील टोलेजंग इमारतीपर्यंत काँक्रिटीकरणाचे काम झालेले आहे, मग पुढील चाळी आणि घरांसमोरील रस्त्याकडे झालेला कानाडोळा यामागचे गौडबंगाल काय, असाही सवाल उपस्थित होत आहे.दोन महिन्यांवर पावसाळा येऊन ठेपला आहे. जर आताच रस्त्याची अवस्था दयनीय असेल, तर पावसाळ्यात परिस्थिती अधिकच गंभीर बनणार आहे. स्थानिक नगरसेवक वरुण पाटील यांच्या म्हणण्यानुसार महापालिका आयुक्त आणि संबंधित विभागाकडे वारंवार पत्रव्यवहार करूनही अद्याप कार्यवाही झालेली नाही. २०१४-१५ मध्ये काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण होणे आवश्यक होते, पण प्रशासनाची मानसिकता नसल्याचे पाटील यांचे म्हणणे आहे. काही तांत्रिक अडचणी असतील, तर निदान डांबराने तरी खड्डे भरावेत, जेणेकरून रस्ता सुस्थितीत होईल, अशी मागणी प्रशासनाकडे केल्याचे पाटील यांनी सांगितले.