शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
3
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
4
वायुसेनेच्या एअर शोदरम्यान चेन्नईतील बीचवर चेंगराचेंगरी; ५ मृत्युमुखी, २५० जखमी
5
बारामतीच्या लेकाने बिग बॉस जिंकले! सूरज चव्हाणसाठी अजित पवारांच्या पत्नीची पोस्ट, म्हणाल्या- "पहिल्या दिवसापासून..."
6
Abhishek Sharma २०० + स्ट्राइक रेटनं कुटत होता धावा, पण 'गडबड घोटाळा' झाला (VIDEO) 
7
Bigg Boss 18 : "मी डाकूंच्या खानदानातून आहे, त्यामुळे...", गुणरत्न सदावर्तेंची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री, सलमानलाही हसू आवरेना
8
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
9
Bigg Boss 18: ९० च्या दशकातील हिरोईन शिल्पा शिरोडकरची एन्ट्री, सलमान म्हणतो, 'इथे कुठे आली तू...?'
10
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
11
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
12
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
13
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
14
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
15
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
16
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
17
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
18
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
19
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
20
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?

अनधिकृत बांधकामांचे दुष्टचक्र कसे भेदायचे?

By संदीप प्रधान | Published: March 13, 2023 9:17 AM

ठाणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या शहरांमध्ये हजारो अनधिकृत बांधकामे उभी आहेत.

संदीप प्रधान, वरिष्ठ सहायक संपादक

ठाणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या शहरांमध्ये हजारो अनधिकृत बांधकामे उभी आहेत. ही बांधकामे स्थानिक माफिया कम राजकीय नेत्यांनी उभी केलेली आहेत. ती पाडण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. मात्र ती पाडण्यास त्यामध्ये राहणाऱ्या रहिवाशांबरोबरच ती उभी करणाऱ्या राजकीय माफिया नेत्यांचा विरोध आहे. गेल्या काही दिवसांत अनधिकृत बांधकामांमधील नोकरशाहीचे हितसंबंध यावर प्रकाश पडला. अनधिकृत बांधकाम विभागाचे सहायक आयुक्त महेश आहेर यांच्यावर या संदर्भात गंभीर आरोप झालेले आहेत.

मुंबईतील गिरण्यांच्या जमिनी निवासी व व्यापारी वापराकरिता खुल्या झाल्यावर बांधकाम क्षेत्रात बूम आला. जागांचे दर गगनाला भिडले. मुंबईत मोठ्या संख्येने बांधकामे सुरू झाली. जुन्या चाळी, भाड्याच्या इमारती यांमध्ये वास्तव्य करणारा मराठी मध्यमवर्ग आर्थिक गरजांमुळे व कुटुंब वाढल्याने ठाणे जिल्ह्यातील शहरांकडे सरकला. नेमका याच संधीचा गैरफायदा ठाणे जिल्ह्यातील जमीनमालक, स्थानिक माफिया (जे पुढे बरेचसे राजकारणात आले) व नोकरशहा यांनी घेतला. त्यावेळी राज्यात काँग्रेसचे सरकार होते. ठाण्यात शिवसेनेने बस्तान बसवले होते; तर डोंबिवली-कल्याण व आजूबाजूच्या परिसरात जनसंघाचे वर्चस्व होते. आदिवासी पट्ट्यात वनवासी कल्याण आश्रमाचे काम आहे. त्यामुळे कदाचित येथे आपले फारसे मतदार नाहीत, या आकसापोटी असेल; पण काँग्रेसच्या सत्ताधाऱ्यांनी ठाणे जिल्ह्याचा विकास हा भूमाफिया व भ्रष्ट नोकरशहा यांच्या हाती सोपवून दिला. त्यातून मग येणाऱ्या लोंढ्यांकरिता मिळेल तिथे, मिळेल तशा इमारती उभ्या केल्या गेल्या. मुंबईतून जागा विकून आलेल्यांकडे चार पैसे असल्याने त्यांनी मागेपुढे न पाहता घरे घेतली. कालांतराने आपण राहत असलेल्या इमारती बेकायदा असल्याचा साक्षात्कार अनेकांना झाला. अनधिकृत बांधकामांची प्रकरणे न्यायालयात गेली. वेळोवेळी कारवाईचे आदेश झाले. मामुली कारवाई झाली; पण पुढे काहीच झाले नाही.  यामुळे ठाणे, मुंब्रा, दिवा, डोंबिवली, कल्याण, टिटवाळा, अंबरनाथ, बदलापूर अशा शहरांत असंख्य बांधकामे उभी आहेत.

नाेकरशाही बाबाजींची बटीक

- मुंब्र्यातील अनधिकृत बांधकामांवरून स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड व अनधिकृत बांधकाम विभागाचे सहायक आयुक्त आहेर यांच्यात महापालिका निवडणुकांच्या तोंडावर संघर्षाला तोंड फुटले. तत्पूर्वी ठाणे महापालिकेबाहेर लागलेला फलक हाही त्याच संघर्षाचा परिपाक होता. 

- नव्वदच्या दशकात जे. जे. हत्याकांडात सहभाग असलेल्या व उल्हासनगरातील एका वादग्रस्त रिसॉर्टमध्ये त्या हत्याकांडानंतर आसरा घेतलेल्या सुभाषसिंह ठाकूर (बाबाजी) याच्या नावाने धमकावण्याचे प्रकरण धक्कादायक आहे. याची चौकशी झाल्याचे दिसत नाही. 

- तुरुंगात असूनही हा बाबाजी ठाणे जिल्ह्यातील गुन्हेगारीचा रिमोट कंट्रोल हातात राखून आहे, हेच स्पष्ट होते. त्यावेळी राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाचा मुद्दा तापला होता. राजकारण्यांबरोबर आता नोकरशाहीदेखील बाबाजींची बटीक झाली आहे. जिल्ह्यातील अनधिकृत बांधकामांचे दुष्टचक्र कुणाला थांबवायचे नाही, हेच वास्तव आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :thaneठाणे