शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
2
जुन्या सरकारांमुळे महाराष्ट्राचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मविआवर टीका
3
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 
4
‘मन की बात’ म्हणजे देवदर्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदी; देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी भुकेले 
5
भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब
6
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
7
काेचिंग क्लास चालक तीन भावांचा मुलीवर अत्याचार; तिघांनाही अटक
8
राजू शेट्टी पवईतून ठरले ‘विजयी’; म्हाडाच्या लॉटरीत अभिनेत्री संस्कृती बालगुडे अपात्र
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

लॉकडाऊन झाल्यास जगायचे कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2021 4:36 AM

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या लॉकडाऊन करण्याचे संकेत राज्य सरकारने दिले आहेत. आधीच सलग सहा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या लॉकडाऊन करण्याचे संकेत राज्य सरकारने दिले आहेत. आधीच सलग सहा ते सात महिन्यांच्या लॉकडाऊनमुळे लोकांवर उपासमारीची वेळ आली होती. त्यात पुन्हा असाच लॉकडाऊन झाल्यास हॉटेल व्यवसाय आणि त्यावर अवलंबून असलेल्या हजारो कामगारांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ येऊ शकते. त्यापेक्षा कडक निर्बंध व्हावेत, अशी अपेक्षा ठाण्यातील हॉटेल अ‍ॅन्ड रेस्टॉरन्ट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली आहे.

ठाणे शहर हॉटेल संघटनेचे सदस्य पुष्पराज शेट्टी लॉकडाऊनबाबत आपले मत मांडताना म्हणाले की, सध्या हॉटेल व्यवसाय हे ५० टक्के क्षमतेने सुरू आहेत. शिवाय, रात्री आठनंतर सरकारने दिलेल्या निर्बंधानुसार ते बंद केले जातात. त्यामुळे आधीच हॉटेल व्यावसायिकांच्या उत्पन्नावर परिणाम झालेला आहे. सरसकट टाळेबंदीपेक्षा एखाद्याने मास्क घातला नाही, सामाजिक अंतराचे नियम पाळले नाही आणि स्वच्छतेचे नियम पाळले नाहीत तर अशा लोकांवर जरूर कारवाई केली जावी. कोरोनाच्या पहिल्या लाटेमुळे २२ मार्च २०२० पासून हॉटेल, उपाहारगृह बंद ठेवले होते. सलग सात महिने ते बंद पूर्णपणे राहिल्यामुळे हॉटेल व्यवसायाला उतरती कळा लागली होती. अनेक जण यात कर्जबाजारी झाले. काहींनी आत्महत्या केली. त्यावर अवलंबून असलेल्या अनेक कामगारांचे मोठ्या प्रमाणात हाल झाल्याच्या वेदना शेट्टी यांनी व्यक्त केल्या आहेत.

ते पुढे म्हणाले, लॉकडाऊनची आवश्यकता आहे की नाही? यावर जाणकार मंडळीच भाष्य करू शकतील. पण लोकांची रोजीरोटी चालू राहिली पाहिजे. कोणाचाही रोजगार न बुडता निर्बंध आणले गेले पाहिजेत. तरीही लॉकडाऊन लादले गेल्यास उत्पन्नाचे साधनच बंद होऊ शकते. त्यामुळे मग जगायचे कसे? असाही यक्ष प्रश्न असल्याचे अन्य एका पदाधिकाऱ्याने उपस्थित केला आहे. यावर अवलंबून असलेले शेकडो कामगार, त्यांचे कुटुंबीय तसेच हॉटेल मालक आणि चालक अशा सर्वांचेच यात मोठ्या प्रमाणात हालअपेष्टा होण्याची भीतीही हे पदाधिकारी व्यक्त करीत आहेत. मग विनाकारण बाहेर पडणाऱ्यांवर, मास्क न लावणाऱ्यांवर कारवाई जरूर झाली पाहिजे, असेही ते सांगतात.

लॉकडाऊन होऊ नये यासाठी सध्या काही अपवाद वगळता हॉटेल व्यावसायिकांकडून काटेकोरपणे नियमांचे पालन केले जात आहे. यासाठी पालिका आणि पोलीस यंत्रणांनीही आणखी मोठी मोहीम उघडली पाहिजे. त्याला नागरिकांनीही प्रतिसाद देणे अपेक्षित आहे. नियम आणखी कडक केले जावेत. तसेच जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवरही कारवाई केली जावी, असा सल्लाही शेट्टी यांनी दिला आहे.