शहरं
Join us  
Trending Stories
1
Haryana, Jammu & Kashmir Assembly Election Results 2024 Live: हरयाणात अनिल विज, विनेश फोगट पिछाडीवर; हुड्डा आघाडीवर
2
जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सची मुसंडी, भाजपा मागे; पण हरयाणात कल पूर्णच फिरला!
3
"गणपती दारू प्यायला म्हणून..."; उत्तम जानकरांच्या विधानानं वाद, भाजपा आक्रमक
4
वृद्धांना तरुण करू सांगणाऱ्या जोडप्याने ३५ कोटी लुटले पण अकाऊंटमध्ये फक्त ६०० रुपये सापडले
5
मोठा ट्विस्ट! जम्मू-काश्मीरमध्ये निवडणूक ९० जागांसाठी, पण आमदार ९५ असणार; सत्ता कशी स्थापन करणार?
6
Navratri 2024: नवरात्रीत अनवाणी चालण्याने खरंच लाभ होतो का? वाचा धार्मिक आणि शास्त्रीय कारण!
7
"पती पार्किंगमधून बाईक घेण्यासाठी गेला पण परत आलाच नाही..."; पत्नीने सांगितली आपबिती
8
IRE vs RSA : "हाय हाय यह मजबूरी"; ODI मध्ये बॅटिंग कोचवर आली फिल्डिंगसाठी मैदानात उतरण्याची वेळ!
9
Israel Iran War : मोठं युद्ध सुरू होणार? इराणच्या राष्ट्राध्यक्षांना पुतिन भेटणार, इस्त्रायल विरोधात कारवाईची तयारी
10
Ankita Walawalkar अंकिता वालावलकर लवकरच बांधणार लग्नगाठ, तिचा होणारा नवरादेखील आहे सिनेइंडस्ट्रीतला
11
Navratri 2024: लक्ष्मी मातेने वाहन म्हणून घुबडाची निवड का केली असावी? घुबड दिसणे शुभ की अशुभ? वाचा!
12
"पंतप्रधान मोदींनाही जिलेबी पाठवणार"; विजयाआधीच काँग्रेस कार्यालयात मिठाईचे वाटप सुरु
13
"मला सलमानची बायको व्हायचंय", चाहतीच्या प्रश्नाला अरबाज खानचं हटके उत्तर, म्हणाला...
14
शेअर बाजारानंतर चीन नोकरदारांना शॉक देणार; काय आहे चीनचा 'शॉक २.०'? भारतासह जग दहशतीत
15
अजितदादांना धक्क्यामागून धक्के; शरद पवारांकडे झुकताहेत नेते, लोकसभेनंतर आता विधानसभेलाही शह!
16
वाह क्या बात है! पती-पत्नी एकत्र झाले IPS अधिकारी; जाणून घ्या, नेमकं काय घडलं?
17
Singham Again: मराठमोळ्या लेखकाने लिहिली आहे रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन'ची स्टोरी, म्हणाला, "मुंबईत आल्यावर पहिल्यांदा..."
18
"कुणाला प्रयोग करायचा असेल तर..."; झिरवाळांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर; म्हणाले, "जे बोलतात त्यांना..."
19
आजचे राशीभविष्य ८ ऑक्टोबर २०२४; प्रत्येक कार्यात यश मिळण्याची शक्यता
20
कंगना रणौत वादग्रस्त वक्तव्यावरून पुन्हा अडचणीत; कोर्टाने बजावली नोटीस, द्यावं लागणार उत्तर

'हम तुम्हे खून देंगे, तुम हमे पानी दो!' अंबरनाथमध्ये काँग्रेसने पाण्यासाठी रक्तदान करीत काढला मोर्चा

By पंकज पाटील | Published: April 28, 2023 6:07 PM

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांची भेट घेत काँग्रेस शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांनी त्यांना चांगलंच धारेवर धरले. तसेच जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना रक्तदान केलेले प्रमाणपत्र भेट देऊन त्यांचा निषेध व्यक्त केला.

अंबरनाथ : अंबरनाथमधील पाणी समस्येविरोधात काँग्रेसने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर मोर्चा काढला आहे. सोबतच 'हम तुम्हे खून देंगे, तुम हमे पानी दो!' असे म्हणत पाण्यासाठी काँग्रेसने रक्तदान सुद्धा केले. यानंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांची भेट घेत काँग्रेस शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांनी त्यांना चांगलंच धारेवर धरले. तसेच जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना रक्तदान केलेले प्रमाणपत्र भेट देऊन त्यांचा निषेध व्यक्त केला. 

        अंबरनाथ शहराच्या काही भागात गेल्या अनेक वर्षांपासून पाण्याची समस्या भेडसावत आहे. याबाबत अनेक वेळा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे तक्रारी करूनही समस्या सुटलेली नाही. त्यामुळे अखेर 'हम तुम्हे खून देंगे, तुम हमे पानी दो!' अशी घोषणा देत काँग्रेसने थेट रक्तदान करण्यास सुरुवात केली. उपस्थित नागरिकांनीही यावेळी रक्तदान करत पाण्याची मागणी केली. रक्तदान केल्यानंतर नागरिकांनी जीवन प्राधिकरणावर पाहण्यासाठी मोर्चा काढला. अंबरनाथ पश्चिमेच्या इंदिरा भवन ते पूर्वेतील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चात शेकडो महिला आणि काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. यानंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी मिलिंद बसनगार यांची भेट घेत काँग्रेसच्या शिष्टमंडळाने त्यांना पाण्यासाठी चांगलंच धारेवर धरले. मोर्चा निघणार असल्यामुळे आज वेळेवर पाणी सोडले, मग इतके दिवस पाणी का येत नाही? असा जाब काँग्रेस शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांनी विचारला. त्यावर यापुढे दर एक दिवसाआड दोन तास पाणी देण्याची भूमिका अधिकाऱ्यांनी घेतली. मात्र एक दिवसाआड नको, तर दररोज किमान १ तास पाणी देण्याची मागणी काँग्रेस शिष्टमंडळाने केली. ही मागणी मान्य करत पाणीपुरवठा करण्याचर आश्वासन यावेळी देण्यात आल्याची माहिती काँग्रेस शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांनी दिली. 

एसी बंद आहे, गर्दी कमी करा : काँग्रेसचा मोर्चा जीवन प्राधिकरणावर आल्यानंतर शिष्टमंडळाने अधिकाऱ्यांच्या दालनात त्यांच्यासोबत चर्चेसाठी कार्यालयात प्रवेश करताच संबंधित विभागाचे अधिकारी यांनी ' एसी बंद आहे, गर्दी कमी करा' असा सल्ला काँग्रेस कार्यकर्त्यांना देताच काँग्रेसचे नगरसेवक संबंधित अधिकाऱ्यावर चांगलेच भडकले. मोर्चातील नागरिक उन्हात असताना तुम्हाला एसीची हवा हवी आहे का असे म्हणत अधिकाऱ्याला चांगलेच धारेवर धरले.  

टॅग्स :ambernathअंबरनाथcongressकाँग्रेस