शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata Passed Away: भारताच्या उद्योगविश्वातील रत्न निखळलं! 'पद्मविभूषण' रतन टाटा कालवश, देशाची मोठी हानी
2
Ratan Tata Passed Away : “मोठं स्वप्न पाहणं अन् दुसऱ्यासाठी दायित्वाची भावना...” PM मोदींनी या शब्दांत वाहिली टाटांना श्रद्धांजली
3
Ratan Tata News Live: ज्ञानी-दानी अन् स्वाभिमानी 'भारत रतन'; देश गहिवरला, मान्यवरांची रतन टाटांना श्रद्धांजली
4
भारताच्या 'रत्ना'ची कहाणी, टाटामध्ये असिस्टंट म्हणून सुरू केलेला प्रवास; नंतर कंपनीला बनवला आंतरराष्ट्रीय ब्रँड
5
Ratan Tata Death: गडकरींची टाटांना आदरांजली: देशाने संवेदनशील उद्योजक-समाजसेवक गमावल्याची व्यक्त केली भावना
6
Ratan Tata News : रतन टाटांना मिळालं अपार प्रेम, ३८०० कोटींच्या मालकानं कशी बनवली कोट्यवधी लोकांच्या मनात जागा
7
Ratan Tata: एका कुटुंबाचा उद्योग ते 'देशाचा विश्वास'! रतन टाटांनी असं उभारलं 'जगात भारी' व्यवसाय साम्राज्य
8
नाशिकच्या नेहरु वनोद्यानाने रतन टाटा यांना घातली होती भुरळ; राज ठाकरे यांना म्हणाले होते, हा तर इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट...!
9
Ratan Tata News: ७९ व्या वाढदिवशी टाटा पोहोचले होते संघ मुख्यालयात; नेमकं काय घडलं होतं?
10
महाराष्ट्राच्या फायद्यासाठी हरयाणाची पुनरावृत्ती करा; अजित पवार यांचं राज्यातील जनतेला आवाहन
11
OBC यादीत महाराष्ट्रातील काही जातींचा समावेश होणार; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची केंद्र सरकारला शिफारस
12
IND vs BAN : विक्रमी विजयासह टीम इंडियाच्या नावे झाली आणखी एक मालिका
13
महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये हरियाणाच्या निकालाची पुनरावृत्ती होणार; चंद्राबाबू नायडूंचे भाकित
14
Nitish Reddy अन् Rinku Singh ची दमदार फिफ्टी, टीम इंडियाच्या नावे झाले २ मोठे विक्रम
15
पराभव जिव्हारी, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर काँग्रेस नेते म्हणाले- 'EVM शी छेडछाड...'
16
लेडी सिंघम..!! काजोलच्या हॉट अन् डॅशिंग लूकवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा, पाहा Photos
17
महाराष्ट्र जिंकणं काँग्रेससाठी सोपं नाही, हरयाणाच्या निकालामधून शिकावे लागतील हे धडे
18
‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ 
19
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
20
Shafali Verma चा मोठा पराक्रम; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गाठला मैलाचा पल्ला

महागाईच्या झळा! जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्याने गोरगरीब बेजार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 11:51 PM

खाद्यपदार्थांसह इंधन दरवाढीचाही परिणाम

खोडाळा : घरगुती वापरातील जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींत भरमसाट वाढ झाल्याने ग्रामीण भागातील गोरगरीब बेजार झाले असून, कोरोना महामारीच्या संकटात जीवन जगणे असह्य झाले आहे. एकीकडे घरगुती गॅस दरवाढ होत असताना आता तेल, डाळींचे भाव गगनाला भिडल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना जगणे कठीण झाले आहे. लॉकडाऊनचा फटका बसल्यानंतर त्यातून हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत होती. मात्र पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर होऊ लागल्याने यापुढचे दिवस काढायचे कसे असा प्रश्न सामान्यांसमोर आहे. 

गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या संकटामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाला आहे. लॉकडाऊनचा मोठा फटका बसल्यानंतर त्यातून हळूहळू परिस्थिती सामान्य होत असल्याचे चित्र असतानाच पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. त्यात इंधन दरवाढीचा फटकाही नागरिकांना बसत आहे. गेल्या दोन महिन्यांत करडई, सूर्यफुल, शेंगदाणा, सोयाबीनसह पामतेलाचे भाव लीटरमागे तब्बल ३० ते ४० रुपयांनी वाढले आहेत. मोहरी व तीळ तेलाचे दर तुलनेत स्थिर असले, तरी या तेलाचे भाव मात्र चढेच आहेत. ऑगस्ट २०२० मध्ये सूर्यफुल तेलाचा दर ९८ रुपये प्रति लीटर होता.

सप्टेंबरच्या पहिल्या आ‌ठवड्यात ११० रुपये दर होता, तर जानेवारी २०२१ च्या दुसऱ्या आठवड्यात १३४ दर होता. सध्या एक लीटर सूर्यफुल तेलासाठी ग्राहकांना १५० रुपये मोजावे लागत आहे. दोनच महिन्यांत सूर्यफुल लीटरमागे १६ रुपयांनी महागले आहे. हीच अवस्था शेंगदाणा तेलाची आहे. दोन महिन्यांपूर्वी १५० रुपये प्रति लीटर या भावाने मिळणाऱ्या शेंगदाणा खाद्यतेलासाठी सध्या १६४ रुपये मोजावे लागत आहेत, तर १७० रुपये प्रति लीटर या दराने मिळणा-या करडई तेलाचा भाव हा चार रुपयांनी वधारला असून, सध्या १७४ रुपये प्रति लीटर दर आहे.

महागाईच्या भरमसाट वाढीमुळे बजेट कोलमडले आहे. भाजी, किराणा, गॅस सिलिंडर यासारख्या वाढणाऱ्या गोष्टींना तोंड देताना नाकीनऊ येत आहे. तेलाचे दर असेच वाढत राहिले, तर सर्वसामान्यांनी जगायचे कसे, असा सवाल निर्माण होत आहे. - मेघा काशीद, गृहिणी