शहरं
Join us  
Trending Stories
1
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड
2
Maharashtra Vidhan Sabha: किरीट सोमय्यांवर आता भाजपाने सोपवली नवी जबाबदारी!
3
हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश होताच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, "इंदापूरचे हे महाधनुष्य..."
4
'सुट्टी'वरून राडा! शिक्षिकेची सहकारी शिक्षकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
5
रामराजे निंबाळकरांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली? शरद पवारांचं इंदापुरात मोठं विधान
6
रिल बनवत होता ड्रायव्हर, तेवढ्यात विजेच्या खांबावर आदळली बस, ३ प्रवाशांचा मृत्यू 
7
कोहली, धोनीपेक्षा भारी ठरला हार्दिक पांड्या; सेट केला सिक्सरसह मॅच फिनिश करण्याचा नवा रेकॉर्ड
8
6 दिवसात ₹20 लाख कोटी स्वाहा...! भारत सोडून कोण-कोण जातय चीनला?
9
SBI मध्ये होणार १० हजार पदांसाठी भरती; कधी जारी केली जाणार अधिसूचना?
10
पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार! Team India देखील जाणार? PCB ने सांगितलं कारण
11
कोलकाता प्रकरणी मोठा खुलासा! "महिला डॉक्टरवर सामुहिक बलात्कार..." CBI'ने चार्जशीट केले दाखल
12
Kapil Honrao : "मी १० वर्ष थिएटर, साडेतीन वर्ष सीरियल करून..."; सूरज जिंकताच अभिनेत्याच्या पोस्टने वेधलं लक्ष
13
"कुठे आहेत ते... त्यांना बोलवा", काँग्रेस आमदार मंचावरूनच सरकारी अधिकाऱ्यांवर संतापले
14
सांगलीत आजी-माजी खासदार समोरासमोर; भरसभेत जुंपली, तणाव वाढला, नेमकं काय घडलं?
15
ही भविष्यवाणी खरी झाल्यास २०२५ पासून होणार मानवाच्या अंताची सुरुवात, नेमकं काय घडणार
16
संजय शिरसाटांचा गौप्यस्फोट; उद्धव ठाकरेंचं सर्व आधीच ठरलं होतं, मग आटापिटा कशाला?
17
Gold Price: सोनं खरेदीच्या विचारात आहात? मग थोडं थांबा, ₹५००० पर्यंत घरण्याची शक्यता, 'या'वेळी येणार करेक्शन
18
पाकिस्तानातील हरवलेले मुख्यमंत्री सापडले! थेट विधासभेत लावली हजेरी, घटनाक्रमही सांगितला
19
अखेर भारत-मालदीवचा वाद मिटला; मुइज्जू यांच्या भेटीनंतर पीएम मोदींचे मोठे वक्तव्य, म्हणाले...
20
बोईंग 737 च्या रडर जॅममुळे DGCA चा ताण वाढला, सर्व विमान कंपन्यांना दिला इशारा

मीरा भाईंदरमध्ये फटाक्याच्या आगीत घरासह नोटांचे बंडल जळाले; २५ पेक्षा जास्त ठिकाणी आगीच्या घटना 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2022 8:05 PM

मीरा भाईंदरमध्ये मंगळवारच्या रात्री फटाक्यांमुळे आगी लागण्याच्या मोठ्या घटना घडल्या आहेत.

मीरारोड - फटाक्यांमुळे मीरा भाईंदरमध्ये आग लागण्याच्या सुमारे २५ पेक्षा जास्त घटना घडल्या असून एका घटनेत तर घरातील सामानासह दोन लाखांचे नोटांचे बंडल जाळून खाक झाले आहे. तर शहरात मध्यरात्री २ ते अडीज वाजेपर्यंत फटाके बेकायदा फोडले जात होते. सर्वत्र फटाक्यांचा घातक धूर पसरला होता तर आवाजाने लोकांच्या कानठळ्या बसल्या. 

मीरा भाईंदरमध्ये मंगळवारच्या रात्री फटाक्यांमुळे आगी लागण्याच्या मोठ्या घटना घडल्या आहेत. नया नगरमधील अस्मिता रिजन्सीमध्ये फिरोज शेख यांच्या घरात पेटते रॉकेट रात्री १०.२० च्या सुमारास शिरून घराला आग लागली. त्यावेळी घरात कोणी नव्हते. आगीत घरातील सामान जाळून खाक झाले. कपाटातील रोख ठेवलेले २ लाखांचे बंडल सुद्धा जळाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग लागल्याचे कळताच घटना स्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. त्यामुळे त्यामुळे मोठा अनर्थ टळला असला तरी शेख कुटुंबियांचे सुमारे १० लाखांचे नुकसान झाले. आगीमुळे इमारतीचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता.  

शहरातील विविध २३ ठिकाणी फटाक्यांमुळे आगी लागण्याच्या घटना घडल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले. फटाक्यांमुळे आगी लागत असल्याने ६ अग्निशमन केंद्रांसह आणखी ६ ठिकाणी अग्निशमन दलाची वाहने व जवान तैनात केले आहेत असे अग्निशमन दल प्रमुख प्रकाश बोराडे यांनी सांगितले. या शिवाय शहरातील गोडदेव नाका येथे एका गळ्यात मोठी आग लागली. गीता नगरच्या गीता पुष्प इमारतीत राहणारे आशिष शेट्टी यांच्या घरात सुद्धा भीषण आग लागली. आगीत सुमारे साडे तीन लाखांचे नुकसान झाले असून घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू, कपाट, पलंग, कपडे, वायरिंग आदी जाळून गेली. फटाक्यांमुळे आगी लागून होणारे नुकसान आणि जीवाला धोका पाहता लोकांमध्ये चिंता आणि भीतीचे वातावरण आहे. 

शहरात फटाक्यांमुळे प्रचंड घातक असे वायू प्रदूषण व ध्वनी प्रदूषण झाले आहे. फटाक्यांच्या घातक धुराचे आवरण सर्वत्र पसरल्याने अनेकांना श्वास घेण्यास त्रास झाल्याचे सांगण्यात आले. रुग्णालय, शांतता झो परिसरात सुद्धा सर्वत्र फटाके फोडले गेले. पहाटे २ ते अडीच वाजेपर्यंत शहरात फटाके फुटत होते. फटाक्यांच्या आवाजाने कानठळ्या बसल्याचा संताप लोकांनी व्यक्त केला. ध्वनी प्रदूषण व वायू प्रदूषणाच्या वाढत्या घटनांनी पोलीस आणि पालिकेने कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे. 

टॅग्स :mira roadमीरा रोडfireआग