शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपतींचे स्मारक कधी होणार? संभाजीराजेंचे टार्गेट भाजप; अरबी समुद्रात शिवस्मारक शोध आंदोलन
2
“स्मारकाविरोधात कोर्टात जाणारे कोण तेही बघा”; देवेंद्र फडणवीसांचा संभाजीराजेंवर पलटवार
3
हिंदू समाजाने स्व-सुरक्षेसाठी संघटित होण्याची गरज: सरसंघचालक मोहन भागवत
4
'त्या' सगळ्यांना पुन्हा पक्षात प्रवेश देणार: ठाकरे, शिंदेसेनेचे माजी नगरसेवक उद्धवसेनेत
5
“हिऱ्याच्या पोटी गारगोटी, मुलाशी का, बापाशी भिडा”; CM एकनाथ शिंदेंचे उद्धव ठाकरेंना आव्हान
6
“लोकसभेची गणिते वेगळी होती, मनसेबाबत महायुतीचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील”: श्रीकांत शिंदे
7
मराठी अभिजात भाषा झाली तरी जल्लोष का नाही?: राज ठाकरे, पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
8
चांगल्यांचा सन्मान अन् वाईटांना शिक्षा करीत नाही ते म्हणजे सरकार: नितीन गडकरी
9
चेंबूरमध्ये अग्नितांडव, दुकानातील रॉकेलच्या साठ्याचा भडका; एकाच कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू
10
डोळ्यादेखत अख्खं कुटुंब जळालं; किंकाळ्यांनी हादरला परिसर, रहिवाशांमध्ये माजला हलकल्लोळ
11
मुलीला कुशीत घेत सुटकेचा जीवघेणा थरार; रणदिवे कुटुंबाच्या समोर उभा होता मृत्यू
12
लोकसंस्कृतीवरील अडाणीपणाचा शिक्का पुसला; तारा भवाळकर यांनी व्यक्त केली भावना
13
निवडून आलेल्या सरपंच महिलेस पदावरून काढणे सहज घेऊ नका; सर्वोच्च न्यायालयाने सुनावले
14
इर्शाळवाडी पुनर्वसन; घरांसाठी दसऱ्याचा मुहूर्त साधणार? आचारसंहितेपूर्वी वाटप करणार!
15
१९५ एकर जमीन संस्था, आमदारांच्या घरांसाठी; मंत्रिमंडळ बैठकीत येणार मढबाबतचा प्रस्ताव
16
अजित पवार गट पदाधिकारी हत्या प्रकरणात तिघांना अटक; राजकीय वैमनस्यातून काढला काटा
17
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
18
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
19
वायुसेनेच्या एअर शोदरम्यान चेन्नईतील बीचवर चेंगराचेंगरी; ५ मृत्युमुखी, २५० जखमी
20
बारामतीच्या लेकाने बिग बॉस जिंकले! सूरज चव्हाणसाठी अजित पवारांच्या पत्नीची पोस्ट, म्हणाल्या- "पहिल्या दिवसापासून..."

भिवंडी मनपाच्या शाळांमध्ये मुलभूत सोयीसुविधांची वानवा; अधिवेशनात आमदारांनी वेधले सभागृहाचे लक्ष  

By नितीन पंडित | Published: December 28, 2022 6:13 PM

भिवंडी मनपाच्या शाळांमध्ये मुलभूत सोयीसुविधांसाठी अधिवेशनात आमदारांनी सर्वांचे लक्ष वेधले.  

भिवंडी : भिवंडी मनपाच्या शाळांची सध्या प्रचंड दुरावस्था झाली असून या शाळांच्या पुनर्वसनासाठी राज्य शासनासह महापालिकेने लक्ष द्यावे यासंदर्भात भिवंडी पूर्वचे सपा आमदार रईस शेख यांनी बुधवारी राज्याच्या हिवाळी अधिवेशनात सभागृहाचे लक्ष वेधले. शहरात मनपाच्या ४९ शाळा चालवल्या जात असून सदर शाळांमध्ये एकूण २८,००० विदयार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र या शाळांची स्थिती अत्यंत दयनीय व धोकादायक स्थितीत आहे. सन २०२१-२०२२ माध्यम निहाय संच मान्यतेनूसार ११२ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. तसेच शालेय विदयार्थ्यांना शालेय गणवेश, पुस्तके पुरविले जात नाहीत, शौचालय, पाणी, वीज यांसारख्या मुलभूत सुविधांची वानवा मोठ्या प्रमाणावर आहे.

या शाळांच्या डागडुजी व दुरूस्तीकरीता ३० कोटी रुपयांचा निधीचा प्रस्ताव मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे प्रलंबित आहे. तसेच संच मान्यतेनूसार शिक्षकांच्या जागा रिक्त असूनसुद्धा शासन परवानगीविना जिल्हा बदलीचे आदेश देण्यास मनाई असताना नियमबाहय पद्धतीने शिक्षकांची जिल्हा बदली करण्यात येते. त्यामुळे महागनरपालिकेच्या शाळांमध्ये रिक्त शिक्षकांची संख्या वाढल्याने शिक्षणाचा दर्जा खालावून गुणवत्तापूर्ण शिक्षणापासून विदयार्थी वंचित राहत आहेत. त्यामुळे विदयार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. तसेच मुंबई महानगरपालिका, ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षणाच्या अर्थसंकल्पानुसार भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेने शिक्षणासाठी अर्थसंकल्पाची तरतूद करण्यात यावी अशी मागणी आमदार रईस शेख यांनी सभागृहात केली.

आमदार शेख यांच्या लक्षवेधी सुचेनेला शालेय शिक्षण मंत्री यांनी उत्तर देत शेख यांच्या मागण्या मान्य केल्या असून शाळांच्या डागडुजी व दुरूस्तीकरीता ३० कोटी रुपयांचा निधीचा प्रस्ताव मुख्यमंत्री यांनी जिल्हा नियोजन समितीकडे पाठवायला सांगितले असून रिक्त शिक्षकांची भरती लवकरच सुरू करण्यात येणार असून मुंबईत अतिरिक्त शिक्षक असून त्यामधील उर्दू आणि मराठीचे शिक्षकांना भिवंडी मनपाच्या शाळांमध्ये रुजू होण्याकरिता शिक्षकांना सूचना दिल्या जातील व एक महिन्यात याबाबत कार्यवाही केली जाईल असे आश्वासन शालेय शिक्षण मंत्र्यांनी आपल्या प्रश्नांना उत्तर केतांना म्हटले असल्याची माहिती आमदार रईस शेख यांनी दिली आहे.

  

 

टॅग्स :thaneठाणेBhiwandiभिवंडी