शहरं
Join us  
Trending Stories
1
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
4
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
5
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
6
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
7
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
8
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
9
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
10
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
11
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
12
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
13
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
14
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
15
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
16
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
17
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
18
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
19
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
20
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल

विक्रमगडमध्ये सूर्यफुलाचे वाढते उत्पन्न

By admin | Published: March 12, 2016 1:52 AM

विक्रमगड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीची मदार प्रामुख्याने पावसाळी भातशेतीवरच. मात्र गेल्या काही वर्षापासुन दुबार पिक घेण्याचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र दिसत आहे़

तलवाडा: विक्रमगड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीची मदार प्रामुख्याने पावसाळी भातशेतीवरच. मात्र गेल्या काही वर्षापासुन दुबार पिक घेण्याचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र दिसत आहे़ त्यात प्रामुख्याने पावसाळयात भात तर उन्हाळयांत भाजीपाला लागवड होत आहे. परंतु ग्रामीण भागातील अल्पशती असणारे शेतकरी सुर्य फुल या खाद्यतेलाच्या पिकांची लागवड मोठया प्रमाणात करीत आहेत़ परंतु आता त्यामध्येही बदल होऊन एकमेकांनी केलेले शेतामधील प्रयोग व त्यापासुन मिळणारा नफा पाहाता आता सध्या येथील शेतकरी जागृत होऊ लागले आहे़येथील शेतकरी प्रामुख्याने पावसाळी भात लागवड तर उन्हाळी कलिंगड, काकडी, भेंडी, चवळी, मिरची, अशा प्रकारची पिके घेतली जातात़ मात्र, गेल्या काही वर्षापासुन तालुक्यात सुर्यफुल या खाद्यतेल देणाऱ्या पिकाची लागवड शेतकरी उन्हांळी हंगामात मोठया प्रमाणात घेऊ लागले आहेत. यावर्षी तालुक्यात उन्हाळी हंगामात ३६० हुन अधिक हेक्टरवर भाजीपाला लागवड करण्यांत आलेली आहे़. तर तालुक्यात यंदा अंदाजे आकडेवारीनुसार ४० ते ५० हेक्टरवर सुर्यफुलाची लागवड शेतकऱ्यांनी केली आहे़ तर गेल्या वर्षीही अंदाजीत ४० हेक्टरवर ही लागवड करण्यात आली होती.सुर्यफुल हे पिक अल्पशा खर्चात मोठे उत्पन्न देणारे पिक आहे़ या पिकाच्या लागवडीचा खर्च व मजुरांची गरज सुध्दा कमी प्रमाणात लागते़ त्यामुळे या पिकांपाासुन थोडी मेहनत घेतल्यास मोठे उत्पन्न मिळते़ या पाश्वभुमीवर विक्रमगड तालुक्यातील माण व ओंदे गावातील काही शेतकऱ्यांनी आपल्या शेती खाचरांवर आपल्या कुटुंबाच्या मदतीने सुर्यफुलाची लागवड केली आहे.या लागवडीकरीता बीयाणे, खत, मजुरी, ट्ॅक्टर असा मिळून अल्प खर्च येतो. लागवडीनंतर फक्त ८ दिवसांतुन ऐकदा पाण्याची पाळी दयावी लागते़ तर ऐकदा खत घालावे लागते़ या पिकावर कुठल्याही प्रकारचा रोग येत नसल्याचे शेतकऱ्यांकडुन सांगण्यात येते़ तसेच एक ते दोन मजुर सर्व पिकाची लागवड तसेच देखभाल करु शकतात,त्यामुळे या पिकाला मजुरांचा खर्च व इतर लागणारा खर्च मोठया प्रमाणात शेतकऱ्यांचा वाचतो़वर्ष २०१६: यंदाच्या वर्षी माण येथील कृषीमधून पदवीधर झालेले शेतकरी विलास लडकू पाडवी यांनी चार एकरमध्ये सुर्यफुलाची लागवड केली आहे़ तसेच त्याबरोबरच इतर पिके एक एकरमध्ये काकडी, एक एकरमध्ये मोगरा अर्धा एकरमध्ये कांदा अशी लागवड केली आहे़ ४बाजारात सुर्यफलाच्या १५ किलो डब्याचा दर १६०० रुपये तर काकाड १९ किलो, मोगरा १२० किलो याप्रमाणे उत्पादीत मालाला भाव भाग मिळत आहे़ ४गत वर्षी ओंदे येथील शेतकरी हेमंत ठाकरे यांनी एक एकरमध्ये सुर्यफुलाची लागवड करुन अल्पखर्चात नऊ डबे खाद्य तेल मिळाले.विक्रमगड तालुक्यातील हवामान हे उष्ण व दमट असुन, जमीन मध्यम ते खोल स्वरुपाची व योग्य पाण्याचा निचरा होणारी आहे़ सुर्यफुल पिकास हवामान व जमीन योग्य असल्याने शेतकऱ्यांना फायदा होवु शकतो़- विश्वनाथ पाटील, शेतकरी व कुणबीसेना प्रमुख, विक्रमगड