शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

उल्हासनगरात घर तेथे नळ, अवैध नळजोडणी होणार कारवाई

By सदानंद नाईक | Published: October 29, 2022 1:37 PM

शहरातील पाणी टंचाईवर तोडगा काढण्यासाठी महापालिका आयुक्त अजीज शेख घर तेथे नळ योजना राबविणार आहेत.

उल्हासनगर : शहरातील पाणी टंचाईवर तोडगा काढण्यासाठी महापालिका आयुक्त अजीज शेख घर तेथे नळ योजना राबविणार आहेत. तसेच एक पेक्षा जास्त नळ जोडण्या असणाऱ्यावर कारवाई केली जाण्याचे संकेत आयुक्तांनी दिले असून नळ जोडण्याचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. 

उल्हासनगर महापालिकेला एमआयडीसीकडून दररोज १४० एमएलडी पाणी पुरवठा होऊनही शहराच्या विविध भागात पाणी टंचाई निर्माण झाली. गेल्या महिन्यात शिवसेनेने महापालिकेवर मोर्चा काढून पाणी टंचाईची समस्या दूर करण्याची मागणी केली. सुभाष टेकडी भागातील ३० हजार पेक्षा जास्त लोकसंख्याला पाणी टंचाईचे चटके बसत आहेत. दररोज महापालिका पाणी पुरवठा विभागावर लहान-मोठे मोर्चे येत असल्याची माहिती विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश वानखडे यांनी दिली. सन २०११ च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या ५ लाख असून नियमानुसार प्रत्येकी १३५ लिटर पाणी लागते. लोकसंख्येनुसार ८० एमएलडी पाणी पुरवठा शहराला पुरेसा आहे. यामध्ये २० एमएलडी पाणी गळतीचा समावेश केल्यास एकूण १०० एमएलडी पाणी पुरवठा शहराला लागतो. मात्र शहराला दररोज १४० एमएलडी पाणी पुरवठा एमआयडीसीकडून होऊनही शहरात पाणी टंचाई कायम आहे. 

शहरातील पाणी टंचाईची समस्या निकाली काढण्यासाठी महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी घर तेथे नळ योजना राबविणार आहेत. मात्र एका पेक्षा जास्त नळजोडण्या असणाऱ्या इमारती व घरावर दंडात्मक कारवाई करण्याचे संकेत आयुक्तांनी दिले. आयुक्तांच्या या निर्णयाने खळबळ उडाली असून घर तेथे नळ योजना राबविण्यापूर्वी घरघर व इमारती मध्ये जाऊन महापालिका कर्मचारी नळजोडणीचे सर्वेक्षण करणार आहेत. नळ जोडणी सर्वेक्षणापूर्वी नागरिकांनी व इमारातधारकांनी नियमानुसार जास्त नळजोडण्या घेतल्या असल्यास खंडित करण्याचे आवाहन आयुक्त शेख यांनी केले. शहरात अवैध नळ जोडणीमुळेच शहरात पाणी टंचाई निर्माण झाल्याचे बोलले जाते. निळ्या व जुन्या जलवाहिणीतून बहुतेक नागरिकांनी एक पेक्षा जास्त नळजोडण्या घेतल्याचे पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी सांगत आहेत. त्यामुळेच पाणी टंचाई निर्माण झाली.

पाणी गळतीचे प्रमाण ३० टक्के शहरात ४०० कोटींची पाणी पुरवठा वितरण योजना राबवूनही पाणी गळतीचे प्रमाण ३० टक्के असल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी देत आहेत. ज्या भागात जुन्या जलवाहिन्या आहेत. त्या बदलणे आवश्यक असून त्याशिवाय पाणी टंचाई समस्या निकाली लागणार नसल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर