शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

उल्हासनगरात सव्वा लाख मतदारांची संख्या घटली; अंतिम मतदार यादी जारी

By सदानंद नाईक | Published: July 20, 2022 6:34 PM

गेल्या निवडणुकीपेक्षा ३३ हजार मतदार कमी असल्याची माहिती महापालिका निवडणूक विभागाचे मनीष हिवरे यांनी दिली. 

- सदानंद नाईक 

उल्हासनगर : महापालिका निवडणूक विभागाने अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली असून सन २०११ च्या जनगणेनेच्या तुलनेत तब्बल सव्वा लाख मतदार संख्या कमी झाल्याचे उघड झाले. तर गेल्या निवडणुकीपेक्षा ३३ हजार मतदार कमी असल्याची माहिती महापालिका निवडणूक विभागाचे मनीष हिवरे यांनी दिली. 

शहरातील उद्योगधंदे बंद पडल्याने, मतदार स्थलांतरित झाल्याचे बोलले जाते. उल्हासनगर महापालिकेने सन २०११ च्या जनगणनानुसार उल्हासनगर, अंबरनाथ व कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघाच्या यादीनुसार शहरातील मतदारांची संख्या ५ लाख ६ हजार होती. मात्र, दरम्यान वालधुनी नदीच्या प्रदूषणाला जीन्स कारखान्याना जबाबदार धरून जीन्स उद्योगावर कारवाई केल्यावर, जीन्स उद्योगासह त्या संबंधीत कारखाने व त्यामध्ये कामगार तसेच सिंधी समाज मोठ्या प्रमाणात स्थलांतरित झाले. त्याचा परिणाम मतदार यादीवर झाला आहे. त्यामुळे पाच लाखांवरून मतदारांची संख्या तीन लाख ७३ हजार ७०२ वर आली आहे. त्यात दोन लाख दोन हजार ५४७ पुरुष, एक लाख ७१ हजार ८० महिला आणि ७५ तृतीयपंथी यांचा समावेश आहे.

गेल्यावेळी महापालिकेत एकून २० प्रभाग होते. त्या मधून ७८ नगरसेवक निवडून आले. यावेळी तीन सदस्यीय २९ तर दोन सदस्यीय १ असे एकून ३० प्रभागातून ८९ नगरसेवक निवडून येणार आहे. गेल्या वेळी पेक्षा ११ नगरसेवकाच्या संख्येत वाढ होणार आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, निवडणूक विभागप्रमुख मनिष हिवरे यांनी दिली आहे. 

शहर सिंधी समाज बहुल असल्याचे बोलले जाते. मात्र सिंधी समाजाची मतदार संख्या झपाट्याने कमी होत असल्याने, मराठी व उत्तर भारतीय नागरिकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. 

सिंधी समाजाने व्यक्त केली चिंताउल्हासनगर म्हणजे सिंधी समाज बहुल संख्या असलेले शहर अशी ओळख आहे. मात्र ही ओळख इतिहास जमा होण्याची शक्यता निर्माण झाली. सिंधी समाज कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर व ठाणे आदी ठिकाणी मोठया प्रमाणात स्थलांतरित होत आहे. त्यामुळे मतदार यादीवरून नजर फिरविल्यास सिंधी समाजाचे मतदार कमी झाल्याचे उघड झाले. 

टॅग्स :Votingमतदानulhasnagarउल्हासनगर