शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
3
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
4
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
5
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
6
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
7
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
8
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
9
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
10
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
11
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
12
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
13
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
14
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
15
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
16
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
17
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
18
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
19
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
20
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...

प्रदूषण मुक्त दिवाळीसाठी फटाके कमी वापरासाठी ठाणे जिल्ह्यातील गावकऱ्यांचा पुढाकार

By सुरेश लोखंडे | Updated: November 3, 2023 16:38 IST

ठाणे जिल्हा परिषदेच्या ४३१ ग्रामपंचायतीमध्ये फटाके वापर कमी करण्यासाठी पुढाकार घेणारा ठरावही घेण्यात आले आहे.

ठाणे : जिल्ह्यातील गांवपाडे, खेड्यांमध्ये ‘माझी वसुंधरा, अभियान’चा चाैथा टप्पा ग्राम पंचायतींनी हाती घेतला आहे. या अभियानांर्गत पंचतत्व लक्षात घेऊन ठाणे जिल्हा परिषदेच्या ४३१ ग्रामपंचायतीमध्ये फटाके वापर कमी करण्यासाठी पुढाकार घेणारा ठरावही घेण्यात आले आहे. त्यामुळे दिवाळीत वायु प्रदुषण व ध्वनी प्रदुषण प्रतिबंध होण्यास मदत होईल. याशिवाय पर्यावरण व जनहितार्थ संरक्षण करण्यासाठी उत्तम कार्य ग्रामपंचायतींव्दारे हाती घेण्यात आले आहे.

दिवाळीतील वायु प्रदुषण लक्षात घेता ‘माझी वसुंधरा अभियान ४.०’ हा टप्पा ग्राम पंचायतींकडून गावाेगावी जात आहे. त्यास अनुसरून सर्व ग्रामपंचायतींना फटाके वापर कमी करून पर्यावरण पुरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या ग्राम पंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे यांनी ग्रामस्थांना आवाहन केले आहे. वायु, जल, आकाश, पृथ्वी, अग्नी या पंचतत्वानुसार पर्यावरणास हानी होणार नाही, याची काळजी या दिवाळीतही ग्राम पंचायतींकडून घेतली जात आहे. त्यासाठी ग्रामस्थांचा सहभाग करून घेतला जात आहे. त्यामुळे पर्यावरणाची काळजी घेण्यासह विविध उपक्रम या ‘माझी वसुंधरा, अभियान ४.०’ या माध्यमातून वेळोवेळी राबविण्यात येत आहे. त्यासाठी ग्रामीण भागात जनजागृती करण्यात येत आहे. सौर ऊर्जा प्रकल्प, सोलार पंप, वृक्षलागवड, बायोगॅस प्रकल्प, घनकचरा व्यवस्थापन, सिंगल युज प्लास्टिक बंदी असे उपक्रम हाती घेण्यात आले आहे. यासाटह पर्यावरण दूत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावाेगांवी जनजागृती करत आहेत.

टॅग्स :thaneठाणेDiwaliदिवाळी 2023