शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणं युद्धासारखंच!
2
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
3
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
4
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
5
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
6
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
7
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
8
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
9
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
10
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
11
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
12
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
13
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
14
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
15
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
16
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
17
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
19
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
20
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान

दोघांच्या भेटीतून राज्याच्या परिपक्व संस्कृतीचे दर्शन : जितेंद्र आव्हाडांचे विधान 

By अजित मांडके | Updated: July 15, 2024 16:58 IST

दोघांच्या भेटीतून महाराष्ट्राच्या परिपक्व राजकीय संस्कृतीचे दर्शन घडले असल्याची प्रतिक्रिया शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली.

अजित मांडके, ठाणे : "शरद पवार आणि छगन भुजबळ हे दोघे जाणकार नेते आहेत. त्या दोघांमध्ये काय चर्चा झाली हे कोणालाही सांगता येणार नाही किंवा ते देखील सांगणार नाहीत". परंतु त्यांच्या भेटीतून महाराष्ट्राच्या परिपक्व राजकीय संस्कृतीचे दर्शन घडले असल्याची प्रतिक्रिया शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली.

आज विरोधी पक्षाला विचारतच घेतले जात नाही. आरक्षणाच्या मुद्द्यावर सत्ताधारी श्रेय घेत आहेत. त्यात त्यांनी उगाच शरद पवार यांचे नाव घेतले. ते आम्हाला अडकवायला गेले होते. पण आता ते त्यात अडकले आहेत. भुजबळ यांनी त्यांच्या पूर्वश्रमिच्या नेत्याबद्दल काळजी दाखवली. त्यात चुकीचे काय आहे? असा सवाल ही आव्हाड यांनी केला. मुळात त्यांना माहिती आहे की शरद पवार म्हणजे जादूची कांडी आहे. त्यामुळे त्यांच्याशी चर्चा केली जात आहे. बारामतीत रविवारी झालेल्या अजित पवार यांच्या सभेत ७० टक्के खुर्च्या रिकामी होत्या. जर बारामतीत ही परिस्थिती असेल तर इतरत्र काय असेल असे म्हणत आव्हाड यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. "सत्ताधाऱ्यांनी आधी धर्मात, जातीत भांडणे लावून पाहिली, पैसे वाटून पहिले, पण धर्म आणि पैसा चालत नाही हे त्यांना लोकसभा निवडणुकीतून समजले असेल" असे ही आव्हाड म्हणाले.

"जिथे राम चालत गेले त्या सर्व मतदारसंघात सत्ताधाऱ्यांचा लोकसभेत पराभव झाला आहे". जर सत्ताधाऱ्यांना आरक्षण द्यायला जमत नसेल त्यांनी राजीनामा द्यावा. आम्ही आता लवकरच सत्तेत येणार आहोत. त्यानंतर आम्ही  आरक्षण देऊ असा दावाही त्यांनी केला. आरक्षण हा केंद्र सरकारचा अख्त्यारीतील विषय आहे, त्यामुळे यावर निर्णय घेणे अपेक्षित आहे. या सरकारला कॅग अहवालातील ५४ हजार कोटी दिसत नसल्याचे सांगत राज्य सरकारच्या सर्व  योजना फक्त कागदावर असल्याचे कॅगचे म्हणणे आहे. मुळात अर्थसंकल्पात  सरकारने काय केले, हेच कॅगला समजत नाही. महाराष्ट्रला उत्तर हवे आहे की ५० हजार कोटी कुठे गेले. हा लाखो करोडोचा भ्रष्टाचार असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

टॅग्स :thaneठाणेJitendra Awhadजितेंद्र आव्हाडSharad Pawarशरद पवारChagan Bhujbalछगन भुजबळNCPराष्ट्रवादी काँग्रेस