शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata Successor : टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी नोएल टाटा यांची नियुक्ती, संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय
2
Noel Tata : रतन टाटांचा उत्तराधिकारी ठरला; कोण आहेत टाटा ट्रस्टचे नवे अध्यक्ष नोएल टाटा?
3
पाकिस्तानच्या हाती घबाड लागले; सौदीने या गोष्टीसाठी दोन अब्ज डॉलर मोजले...
4
मुलाकडून विरोध तर वडिलांकडून मदतीचं आवाहन, कागलच्या राजकारणात पुन्हा नवा 'ट्विस्ट'!
5
"अजितदादा आणि प्रकाश आंबेडकरांनी एकत्र यावं", राष्ट्रवादीच्या नेत्याचं मोठं विधान
6
शरद पवारांची खेळी उलटणार?; इंदापूरात हर्षवर्धन पाटलांविरोधात स्थानिक नेते एकटवले
7
Maharashtra Politics : अभिजीत पाटलांनी पुन्हा शरद पवारांची भेट घेतली; माढ्यात उमेदवारी मिळणार?
8
"आम्हाला शक्य तितक्या लवकर..."; घरच्या मैदानात लाज गेल्यानंतर पाकिस्तानी कर्णधाराचे विधान
9
अजित पवार मोठी घोषणा करणार?;  पटेल, तटकरे, छगन भुजबळांसह घेणार पत्रकार परिषद
10
PAK vs ENG : हे फक्त पाकिस्तानात होऊ शकतं! दारुण पराभवानंतर PCB मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
11
Who is Shantanu Naidu: "गुडबाय माय डियर लाईट हाऊस"; टाटांसह सावली सारखा असणारा शंतनू नायडू कोण?
12
पाकिस्तान क्रिकेट संघावर एवढी वाईट वेळ का आली? जाणून घ्या त्यामागची ५ प्रमुख कारणं
13
PAK vs ENG : पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव; इंग्लंडने घरात घुसून कार्यक्रम केला, शेजाऱ्यांची पुन्हा फजिती
14
अखेर नवी मुंबई विमातनळावर उतरलं पहिलं विमान; धावपट्टीची चाचणी यशस्वी
15
१४७ वर्षांनंतर पहिल्यांदाच झालं असं! पाकिस्तानचे लाजिरवाणे विक्रम; ३ वर्षांपासून विजयाचा दुष्काळ
16
इस्रायलचा लेबनानमध्ये भारतीय सैन्य असलेल्या ठिकाणी हल्ला; इंडोनेशियाचे तीन जवान जखमी, संयुक्त राष्ट्रे संतापली
17
AUS vs IND : पुणेकर पडलाय मागे; त्या शर्यतीत माजी निवडकर्त्यानं दिली मुंबईकराला पसंती
18
Jio Financial Services नं लाँच केलं जिओ फायनान्स अ‍ॅप; युझर्सना मिळणार अनेक ऑफर्स, जाणून घ्या
19
करिअर की लग्न यात गोंधळलात? ऐश्वर्या नारकर यांनी तरुणाईला दिला मोलाचा सल्ला, उलगडला त्यांचा प्रवास
20
Airtel, Jio की Vi, कोणत्या कंपनीकडे आहे सर्वात स्वस्त Netflix प्लॅन?

तौक्ते चक्रीवादळातील क्षतीग्रस्त १०८ सार्वजनिक मालमत्तांची उपेक्षाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 4:44 AM

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : तौक्ते चक्रीवादळामुळे जिल्ह्यात तब्बल चार हजार २५२ दुर्दैवी घटना घडल्या. यात तिघांच्या मृत्यूसह १६७ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : तौक्ते चक्रीवादळामुळे जिल्ह्यात तब्बल चार हजार २५२ दुर्दैवी घटना घडल्या. यात तिघांच्या मृत्यूसह १६७ जनावरेही दगावली. यासाठी तब्बल सात कोटी ५४ लाख इतकी नुकसानभरपाई अपेक्षित आहे. मात्र, यातून आतापर्यंत सहा कोटी ८० लाखांच्या नुकसानभरपाईचे वाटप झाले. परंतु, १०८ सार्वजनिक वास्तूंची ७४ लाखांची भरपाई शासनाने अद्याप गांभीर्याने घेतली नाही. त्यामुळे त्या दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत.

जिल्ह्यात मे महिन्यात आलेल्या तौक्ते चक्रीवादळात एक हजार ३०२ शेतकऱ्यांच्या ४८१ हेक्टर शेतीच्या नुकसानीसह दोन हजार १८१ कच्च्या घरांचे, २४५ पक्क्या घरांचे अंशत: नुकसान, तर २१ पक्की घरे पूर्णपणे बरबाद झाली. याशिवाय समुद्रातील दोन बोटी, १४६ मच्छीमार जाळी अशा तब्बल चार हजार २५३ दुर्दैवी घटना घडल्या. याशिवाय तीन जणांचा मृत्यू आणि दोन गंभीर जखमी आहेत. या नैसर्गिक आपत्तीत जवळजवळ सात कोटी ५४ लाख ३२ हजार रुपयांचे नुकसान झाले. यास अनुसरून सहा कोटी ८० लाखांची नुकसानभरपाई शासनाने आतापर्यंत वाटप केली आहे. मात्र, सार्वजनिक हिताच्या दृष्टीने उपयुक्त १०८ मालमत्तांचे, वास्तूंचे, शाळा, महाविद्यालये, वसतिगृहांचे नुकसान वादळामुळे झाले आहे. त्यासाठीच्या भरपाईसाठी जिल्हा प्रशासनाने विभागीय आयुक्तांकडे पाठपुरावा सुरू केला आहे. मात्र, शासनाने तब्बल ७३ लाख ९० हजारांची भरपाई गांभीर्याने घेतली नाही.

जिल्ह्यातील या वास्तू, शाळा, वसतिगृहे भरपाईच्या रकमेअभावी नादुरुस्त अवस्थेत उभ्या आहेत. काही शाळांवरील पत्रे, कौले उडाली आहेत. काहींची पूर्णपणे पडझड झाली असून, काहींचे अंशत: नुकसान झाले आहे. त्यांच्या या नुकसान भरपाईकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.