शहरं
Join us  
Trending Stories
1
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
2
दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
3
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
4
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
5
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
6
परदेशात जाऊन आपल्या देशाचा अपमान करणाऱ्यांना जनतेने धडा शिकवला- अमित शाह
7
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
8
'तेरे करके' पेक्षा No Look Shot ची चर्चा; नताशाच्या पोस्टवर 'हार्दिक' कमेंटचं ट्विस्ट
9
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
10
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
11
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
12
"हा विजय केवळ मोदीजींमुळेच शक्य झाला"; हरयाणाच्या निकालानंतर मुख्यमंत्री सैनी यांचे विधान
13
Haryana, Jammu & Kashmir Assembly Election Results 2024 Live: काँग्रेसचे 'खटाखट-खटाखट' मॉडेल फेल: अनुराग ठाकूर
14
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?
15
'आजच बारामतीचा उमेदवार जाहीर करा'; अजित पवार म्हणाले, "तुमच्या मनातील..."
16
"कुठे आम्ही ६० जागा जिंकण्याच्या बाता मारत होतो आणि…’’, निकालांबाबत कुमारी शैलजा म्हणाल्या
17
जम्मू-काश्मीरच्या 'या' सात जागांवर काँग्रेस आणि एनसीत मैत्रीपूर्ण लढत; जाणून घ्या निकाल...
18
"मल्लिकार्जुन खर्गेजी पत्ता सांगा, 'ती' जिलेबी...", भाजप खासदार तथा केंद्रीय मंत्र्याचा राहुल गांधींना बोचरा टोला
19
नवी मुंबईत महायुतीला झटका, शिंदेसेनेत बंडखोरी होणार, विजय नाहटा तुतारी हातात घेणार
20
काँग्रेसचा हरयाणात पराभव; कुमारी शैलजा म्हणाल्या,'वेळेवर मौन बाळगणे..."

उल्हासनगरमध्ये जीव धोक्यात घालून कामगार काढतात वालधुनी नदीतील कचरा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2022 7:11 PM

कामगार संघटनेकडून निषेध.  उल्हासनगर रेल्वे स्टेशन परिसरातून वालधुनी नदी वाहत असून नदीवरील जुना पूल पाडून, तेथे नवीन पूल बांधण्यात येणार आहे.

- सदानंद नाईक उल्हासनगर : स्टेशन परिसरातून वाहणाऱ्या वालधुनी नदी पात्रातील जलवहिनीला लटकलेला कचरा सफाई कामगार जीव धोक्यात घालून काढत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली. या प्रकारचा कामगार नेते राधाकृष्ण साठे यांनी निषेध करून संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी आयुक्ताकडे केली आहे.

 उल्हासनगर रेल्वे स्टेशन परिसरातून वालधुनी नदी वाहत असून नदीवरील जुना पूल पाडून, तेथे नवीन पूल बांधण्यात येणार आहे. त्याच ठिकाणी नदी पात्रातून जलवाहिनी गेली आहे. या जलवाहिणीला नदीतून वाहणारा कचरा लटकत असून लटकलेले कचरा सफाई कामगारांनी कोणतेही सुरक्षेविना काढत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने एकाच खळबळ उडाली. नदी दुथडी भरून वाहत असून अश्या वेळी नदीत एकदा कामगार पडून दुर्घटना घडली तर जबाबदार कोण? असा प्रश्न कामगार नेते राधाकृष्ण साठे यांनी केला. तर कचरा काढण्यासाठी सफाई कामगारांना कोणी पाठविले? असा प्रश्नही निर्माण झाला. याबाबत महापालिका आरोग्य विभाग प्रमुख यांना संपर्क केला असता, झाला नाही. 

शहरातील लहान-मोठे नालेसफाईचा ठेका महापालिकेने देऊन त्यावर कोट्यावधी रुपये खर्च केला. मात्र उशिराने नालेसफाई सुरू झाल्याने, १०० टक्के सफाई झाले नाही. असा आरोप सर्वपक्षीय नेते करीत आहेत. तर अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी गेल्या आठवड्यात ८० टक्के पेक्षा जास्त नालेसफाई झाल्याची प्रतिक्रिया देऊन नालेसफाई सुरू असल्याची माहिती दिली. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर सुरू झालेल्या नालेसफाईवर टीका झाली असून नदी व नाल्यातील कचरा पावसाच्या पाण्यासोबत वाहून गेल्याचे बोलले जात आहे. नालेसफाई मुळे महापालिका आयुक्त डॉ राजा दयानिधी व आरोग्य विभागावर टीका होत आहे.

टॅग्स :Rainपाऊस