शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंना सवाल, पवारांवर टीका; मराठा-ओबीसी आरक्षणावर देवेंद्र फडणवीस रोखठोक बोलले!
2
मध्यरात्री १२.३० पर्यंत चालली महायुतीची बैठक; एकनाथ शिंदेंची मोजकीच प्रतिक्रिया...
3
बच्चू कडूंना अक्षय शिंदेचा एन्काउंटर कधी झाला हेच माहिती नाही; पण 'देवाभाऊ न्याय'वर दिली बोचरी प्रतिक्रिया...
4
"भाजपशी संबंधित प्रत्येक आरोपी फरार कसा होतो?", देशमुखांनी फडणवीसांना घेरलं
5
खळबळजनक! फ्रिजमध्ये ३० तुकडे; महालक्ष्मीच्या हत्येचं बंगालशी कनेक्शन, 'तो' मिस्ट्री मॅन कोण?
6
Baramati Vidhan Sabha 2024 :जय पवार विधानसभा निवडणूक लढवणार? अजित पवार म्हणाले...
7
राँग नंबरवाली Love Story! घरातून पळाली, मंदिरात प्रियकरासोबत लग्न केले, ५ महिन्यांनी...
8
श्राद्ध भोजनाने दोष लागतो का? श्राद्धाचे जेवण जेवावे की नाही? वाचा, दत्तगुरु, नवनाथांची कथा
9
Zerodha News: सेबीच्या 'या' नियमांमुळे झिरोदाला टेन्शन; महसूलात ५०% घसरणीची व्यक्त केली शक्यता 
10
भाजपातील पिता पुत्र जोडीनं घेतली शरद पवारांची भेट; 'तुतारी' हाती घेण्याची शक्यता
11
मोठ्या नेत्याने पक्षात येण्याची इच्छा व्यक्त केली; जयंत पाटलांचा गौप्यस्फोट
12
लेबनानमध्ये एअरस्ट्राइक केल्यावर हिज्बुल्लाचा इस्रायलवर निशाणा, लष्करी तळावर डागलं मिसाइल
13
IND vs BAN 2nd Test : कानपूरमध्ये स्वागतावेळी Virat Kohli चा संताप; म्हणाला, "मला फक्त..."
14
Video - पिटबुल बनला सुपरहिरो! किंग कोब्राशी झुंज देऊन वाचवला लहान मुलांचा जीव
15
भाविकांवर काळाने घातली झडप! कारचा झाला चेंदामेंदा, 7 जागीच ठार
16
टीव्ही-मोबाइल सहजरित्या रिपेअर होणार की नाही? आता खरेदी करतानाच याची माहिती मिळणार, जाणून घ्या
17
३ ग्रहांचे ६ राजयोग: ८ राशींना फायदा, नवीन नोकरीची ऑफर; परदेशातून लाभ, पद-पैसा वाढ!
18
बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षीय मुलाचा मृत्यू; जुन्नर तालुक्यातील तेजेवाडी येथील घटना
19
अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणानंतर मराठी अभिनेत्याची पोस्ट; 'म्हणाला, 'कायद्याने झालं असतं तर...'
20
रोहित-विराट दोघांनी 'ती' मर्यादा ओलांडलीये! असं का म्हणाले कपिल पाजी?

अजून किती वर्षे आम्हाला तुम्ही बाहेर ठेवणार, श्रीगौरी सावंत यांनी उपस्थित केला प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 3:13 PM

Thane News: तृतियपंथी समाजाकडे टाळ्या वाजवण्याच्या पलीकडे एक माणूस आपण पाहिले पाहिजे. आम्हाला रोजगार नाहीतर आम्ही भीक मागणार नाही का असा सवालही त्यांनी यावेळी केला.

ठाणे - तृतियपंथी समाजाकडे टाळ्या वाजवण्याच्या पलीकडे एक माणूस आपण पाहिले पाहिजे. आम्हाला रोजगार नाहीतर आम्ही भीक मागणार नाही का असा सवालही त्यांनी यावेळी केला. तृतियपंथीना न मिळणाऱ्या आरोग्य सुविधा यावर त्यांनी परखड भाष्य केले.भारताचे संविधान जर कोणता भेदभाव करत नाही तर अजून किती वर्षे तुम्ही आम्हाला बाहेर ठेवणार आहात असा प्रश्न श्रीगौरी सावंत यांनी उपस्थित केला. यावेळी गायत्री आणि त्यांचे नाते उलगडले.

कोमसाप आयोजित दुसरे राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलनात श्रीगौरी यांनी मी ते आम्ही या विषयावरील मुलाखतीच्या माध्यमातून तृतियपंथीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला.  कोरोनाकाळात तृतियपंथी आणि देह विक्रेय महिलांना कोणत्याहीप्रकारे मदत आली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. आपण २१ व्या शतकात आहोत पण आमच्याकडे रेशन कार्ड नाही. सरकारकडे अद्यापही आमच्या समाजाचा डेटा नाही. आम्ही देखील समाजाचा घटक आहोत आमचे आर्थिक सक्षमीकरण व्हायला हवे. आमहाला नोकरी अंडी शिक्षणाची गरज आहे. स्त्री - पुरूषांसाठी जो कायदा आहे तो आमच्या समाजासाठी देखील असायला हवा असे त्या म्हणाल्या. ज्यावेळी मी या जगाचा निरोप घेईल त्यावेळी मला या तिरंग्यात लपेटून जायचे आहे इतके काम मला करायचे असल्याचे त्यांनी सांगितले.  पंकज दळवी यांनी मुलाखत घेतली. कार्यक्रमाला ज्योती ठाकरे आणि डॉ. अरुंधती भालेराव यांची विशेष उपस्थिती होती. 

महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून तृतियपंथीचे बचत गट तयार केले जाणार आहे. तसा ठराव बोर्ड मीटिंगमध्ये केल्यानंतर या बचत गटाच्या निधीसाठी सरकारकडे  मागणी करणार असल्याचे अध्यक्षा ज्योती ठाकरे यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणे