शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

क्लस्टर योजना यशस्वी करायची असेल तर एक खिडकी योजना सुरू करा: आमदार गीता जैन यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

By धीरज परब | Published: May 28, 2023 6:07 PM

झोपडपट्टी , चाळी , जुन्या अनधिकृत व धोकादायक इमारतीं मधील लाखो रहिवाश्याना क्लस्टर योजना हे अधिकृत आणि चांगल्या सदनिकेत राहण्याचे मोठे माध्यम ठरणार आहे .

लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड - राज्यभर शासनामार्फत राबवण्यात येत असलेल्या क्लस्टर योजनेची प्रभावी अमलबजावणी होण्यासाठी एक खिडकी योजना महापालिका व शहर निहाय सुरु करण्याची मागणी आमदार गीता जैन यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे . विविध कामांसाठी वेगवेगळे विभाग असून त्यामुळे कमालीची दिरंगाई होत असून सामान्य नागरिक त्रस्त झाले असल्याचे आ . जैन यांनी नमूद केले आहे . 

झोपडपट्टी , चाळी , जुन्या अनधिकृत व धोकादायक इमारतीं मधील लाखो रहिवाश्याना क्लस्टर योजना हे अधिकृत आणि चांगल्या सदनिकेत राहण्याचे मोठे माध्यम ठरणार आहे . विविध शहरांमध्ये क्लस्टर पुनर्विकास प्रक्रिया सुरु झाली आहे. हि योजना राज्य सरकारची एक दूरगामी आणि बहुउद्देशीय योजना असल्याने राज्यभर या योजेनचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. 

नुकतीच मीरा भाईंदर शहरासाठी देखील क्लस्टर योजना जाहीर झाली असून त्याअंतर्गत मोजणी आणि छाननी करून शहरातील २४ भाग निश्चित करण्यात आले आहेत. या पुयोजनेमुळे जुन्या इमारतींचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. परंतु हि प्रक्रिया अजूनही म्हणावी तितकी वेगवान पद्धतीने कार्यरत असल्याचे चित्र दिसत नाही. याचे सर्वात मुख्य कारण म्हणजे पुनर्विकास किंवा गृहनिर्माण संबंधित प्रक्रियांसाठी शासनाच्या विविध विभागात करावा लागणार पत्रव्यवहार आणि त्यामुळे होणारी दिरंगाई असल्याचे आ. जैन यांनी स्पष्ट केले आहे . 

शासनाने क्लस्टर योजनेसाठी देखील लवकरात लवकर राज्यात "एक खिडकी योजना" राबवावी. महाराष्ट्राच्या आद्योगिक धोरणात एक खिडकी योजना याआधीच कार्यान्वित करण्यात आली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "नॅशनल सिंगल विंडो सिस्टम" सुरु करुन त्याअंतर्गत अनेक कामाच्या मंजुऱ्या दिल्या जात आहेत. देशभर विविध राज्यांमध्ये ती मोठ्या प्रमाणात यशस्वी होत आहे. 

त्यामुळे महाराष्ट्राच्या क्लस्टर योजनेसाठी देखील "एक खिडकी योजना" सुरु करून त्या अंतर्गत कन्व्हेन्स तथा डिम कन्व्हेन्स, सातबारा वर गृहनिर्माण संस्था वा चाळ कमिटीचे नाव चढवणे, अकृषिक प्रक्रिया, युएलसी संबंधित प्रकरणे , इस्टेट इन्व्हेस्टमेन्टची नाहरकत , नवीन विकास नियंत्रण नियमावली नुसार बांधकाम मंजुरी , सोसायटी नोंदणीची कामे, पुनर्विकास आणि इतर गृहनिर्माण संबंधित कामे हि  एक खिडकी योजने अंतर्गत आणावी . त्यामुळे सामान्य नागरिकांना वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळ्या विभागात हेलपाटे मारावे लागणार नाही . तसेच प्रशासकीय कार्यालयातून होणारी दिरंगाई बंद होईल व लोकांना योजनेचा लाभ लवकर मिळेल अशी मागणी आ . जैन यांनी पत्रा द्वारे मुख्यमंत्री यांना केली आहे . 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर