शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer: हरयाणाच्या निकालाने वाढवलं महाविकास आघाडीचं 'टेन्शन'; चार मुद्दे इथेही पडू शकतात भारी!
2
हरियाणा निकालाचे पडसाद महाराष्ट्रात; उद्धव ठाकरे आक्रमक, "CM पदाचा चेहरा.."
3
काँग्रेसचा हरयाणात पराभव; कुमारी शैलजा म्हणाल्या,'वेळेवर मौन बाळगणे..."
4
Haryana Assembly Election Results 2024 हरियाणात भाजपचा विजयी रथ का रोखू शकली नाही काँग्रेस? ही आहेत 5 महत्वाची कारणं
5
Haryana Jammu & Kashmir Assembly Election Results 2024 : हरियाणा-जम्मू काश्मीरमध्ये भाजपनं किती मुस्लिमांना दिलं होतं तिकीट? किती जिंकले?
6
अयोध्या आणि बद्रीनाथमध्ये BJP चा पराभव; जम्मू-काश्मीरमध्ये माता वैष्णोदेवीने दिला आशीर्वाद
7
अवघ्या २०० दिवसांत 'त्यांनी' सूत्रं हलवली, पुन्हा भाजपाची सत्ता आणून दाखवली! हरयाणातील 'मॅन ऑफ द मॅच' 
8
Haryana, Jammu & Kashmir Assembly Election Results 2024 Live: जम्मू काश्मीरचा अंतिम निकाल हाती, पाहा कुठल्या पक्षाला किती जागा...
9
निवडणुकीपूर्वीची भाजपाची 'अशी' रणनीती; ज्यानं हरियाणात बिघडला काँग्रेसचा खेळ
10
जुलाना दंगल! Vinesh Phogat नं मारलं मैदान; WWE रेसलिंगमधील 'राणी'चं डिपॉझिट जप्त
11
"भाजपाशी थेट लढाई असते तिथे काँग्रेस कमीच पडते"; ठाकरे गटाच्या प्रियंका चतुर्वेदी यांचा खोचक टोला
12
Haryana Results 2024: भाजपाने हरयाणा जिंकले, पण पाच मंत्री हरले; कोणी केला पराभव?
13
देशातील सर्वात श्रीमंत महिलेला भाजपनं तिकीट नाकारलं, पण अपक्ष म्हणून निवडणूक लढविली अन् जिंकलीही...
14
जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सची 'बाजी', पण भाजपा 'बाजीगर'; जागा वाढल्या अन्...
15
सूरज चव्हाण बिग बॉस जिंकल्यावर मराठी अभिनेत्री म्हणते, 'छपरीपणा सुरु करायला हवा...'
16
हरियाणातील निकालामुळे राज्यात काँग्रेसवर दबाव?; पृथ्वीराज चव्हाणांनी मांडली भूमिका
17
भाजपची रणनीती कामी आली; हरयाणात 'ऑल इज वेल', शेतकरी-जवान नाराज नाहीत..!
18
"तुम्ही मला मत दिलं, तर मी तुम्हाला चंद्रावर घर देईन", उद्धव ठाकरे असं का म्हणाले?
19
SEBI नं १०० पेक्षा अधिक स्टॉक ब्रोकर्सना पाठवली नोटीस, काय आहे कारण; जाणून घ्या
20
कोण आहेत मेहराज मलिक? ज्यांच्यासाठी अरविंद केजरीवालांचा 'झाडू' चालला; भाजपचा किती मतांनी केला पराभव?

भिवंडीत पुन्हा कचराकोंडी; स्वच्छ भारत अभियानाचा बोजवारा 

By नितीन पंडित | Published: November 25, 2022 4:42 PM

भिवंडीत पुन्हा कचराकोंडी झाली असून ठिकठिकाणी कचऱ्याचे स्राम्राज्य पाहायला मिळत आहे. 

भिवंडी : शहरात सध्या मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांवर ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले असून मनपा प्रशासनाच्या दुर्लक्षित कारभारामुळे या कचऱ्याच्या ढिगार्‍यांमुळे नागरिक हैराण झाले असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. ठिकठिकाणी साचलेल्या या कचऱ्याच्या ढिगार्‍यांमुळे महापालिकेच्या स्वच्छ भारत अभियानाचा देखील पुरता बोजवारा उडाला असल्याचे चित्र सध्या शहरात पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे शहरात साचलेल्या कचऱ्याच्या ढिगार्‍यांकडे मनपा प्रशासनाच्या स्वच्छता व आरोग्य विभागाचे पुरता दुर्लक्ष झाल्याने नागरिकांकडून मनपा प्रशासना विरोधात तीव्र नाराजी पसरली आहे.

भिवंडी शहरातील कल्याण रोड वरील नवी वस्ती परिसरात असलेल्या उड्डाणपुलाच्या खाली कचऱ्याचे मोठे ढीग साचले असून शहरातील इतर अनेक ठिकाणी देखील अशाच प्रकारे कचऱ्याचे ढिग साचले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. भिवंडी महापालिकेच्या लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ सध्या संपुष्टात आल्याने मनपा प्रशासनावर अधिकाऱ्यांचाच वरचष्मा आहे. लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ संपल्याने स्थानिक नगरसेवक देखील शहरातील कचऱ्याच्या समस्यांकडे फारसे डोळसपणे पाहत नसून नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्याने नागरिक ही कचऱ्याच्या तक्रारी घेऊन स्थानिक नगरसेवकांकडे फारसे जात नाहीत. लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ संपल्याने मनपाचे अधिकारी देखील कचऱ्याच्या समस्येकडे फारसे गांभीर्याने पहात नसल्याने शहरात कचऱ्याचे ढीग साचले असून मनपा प्रशासनाच्या स्वच्छता व आरोग्य विभागाकडून स्वच्छतेविषयी फारसे गांभीर्याने घेतले जात नसल्याचा आरोप सुज्ञ नागरिक करीत आहे. 

  

टॅग्स :thaneठाणेbhiwandiभिवंडी