शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
2
जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान
3
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
4
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
5
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा
6
हरयाणानंतर आता महाराष्ट्रातही भाजपला 'फ्रीबीज'चा फायदा होईल का?
7
मृत्यूनंतर चार वर्षांनी तो बनणार बाप, हायकोर्टानं दिला महत्त्वपूर्ण निर्णय 
8
पिंपरीतील लॉजमध्ये धक्कादायक घटना; प्रेयसीवर वार करून तरुणाने संपवलं जीवन!
9
गुरू ग्रहावर एलियनचे अस्तित्व? NASA ने लॉन्च केले मिशन, कोणती माहिती मिळणार? पाहा...
10
वृद्ध दाम्पत्यानं पाण्याच्या टाकीत उडी मारून संपवलं जीवन, समोर आलं धक्कादायक कारण
11
श्वास घेण्यास त्रास; प्रकृती खालावल्याने भाजप आमदाराला एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला हलवले!
12
Kalyan: कल्याणमध्ये नामांकित बिल्डरकडून मिस फायर? बिल्डरसह मुलगा जखमी, पोलिसांकडून तपास सुरू
13
Hardik Pandya सोबत दिसणारी ही सुंदर तरुणी कोण? व्हायरल झालेल्या फोटोंमुळे रंगली चर्चा
14
'ही' इलेक्ट्रिक स्कूटर १०,००० रुपयांनी स्वस्त, फुल चार्ज केल्यावर १७० किमी धावणार!
15
लोकसभेला ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणारे नेते शरद पवारांच्या भेटीला
16
रुटचे द्विशतक, ब्रूकचे त्रिशतक! ४०० पार भागीदारी; पहिल्या सामन्यात इंग्लंडची 'दिवाळी', ७ नवे विक्रम
17
सोने ८०० रुपयांनी स्वस्त, सणासुदीतही भाव कमीच राहणार, त्यानंतर अशी उसळी घेणार की...
18
Israel Iran War: इराणवर हल्ला कधी केला जाणार? इस्रायल बैठकीत घेणार अंतिम निर्णय
19
काश्मीरमध्ये समिकरण बदलले, नॅशनल कॉन्फ्रन्सने स्वबळावर गाठला बहुमताचा आकडा, काँग्रेसची साथ सोडणार?
20
ओबीसींमध्ये १५ नव्या जातींचा समावेश; मनोज जरांगेंनी सरकारला खिंडीत गाठलं, म्हणाले...

ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या ११३७ रुग्णांची वाढ; ५९ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 4:43 AM

ठाणे : जिल्ह्यात गुरुवारी कोरोनाच्या नव्या एक हजार १३७ रुग्णांची वाढ झाली असून, ५९ जण दगावले. आता जिल्ह्यातील एकूण ...

ठाणे : जिल्ह्यात गुरुवारी कोरोनाच्या नव्या एक हजार १३७ रुग्णांची वाढ झाली असून, ५९ जण दगावले. आता जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या पाच लाख पाच हजार ८३७ झाली असून, आतापर्यंत आठ हजार ७०७ मृतांची नोंद करण्यात आली.

ठाणे शहरात नवे २०४ रुग्ण आढळले असून, शहरात आतापर्यंत एक लाख २७ हजार २८६ रुग्ण नोंदले आहेत. आठ मृत्यू झाल्यामुळे मृतांची एकूण संख्या एक हजार ८३७ झाली. कल्याण- डोंबिवलीला नवे २७७ रुग्ण आढळून आले असून, २३ मृत्यू झाले. या शहरात आता एक लाख ३१ हजार ३१ बाधित असून, एक हजार ७६८ मृतांची नोंद झाली.

उल्हासनगरला १९ नवे रुग्ण आढळले असून, एकही मृत्यू नाही. या शहरात १९ हजार ८८१ बाधित असून, एकूण मृत्यूसंख्या ४७३ नोंदली आहे. भिवंडीला १५ रुग्ण सापडले असून, दोन मृत्यू झाले आहेत. येथे दहा हजार २७४ बाधितांची, तर ४२७ मृतांची नोंद झाली. मीरा भाईंदरला १५२ रुग्ण सापडले असून, आठ मृत्यू झाले. शहरात आतापर्यंत ४७ हजार ६९५ बाधितांसह एक हजार २२४ मृतांची नोंद आहे.

अंबरनाथ शहरात १६६ नवे रुग्ण सापडले आहेत. तर, दोन मृत्यू झाले. शहरात आता १९ हजार ४३ बाधितांसह मृतांची संख्या ३९८ झाली आहे. बदलापूरला नवे ४३ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे बाधित रुग्णसंख्या २० हजार २२८ असून, एकही मृत्यू नसल्याने एकूण मृत्यूची संख्या २३३ आहे. जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात १५१ रुग्ण सापडले असून, दहा मृत्यू झाले आहेत. या गावपाड्यांत ३३ हजार ५२१ बाधित झाले असून, एकूण मृत्यू ८२२ नोंदले आहेत.

...........

वाचली