शहरं
Join us  
Trending Stories
1
बच्चू कडूंना CM शिंदेंनी दिला जबर झटका! प्रहारचा 'हा' आमदार शिवसेनेत करणार प्रवेश?
2
चेंबुरमध्ये पहाटे अग्नितांडव; चाळीत लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू
3
"त्यांना लाज वाटली पाहिजे", पंतप्रधान नेतन्याहू फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांवर भडकले
4
Women's T20 World Cup Points Table- भारताच्या गटात न्यूझीलंड ऑस्ट्रेलियाचा दबदबा
5
पाकिस्तानमध्ये मोठं काय घडणार? अमेरिकेने नागरिकांसाठी ॲडव्हायजरी जारी केली
6
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
7
अल्लू अर्जुन नाही बॉलिवूडचा हा सुपरस्टार बनला असता 'पुष्पा', जाणून घ्या का नाकारला सिनेमा
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे
9
लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढता येईना; किरीट सोमय्या महिलांसह पोहोचले पोलीस ठाण्यात
10
जुन्नर विधानसभेतही शरद पवार धक्का देणार! नवं कार्ड बाहेर काढणार?; बेनकेंविरोधात 'हा' उमेदवार मैदानात उतरवणार
11
नवरात्रात विनायकी चतुर्थी: ६ राशींना लाभ, सुख-समृद्धी-सौभाग्य; पाहा, साप्ताहिक राशीभविष्य
12
हरयाणात भाजपाला पराभूत करत काँग्रेसची सत्ता, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅकॉ युतीला कौल
13
मविआकडून केवळ दिशाभूल, विकासकामे रोखणाऱ्या शत्रूला निवडणुकीत रोखा: PM नरेंद्र मोदी
14
मराठी भाषेने स्वराज्यासह संस्कृतीची चेतना जागविली; पंतप्रधान मोदी यांचे कौतुकोद्गार
15
PM मोदी यांच्या हस्ते मेट्रो ३ मार्गिकेचे उद्घाटन; प्रवासात शाळकरी मुले, महिलांशी संवाद
16
दुर्गादेवी विरोधकांचा राजकीय संहार करेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मविआवर टीका
17
पंतप्रधानांचा ठाणे दौरा: तीन हजार अवजड वाहने रोखल्याने नाशिक-मुंबई प्रवास झाला सुसाट!
18
हरयाणामध्ये मतदारांनी कोणाला दिला सत्तेचा कौल? ६१ टक्क्यांपेक्षा जास्त मतदानाची नोंद
19
‘वैद्यकीय शिक्षण’मध्ये कंत्राटी भरती करणार; आपलाच निर्णय सरकारकडून धाब्यावर
20
सरळसेवेची ‘ती’ पदे ‘मानधना’वर भरणार; सुट्टीच्या दिवशी राज्य सरकारचा जीआर

पुस्तकांमधून मिळणारे वैचारिक साहित्य दीर्घकाळ टिकणारे असते – डॉ. नितीन करीर

By प्रज्ञा म्हात्रे | Published: February 15, 2024 7:33 PM

'विचारमंथन' व्याख्यानमाला वर्षपूर्तीच्या निमित्ताने आयोजित 'वाचन आणि मी' या विषयावरील १३ वे पुष्प संपन्न झाले.

ठाणे : इंटरनेट हे जरी सर्वांसाठी खुले असले तरी त्याचा वापर हा क्षणिक असतो, मात्र वाचन हे क्षणिक नसते, पुस्तकांच्या माध्यमातून मिळणारे वैचारिक साहित्य हे दीर्घकाळ टिकणारे असते. सामाजिक जीवनात वावरत असताना पुस्तके आणि वाचन हे खूप महत्वाचे आहे. पुस्तकांमधून आपण केवळ शिकतो किंवा आपले मनोरंजन होतेच असे नाही तर आपला जगाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो आणि तो महत्वाचा असल्याचे मत राज्याचे मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांनी व्यक्त केले. 

ठाणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित 'विचारमंथन' व्याख्यानमाला वर्षपूर्तीच्या निमित्ताने आयोजित 'वाचन आणि मी' या विषयावरील १३ वे पुष्प संपन्न झाले. यावेळी अध्यक्ष म्हणून डॉ. करीर म्हणाले की, पुस्तकाचे वाचन सैरभैर असायला हवे, ते एकांगी असू शकत नाही. अवांतर वाचनाचे महत्व हे सर्वांनी जाणून घ्यायला हवे. कुठल्याही कलेचा आनंद मग संगीत असो की वाचन ते अवांतर असायला हवे. पुस्तकांचे वेगवेगळे जॉनर आहेत, यापैकी कुठलेतरी एक जॉनर आपल्याशी बोलत असते. कुठल्या प्रकारची पुस्तके आपल्याशी बोलतात आणि हा पुस्तकांचा प्रवासच इतका छान असतो आणि त्याचा आनंद काही वेगळाच असतो. पुस्तके सतत आपल्याशी बोलण्याचा प्रयत्न करीत असतात फक्त आपली ऐकण्याची तयारी असली पाहिजे. वाचन आणि मी यावर बोलताना ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर म्हणाले की, माझे वाचन हे एका दिशेने कधीच नव्हते.. जशी दिशा मिळेल तसं वाचत आलो असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. शैलजा राजे, कुसुम अभ्यंकर, ज्योत्सना देवधर या लेखिकांची पुस्तके वाचण्यास सुरूवात केली. त्यानंतर सांगलीला महाविद्यालयात आल्यानंतर जी.ए ची पुस्तके वाचली. प्रत्येक टप्प्यावर जेव्हा मी जात होतो तेव्हा वाचनांचा परिणाम थेट जाणवत होता. शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी तसेच त्यांना मुक्तपणे पुस्तके हाताळण्यास संधी मिळावी यासाठी महापालिकेच्या शाळेत सुरू केलेला 'वाचन कोपरा' हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. शाळेच्या मुलांसाठी हा उपक्रम सुरू केल्याबद्दल राज्याचे मुख्य सचिव डॉ. करीर व ज्येष्ठ संपादक राजीव खांडेकर यांनी आयुक्त अभिजीत बांगर यांचे कौतुक केले. आयुक्त बांगर यांनी मान्यवरांचे ग्रंथबुके व चित्रप्रतिमा देवून त्यांचे स्वागत केले.

टॅग्स :thaneठाणे